शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकारला हाकलून लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:40 IST

उंब्रज : ‘आम्ही शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांचा विषय आमच्या जिवाभावाचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकरी काय मागत आहे, हे ...

उंब्रज : ‘आम्ही शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांचा विषय आमच्या जिवाभावाचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकरी काय मागत आहे, हे एकदा समजून घ्यावे. आमच्यासाठी काय चांगलं किंवा काय वाईट आहे, ते आम्हाला नीट कळतं; परंतु मोदी सरकारला का कळत नाही? वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारला हाकलून लावा,’ असे आवाहन सत्त्वशीला चव्हाण यांनी केले.

उंब्रज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्यावतीने कृषी कायद्यांच्या विरोधात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्षा सुषमाराजे घोरपडे, पश्चिम महाराष्ट्र असंघटित महिला विभागाच्या अध्यक्षा वैशाली जाधव, काँग्रेसचे कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष हेमंतराव जाधव, प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मारुतराव जाधव, कॅ. इंद्रजित जाधव, विकास जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

‘केंद्र सरकारने देशाच्या जनतेचा विश्वासघात केलेला आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कृषी कायदे पारित केले असून, हे काळे कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस पक्ष विरोध करणारच,’ असे सुषमाराजे घोरपडे व वैशाली जाधव यांनी सांगितले.

तालुकाध्यक्ष हेमंतराव जाधव यांनी, केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यांनी कृषी कायदे तातडीने रद्द करावेत, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.

अजितराव पाटील-चिखलीकर, कॅ. इंद्रजित जाधव, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, शंकरराव पवार, शंकरराव खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.

आंदोलनस्थळी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेश साळुंखे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.