शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लाकडाच्या टेकूला उभ्या असलेल्या शाळेत मुली पहा कशा शिकताहेत शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:03 IST

वाशी (ता. करवीर) येथील कन्याशाळेच्या खोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीस टेकूचा आधार द्यावा लागत असल्याने मुलींना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे.

सडोली (खालसा) : वाशी (ता. करवीर) येथील कन्याशाळेच्या खोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीस टेकूचा आधार द्यावा लागत असल्याने मुलींना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असतानासुद्धा शिक्षण विभागाला जाग कधी येणार, असा सवाल पालक करीत आहेत.

वाशी (ता. करवीर) येथे जिल्हा परिषदेच्या १ ली ते ७ वी पर्यंतच्या मुलींसाठी कन्याशाळा, तर मुलांसाठी विद्यामंदिर या दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळांत सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या दोन्ही शाळांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या शाळेची गुणवत्ता चांगली आहे, तर शाळेच्या मुलांनी अनेक क्रीडा प्रकारांत मोठी मजल मारली आहे.या शाळेच्या पाच खोल्यांचे बांधकाम १९९६ साली झाले आहे. पण ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने वीस वर्षांच्या अगोदरच खोल्यांच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे. याही परिस्थितीतीत मुली शिक्षणाचे धडे गिरवत असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.प्राथमिक शिक्षण विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे निव्वळ दप्तर दिरंगाई व भोंगळ कारभारामुळे गेली चार वर्षे शाळेला मरणयातना सोसाव्या लागत आहेत, असा आरोप पालकांनी केला आहे. तसेच एकाच खोलीमध्ये दोन दोन वर्ग भरवले जातात.या शाळेतील इमारतीच्या दुरवस्थेचा फायदा घेऊन काही ग्रामस्थांनी चक्क जनावरे बांधण्यासाठी शाळेचा वापर सुरू केला असून, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पालकांच्या संतापात अधिकच भर पडलीआहे.नेतेमंडळींनी काय केलेया गावातील नागरिकांनी गेल्या वीस वर्षांत जिल्हा परिषद अध्यक्ष ते पंचायत समिती सदस्य अशी मोठ मोठी पदे उपभोगली असूनसुद्धा शाळेची अवस्था बिकट बनली आहे. या नेतेमंडळींनी शाळेसाठी काय केले, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.शाळा दुरुस्तीसाठी व्यवस्थापन समितीने या अगोदरही अनेकवेळा प्रस्ताव पाठवले, पण शिक्षण विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.- के. एस. रानगे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, वाशी.शाळेची गुणवत्ता व शिक्षकांच्या प्रयत्नातून शाळेची शैक्षणिक प्रगती झाली आहे; परंतु शिक्षण विभागाच्या आंधळ्या कारभारामुळे आमच्या मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेचा प्रश्न न सोडवल्यास आंदोलन करणार आहे.- रणजित पाटील, पालक 

टॅग्स :Schoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळा