शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जयकुमार गोरेंकडून गोंदवले खुर्द दत्तक

By admin | Updated: October 19, 2015 00:01 IST

गावाचा विकास होणार : दहा लाखांची वैयक्तिक वर्गणी दिली

गोंदवले : राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘आमदार आदर्श ग्राम’ योजनेअंतर्गत गोंदवले खुर्द हे गाव दत्तक घेतले आहे. शासनाच्या विविध योजनांच्या पुढे जाऊन गावाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावकऱ्याने हेवेदावे, गट-तट विसरून एकत्र यावे. सर्वांच्या सहभागाने स्वच्छतेसह पाणलोट, रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा पुरवून गावात व परिसरात हरित क्रांती घडवून गोंदवले खुर्द राज्यात आदर्श बनविणार आहे,’ असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले. दरम्यान, त्यांनी दहा लाखांची वैयक्तिक वर्गणी दिली. ‘आमदार आदर्श ग्राम’ योजनेअंतर्गत गोंदवले खुर्द, ता. माण हे गाव दत्तक घेतल्यानंतर आयोजित ग्रामसभेत ते बोलत होते. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सभापती आक्काताई मासाळ, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सीमा जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोडलकर, सरपंच, विविध विभागांचे अधिकारी व गामस्थांची उपस्थिती होती.आ. गोरे म्हणाले, ‘कोणत्याही राजकीय हेतूने गोंदवले खुर्द हे गाव दत्तक घेतलेले नाही. त्यामुळे कोणताही गट-तट न पाहता राजकीय जोडे बाहेर काढून गावकऱ्यांच्या सहकार्याने गावचा सर्वांगीण विकास आपण साधणार आहोत. सर्वांची मने एक झाली तर विकास साधता येणार आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय आदर्श ग्रामनिर्मितीची संकल्पना शक्य होणार नाही. स्वत: सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांशी सुसंवाद साधून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सहभागी करून गावच्या विकासाचा आराखडा तयार केला जाणार आहे.’ (वार्ताहर) आदर्श ग्रामनिर्मितीसाठी आयोजित ग्रामसभेला महिलांनी मोठी उपस्थिती दर्शविली होती.गावासाठी लोकसहभागाने विकासकामे करण्यासाठी सहकार्य करण्याचे सर्वांनी हात उंचावून सांगितले.आ. जयकुमार गोरे यांनी सर्वप्रथम दहा लाखांची वैयक्तिक वर्गणी देऊन लोकसहभागाचा शुभारंभ केला. त्यावर गावकऱ्यांनीही सढळ हस्ते मदत करण्याचे जाहीर केले.स्वच्छतेसह श्रमदानाच्या प्रत्येक कामातही आमदार स्वत: सहभागी होणार आहेत.