शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
7
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
11
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
12
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
13
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
15
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
16
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
17
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
18
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
19
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
20
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
Daily Top 2Weekly Top 5

लाकडाच्या टेकूला उभ्या असलेल्या शाळेत मुली पहा कशा शिकताहेत शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:03 IST

वाशी (ता. करवीर) येथील कन्याशाळेच्या खोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीस टेकूचा आधार द्यावा लागत असल्याने मुलींना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे.

सडोली (खालसा) : वाशी (ता. करवीर) येथील कन्याशाळेच्या खोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीस टेकूचा आधार द्यावा लागत असल्याने मुलींना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असतानासुद्धा शिक्षण विभागाला जाग कधी येणार, असा सवाल पालक करीत आहेत.

वाशी (ता. करवीर) येथे जिल्हा परिषदेच्या १ ली ते ७ वी पर्यंतच्या मुलींसाठी कन्याशाळा, तर मुलांसाठी विद्यामंदिर या दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळांत सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या दोन्ही शाळांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या शाळेची गुणवत्ता चांगली आहे, तर शाळेच्या मुलांनी अनेक क्रीडा प्रकारांत मोठी मजल मारली आहे.या शाळेच्या पाच खोल्यांचे बांधकाम १९९६ साली झाले आहे. पण ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने वीस वर्षांच्या अगोदरच खोल्यांच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे. याही परिस्थितीतीत मुली शिक्षणाचे धडे गिरवत असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.प्राथमिक शिक्षण विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे निव्वळ दप्तर दिरंगाई व भोंगळ कारभारामुळे गेली चार वर्षे शाळेला मरणयातना सोसाव्या लागत आहेत, असा आरोप पालकांनी केला आहे. तसेच एकाच खोलीमध्ये दोन दोन वर्ग भरवले जातात.या शाळेतील इमारतीच्या दुरवस्थेचा फायदा घेऊन काही ग्रामस्थांनी चक्क जनावरे बांधण्यासाठी शाळेचा वापर सुरू केला असून, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पालकांच्या संतापात अधिकच भर पडलीआहे.नेतेमंडळींनी काय केलेया गावातील नागरिकांनी गेल्या वीस वर्षांत जिल्हा परिषद अध्यक्ष ते पंचायत समिती सदस्य अशी मोठ मोठी पदे उपभोगली असूनसुद्धा शाळेची अवस्था बिकट बनली आहे. या नेतेमंडळींनी शाळेसाठी काय केले, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.शाळा दुरुस्तीसाठी व्यवस्थापन समितीने या अगोदरही अनेकवेळा प्रस्ताव पाठवले, पण शिक्षण विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.- के. एस. रानगे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, वाशी.शाळेची गुणवत्ता व शिक्षकांच्या प्रयत्नातून शाळेची शैक्षणिक प्रगती झाली आहे; परंतु शिक्षण विभागाच्या आंधळ्या कारभारामुळे आमच्या मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेचा प्रश्न न सोडवल्यास आंदोलन करणार आहे.- रणजित पाटील, पालक 

टॅग्स :Schoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळा