शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

एफआरपीनुसार एकरकमी रक्कम द्या : खोत

By admin | Updated: October 19, 2015 23:44 IST

मसूरला शेतकरी मेळावा : शेतकऱ्यांच्या हिताआड येणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी करणार

मसूर : ‘साखर कारखानदारांनी ऊसदर नियंत्रण अध्यादेशानुसार ‘एफआरपी’च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना एकरकमी रक्कम द्या; अन्यथा बेकायदेशीररीत्या तुकडे करणाऱ्या कारखाना व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, त्यासाठी कसलीही किंमत मोजावी लागली तरी चालेल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला.मसूर, ता. कऱ्हाड येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे होते. यावेळी कोयना दूध संघाचे संचालक वसंतराव जगदाळे, आत्माराम जाधव, हिंदुराव चव्हाण, तानाजीराव देशमुख, संजूकाका कदम, संदीप इंगवले, रेखा वायदंडे, बजरंग जाधव, संतोष पाटील, दिनकर पाटील, गणेश जाधव, रवींद्र सूर्यवंशी, बाळासाहेब कांबिरे यांची उपस्थिती होती.खोत म्हणाले, ‘कारखानदारी अडचणीत होती, तेव्हा सहा हजार कोटींचे पॅकेज हे केवळ खा. राजू शेट्टींमुळेच मिळाले, याचे भान कारखान्यांनी ठेवावे. कारखान्यांनी दराचा खरा कायदाच शेतकऱ्यांना कळू दिला नाही. सर्वसामान्य सभेला काय अधिकार आहेत? शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होत नाहीत. सभेत भाडोत्री गुंड व संचालकांचे बगलबच्चे मंजूर-मंजूर म्हणतात. धनदांडग्यांच्या गदारोळात शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातो. मूठभर लोकांनी घेतलेला निर्णय सर्वांनी बंधनकारक मानायचा का? मात्र, त्यासाठी सहकार कायदा आहे. आजवरचे दर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनरेट्यामुळेच मिळाले आहेत, त्यासाठी आंदोलने, रास्ता रोकोचा संघर्ष करावा लागला. ऊसदरानंतर मळी, अल्कोहोल, दारू, बगॅससह आदी हिशेबाचे आॅडिटही काढणार आहे. कारखानदारी शासनाशी पडद्यामागे हातमिळवणी करत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. अंजनकुमार घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. विकास पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यास कऱ्हाड तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)काँग्रेस-राष्ट्रवादी ही सत्तेशिवाय जगू शकत नाहीत, अशी टीका करून खोत म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्राने साखर सम्राटाविरोधात कौल देऊन भाजप-सेनेला निवडून दिले, हे राज्य व केंद्र सरकारने विसरू नये त्यांना कारखानदारी हवी की शेतकरी हवा, हे ठरवावे; अन्यथा जनता तुम्हालाही उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर ३४ गुन्हे दाखल आहेत, ते लालदिव्याच्या हव्यासापोटी नाहीत. सामान्य शेतकरी हाच माझा लालदिवा आहे. - सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व एफआरपीची एकरकमी रक्कम मिळण्यासाठी या जनहिताच्या आंदोलनात सर्वांनी राजकारण गट,तट न पाहता साखरसम्राटांना ताळ्यावर आणण्यासाठी २६ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वांनी सहभागी व्हावे. - मनोज घोरपडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना