शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

एफआरपीनुसार एकरकमी रक्कम द्या : खोत

By admin | Updated: October 19, 2015 23:44 IST

मसूरला शेतकरी मेळावा : शेतकऱ्यांच्या हिताआड येणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी करणार

मसूर : ‘साखर कारखानदारांनी ऊसदर नियंत्रण अध्यादेशानुसार ‘एफआरपी’च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना एकरकमी रक्कम द्या; अन्यथा बेकायदेशीररीत्या तुकडे करणाऱ्या कारखाना व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, त्यासाठी कसलीही किंमत मोजावी लागली तरी चालेल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला.मसूर, ता. कऱ्हाड येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे होते. यावेळी कोयना दूध संघाचे संचालक वसंतराव जगदाळे, आत्माराम जाधव, हिंदुराव चव्हाण, तानाजीराव देशमुख, संजूकाका कदम, संदीप इंगवले, रेखा वायदंडे, बजरंग जाधव, संतोष पाटील, दिनकर पाटील, गणेश जाधव, रवींद्र सूर्यवंशी, बाळासाहेब कांबिरे यांची उपस्थिती होती.खोत म्हणाले, ‘कारखानदारी अडचणीत होती, तेव्हा सहा हजार कोटींचे पॅकेज हे केवळ खा. राजू शेट्टींमुळेच मिळाले, याचे भान कारखान्यांनी ठेवावे. कारखान्यांनी दराचा खरा कायदाच शेतकऱ्यांना कळू दिला नाही. सर्वसामान्य सभेला काय अधिकार आहेत? शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होत नाहीत. सभेत भाडोत्री गुंड व संचालकांचे बगलबच्चे मंजूर-मंजूर म्हणतात. धनदांडग्यांच्या गदारोळात शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातो. मूठभर लोकांनी घेतलेला निर्णय सर्वांनी बंधनकारक मानायचा का? मात्र, त्यासाठी सहकार कायदा आहे. आजवरचे दर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनरेट्यामुळेच मिळाले आहेत, त्यासाठी आंदोलने, रास्ता रोकोचा संघर्ष करावा लागला. ऊसदरानंतर मळी, अल्कोहोल, दारू, बगॅससह आदी हिशेबाचे आॅडिटही काढणार आहे. कारखानदारी शासनाशी पडद्यामागे हातमिळवणी करत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. अंजनकुमार घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. विकास पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यास कऱ्हाड तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)काँग्रेस-राष्ट्रवादी ही सत्तेशिवाय जगू शकत नाहीत, अशी टीका करून खोत म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्राने साखर सम्राटाविरोधात कौल देऊन भाजप-सेनेला निवडून दिले, हे राज्य व केंद्र सरकारने विसरू नये त्यांना कारखानदारी हवी की शेतकरी हवा, हे ठरवावे; अन्यथा जनता तुम्हालाही उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर ३४ गुन्हे दाखल आहेत, ते लालदिव्याच्या हव्यासापोटी नाहीत. सामान्य शेतकरी हाच माझा लालदिवा आहे. - सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व एफआरपीची एकरकमी रक्कम मिळण्यासाठी या जनहिताच्या आंदोलनात सर्वांनी राजकारण गट,तट न पाहता साखरसम्राटांना ताळ्यावर आणण्यासाठी २६ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वांनी सहभागी व्हावे. - मनोज घोरपडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना