शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Satara: घाटातून गव्यांचे कळप दिवसा रस्त्यावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

By दीपक शिंदे | Updated: March 7, 2024 15:52 IST

सणबूर : गेल्या दोन दिवसांपासून वाल्मीक पठार परिसरातील शिद्रुकवाडी रस्त्यावर दहा ते बारा गव्यांचा कळप सकाळ - संध्याकाळी फिरत ...

सणबूर : गेल्या दोन दिवसांपासून वाल्मीक पठार परिसरातील शिद्रुकवाडी रस्त्यावर दहा ते बारा गव्यांचा कळप सकाळ - संध्याकाळी फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ढेबेवाडी - नवास्ता मार्गावरील शिद्रुकवाडी फाट्यातून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गव्यांचे कळप रस्त्यावरच उभे असल्याने रस्त्याने दररोज ये-जा करणारे शिद्रुकवाडी येथील राजाराम म्होप्रेकर यांना धडकी भरली. त्यांनी दुचाकी जागेवरच उभी केली. थोड्या वेळाने गव्यांचा कळप टेळेवाडी गावच्या दिशेने गेला. सध्या डोंगर पूर्णपणे रिकामे झाल्याने वन्यप्राणी डोंगरातून गावाच्या दिशेने येत आहेत. चार दिवसांपूर्वी बोरगेवाडी - सळवे येथील शेतकऱ्याची गाय गव्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे जनावरे चरायला घेऊन जाणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे. परिसरातील भराडीचा माळ नावाच्या शिवारात हे गव्यांचे कळप सतत फिरताना लोकांना दिसत आहेत. त्यामुळे जनावरे चारायला जाणाऱ्या लोकांना जनावरे सोडणे कठीण होऊन बसले आहे. गव्यांचे कळप बहुले, टेळेवाडी, मारुलहवेली गावाच्या डोंगराच्या दिशेने शिद्रुकवाडीकडे येत आहेत. ते रस्त्यातच थांबत असल्याने लोकांची घाबरगुंडी उडत आहे. या गव्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.डोंगर कपारीत विखुरलेल्या आणि जंगलाने वेढलेल्या या परिसरात शिद्रुकवाडी या तीन वस्त्या लागून आहेत. येथे वन्यप्राण्यांचा सतत वावर आहे. या प्राण्यांकडून पिकांचे, पाळीव जनावरांचे नुकसान होत आहे. वर्षागणिक गव्यांचा उपद्रव वाढत चालल्याने शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. भात, भुईमूग, सोयाबीन, हायब्रीड यासह खरीप व रब्बी हंगामातील विविध पिके शेतकरी घेतात. मात्र, गव्यांच्या उपद्रवामुळे शेतातील पीक कापणी व मळणी होऊन घरापर्यंत येईलच, याचीही शाश्वती आता उरलेली नाही.

शिद्रुकवाडी परिसरात गव्यांचे कळप रस्त्यात मध्येच उभे राहत असल्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना भीती वाटत आहे. अगोदरच डुकरे व वानरे आणि बिबट्यामुळे लोक त्रासलेले असताना आता त्यात गव्यांची भर पडली आहे. -राजाराम म्होप्रेकर, ग्रामस्थ, शिद्रुकवाडी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर