शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या जागा भरण्यासाठीच केलीये उठाठेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:40 IST

सातारा : भौतिकशास्त्र आणि गणित हा अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा पाया आहे. या दोन विषयांशिवाय अभियांत्रिकीला प्रवेश भविष्यात अनेक अडचणी ...

सातारा : भौतिकशास्त्र आणि गणित हा अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा पाया आहे. या दोन विषयांशिवाय अभियांत्रिकीला प्रवेश भविष्यात अनेक अडचणी आणून ठेवू शकतो. निव्वळ खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश वाढविण्यासाठी घेतलेला हा निर्णय असल्याचा आक्षेप साता-यातील शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने अभ्यासक्रमाच्या २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी गणित आणि भौतिकशास्त्र बंधनकारक नसल्याची तरतूद नियमावलीत केली आहे. विद्यार्थ्यांमधील अभियांत्रिकीची भीती दूर होण्यासाठी आणि प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. केवळ रिक्त जागा भरण्यासाठी घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नुकसानकारक असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय अभियांत्रिकी शिक्षाचा पाया आहेत. जर हेच विषय अनिवार्य नसतील तर हा अभ्यासक्रम शिकून किती विद्यार्थी प्रत्यक्ष काम करू शकतील आणि केलेले काम किती निर्दोष असेल याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे.

असे असणार नवीन नियम

अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिसेस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल, अ‍ॅग्रीकल्चर, इंजिनियरिंग, ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, आंत्रप्रिनियरशिप यापैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले आणि बारावीत या तीन विषयांमध्ये एकत्रित ४५ टक्के गुण असले तर अभियांत्रिकीला सहज प्रवेश घेणे शक्य होणार आहे.

कोट :

या निर्णयामुळे खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थी प्रवेशाचा प्रश्न मिटेल. मात्र, अभियांत्रिकीचा पाया असलेले विषयच वगळले तर पदवी हातात असूनही नोकरी आणि कामाची संधी मिळणे केवळ अशक्य वाटतंय.

- विशाल ढाणे, अभियांत्रिकी शिक्षक

अभियांत्रिकी क्षेत्रात कोणतेही स्ट्रक्चर डिझाईन करताना गणिताचा उपयोग होतो. अकरावी बारावीत हे विषय असतील तर विषय लक्षात येऊ शकतात. थेट पहिल्या वर्षाला हे विषय शिकवू असे म्हटले तर त्याचा विद्यार्थ्यांवर ताण येऊ शकतो.

- प्रा. संजीव बोंडे, सातारा