शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धान्य गोळा करून नऊ अपत्यांचा आजी करतेय सांभाळ

By admin | Updated: October 1, 2015 00:34 IST

करंजाच्या फोकापासून साकारतेय जगण्याचा आनंद

शेखर जाधव -वडूज --आयुष्य हे सुख आणि दु:ख यांच्या धाग्यांनी विणलेले. तसंच आहे, असे म्हणतात; पण ते तेवढंच खरं नाही. त्यात आशा आणि निराशा, यश आणि अपयश, मान आणि अपमान, पडझड आणि उठाव आदी जगण्याच्या नानाविध कळांचेही धागे गुंफले आहेत. आपण ते सारे अनुभवतही असतो. एक मात्र खरे, आतील अपयशाचे क्षण माणसांना काही काळच थोपवू शकतात, ते जीवनाला कायमचे अडवून धरू शकत नाहीत. दु:ख हे जीवनातील सत्य असले तरी आनंद हे त्याहून मोठे महासत्य आहे आणि त्याच्याच दिशेने कैकाडी समाजातील असूनही बुरड समाजाचा व्यवसाय सांभाळत मुला-मुलींच्या प्रपंचाला हातभार लावत ८० वर्षांच्या वैजयंता नामदेव माने यांच्या जीवनाचा प्रवास सुरू आहे.माण तालुक्यातील दहिवडी माहेर असणाऱ्या वैजयंता माने यांचे सासर वडूज जरी असले तरी या दोन्ही खटाव-माण तालुक्यांत कळक(बांबू), करंजाच्या फोकापासून विविध वस्तू तयार करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. पती नामदेव माने यांच्या अचानक देवज्ञाने प्रपंचाची सर्व जबाबदारी आपसुकच त्यांच्यावर पडली. पाच मुले व चार मुली यांचे संगोपन करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रारंभी हा व्यवसाय करताना करंजाच्या फोका गोळा करून मोठे हारे, डालगे तयार करीत व ते विकण्यासाठी त्यांनी तालुक्यातील प्रत्येक खेड्यात पायपीट केली. त्याकाळी पैशापेक्षा धान्याची गरज त्यांना जादा असल्यामुळे काही शेतकऱ्यांना हा तयार माल देऊन त्यांच्यापासून धान्य गोळा करीत. त्यातूनच त्यांनी या नऊ अपत्यांचा सांभाळ केला. घरालगतच जिल्हा परिषद मराठी शाळा असल्याने त्यांनी मुला-मुलींना शाळेचे प्राथमिक धडे घेण्यासाठी धाडले. कारण घराजवळच हायस्कूल व मराठी शाळेत जाणारी इतरांची मुले-मुली पाहून आपलीपण मुले शिकली पाहिजेत. असा त्यांचा आग्रह होता; परंतु हा प्रपंच चालविताना त्यांना या व्यवसायात मुला-मुलींची फार मोठी मदत होऊ लागली. त्यामुळे त्यांची शिक्षणेही अर्धवट अवस्थेत राहिली.मुले-मुली मोठे झाल्यावर त्यांचे हात पिवळे करण्यासाठी वैजयंता यांची धावपळ फारच झाली. प्राप्त परिस्थितीवर मात करीत त्यांनी मुलांची लग्ने करून दिली. आज त्यांचा सुना, नातवंडे व परतुंडे यांचा गोतावळा पाहता त्यांनी आता आराम करावा, अशी अपेक्षा कुटुंबातील प्रत्येकाची आहे. कारण, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आजीने उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने जगावे, अशी नातवांची इच्छा आहे. मात्र, आपले हात-पाय हालतायत तोपर्यंत आपण हा व्यवसाय सुरूच ठेवणार, या मताशी ठाम आहेत. करंजाच्या फोकापासून सुरू केलेला व्यवसाय आता बांबू, कळक यापासून शिडी, टोपली, दुरडी, करंडे, केरसुणी, पाटी अशा वस्तू हाताने बनवून घराजवळच दुकान थाटले आहे. तालुक्यातील शेतकरी मंडळीसह नोकरदार, व्यावसायिक हे येथूनच लागणारे साहित्य खरेदी करून वैजयंता माने यांच्या या वयातील काबाडकष्टाचे कौतुक करतात.