शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

माणची चळवळ दिशा देणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:41 IST

दहिवडी : ‘माण तालुक्यात लोकसहभागाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली. ही चळवळ संपूर्ण राज्याला दिशा देणारी आहे’, असे गौरवोद्गार ...

दहिवडी : ‘माण तालुक्यात लोकसहभागाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली. ही चळवळ संपूर्ण राज्याला दिशा देणारी आहे’, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी काढले.

दहिवडी येथील प्रांत कार्यालयाच्या प्रागणात आयोजित केलेल्या माण-खटाव वसुंधरा समृद्ध गाव योजनेत निवड झालेली २९ गावे व जलदुतांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार जयकुमार गोरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, खटावचे प्रांताधिकारी जनार्दन कासार, डाॅ. माधवराव पोळ, नगराध्यक्ष धनाजी जाधव, पाणी फाऊंडेशनचे आबा लाड, अजित पवार, बलवंत पाटील, नंदकुमार खोत, सुनील पोळ, सिद्धार्थ गुंडगे, संदीप खाडे उपस्थित होते.

गौडा म्हणाले, ‘माण तालुक्याच्या मातीत श्रमदानाची चळवळ रुजली आहे. येथील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या एकजुटीमुळे तालुक्यातील गावांनी वॉटरकप स्पर्धेत बक्षीस पटकावले. समृध्द गाव स्पर्धेतही ही गावे चमकतील.’

आमदार गोरे म्हणाले, ‘माणमध्ये बाहेरून पाणी आणले. मोठ्या प्रमाणात पाणी अडवले; पण आपण पाटाने पाणी देतो, हे खूप वेदनादायी आहे. यापुढे पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे तरच याचा उपयोग आहे. सर्व राजकारण्यांना एकत्र आणण्याचे काम या चळवळीने केले. यापुढेही या चळवळीला राजकीय वास येऊ देऊ नका.’

प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘माण तालुक्यातील अनेक गावांनी या योजनेत सहभाग घेतला. आजही समृद्ध गाव योजनेत सर्वात जास्त गावे माण तालुक्यातील आहेत. या चळवळीने खूप काही दिले. वॉटरकप स्पर्धेत समृध्द गाव योजनेचा पहिला टप्पा २९ गावांनी पूर्ण केला. यापुढील प्रवास खडतर आहे. त्यामुळे सर्वांनी गाव पातळीवर नियोजन करावे, प्रत्येक कुटुंब समृद्ध व्हावे, यासाठी प्रयत्न व्हावा.’

यावेळी समृध्द योजनेतील १२०पैकी ७० गुण मिळवून दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलेल्या २९ गावांचा, त्याचबरोबर योगदान देणाऱ्या जलदुतांचा सत्कार करण्यात आला. पाणी फाऊंडेशनच्यावतीने ननावरे, आबा लाड, अजित पवार यांनी मनोगत व्यक्त केले. काही गावांच्या सरपंचांनी मनोगत व्यक्त केले.

चौकट..

अन् एकच हशा पिकला...

डाॅ. पालवे यांनी माण-खटाव वसुंधराची कल्पना मांडताना राजकीय नेत्यांना सहकार्य करा, असे आवाहन केले. त्यावेळी पहिल्या ओळीत नेते तर दुसऱ्या ओळीत वसुंधराचे कार्यकर्ते होते, हे लक्षात येताच प्रांत म्हणाले, ‘पहिली ओळ नको, दुसरी ओळ करेल,’ त्यामुळे एकच हशा फिकला.

२१ दहिवडी

फोटो- दहिवडी (ता. माण) येथे समृध्द गाव स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण केलेल्या गावांना विनय गौडा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार जयकुमार गोरे, सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी उपस्थित होते. (छाया : नवनाथ जगदाळे)