शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिष्यवृत्ती परीक्षा ‘ऑफलाइन’ घेण्याचा घाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:36 IST

तांबवे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा ऑफलाइन घेण्याचा घाट घातला ...

तांबवे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा ऑफलाइन घेण्याचा घाट घातला जात आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाची तयारीही सुरू असून शासनाने या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शासनाला शिक्षक परिषदेच्या वतीने तीन वेळा पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मात्र, शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. उलट परीक्षा परिषदेने ५ मे रोजी पर्यवेक्षण व अन्य बाबींचे नियोजन करण्याविषयीचे पत्र पाठवून संभ्रम वाढवला आहे. परीक्षा परिषदेलाही याविषयी निवेदन दिल्यानंतर परिषदेने हा विषय शासनाकडे टोलवला असून शासन याबाबत निर्णय घेणार असल्याचे शिक्षक परिषदेला पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. शासनाला २० व २० एप्रिल आणि ३ मे अशी तीनवेळा निवेदने देऊनही शासनाने याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही.

देशपातळीवरील प्रमुख परीक्षा पुढे ढकलेल्या असतानाही, तसेच विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होत असताना लहान मुलांच्या परीक्षा मात्र ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा हट्ट मुद्दामहून आहे का? असा प्रश्न पालक व शिक्षकांतून उपस्थित केला जात आहे. राज्यभरात ६ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. एका परीक्षा केंद्रावर २०० ते ५०० परीक्षार्थी असतात. तेवढ्याच प्रमाणात पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफलाइन परीक्षा कोरोनाच्या काळात घेणे खरंच आवश्यक आहे का? काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने कोणत्याही परीक्षा या काळात घेण्यात येऊ नये, असे निर्देश दिलेले असतानाही ५ मे रोजी परीक्षा परिषदेने परीक्षा होणार असल्याचे नियोजन पत्र काढणे म्हणजे हा मुद्दाम केलेला हट्टवादच आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल.

- चौकट

आधी सुटी दिली, मग परीक्षा घेतली!

२ मेपासून १४ जूनपर्यंत उन्हाळी सुटी देण्यात आलेली असल्यामुळे अनेक पालक व शिक्षक त्यांच्या मूळगावी गेले आहेत. एकीकडे शिक्षकांना उन्हाळी सुटी जाहीर करायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच काळात परीक्षा ठेवून त्यांना त्यांची रजा अर्धवट सोडून पुन्हा शाळेत बोलावायचे, हा प्रकार म्हणजे शासनाचे दुटप्पी धोरण असल्याचे शिक्षक सांगत आहेत.

- कोट

शासनाने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे न ढकलल्यास तसेच मे महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा अट्टाहास असाच ठेवल्यास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे शिक्षक परिषद या परीक्षेवर बहिष्कार घालणार आहे.

- दिलीप खरमाटे, कार्यवाह

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, सातारा