शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

धान्य गोळा करून नऊ अपत्यांचा आजी करतेय सांभाळ

By admin | Updated: October 1, 2015 00:34 IST

करंजाच्या फोकापासून साकारतेय जगण्याचा आनंद

शेखर जाधव -वडूज --आयुष्य हे सुख आणि दु:ख यांच्या धाग्यांनी विणलेले. तसंच आहे, असे म्हणतात; पण ते तेवढंच खरं नाही. त्यात आशा आणि निराशा, यश आणि अपयश, मान आणि अपमान, पडझड आणि उठाव आदी जगण्याच्या नानाविध कळांचेही धागे गुंफले आहेत. आपण ते सारे अनुभवतही असतो. एक मात्र खरे, आतील अपयशाचे क्षण माणसांना काही काळच थोपवू शकतात, ते जीवनाला कायमचे अडवून धरू शकत नाहीत. दु:ख हे जीवनातील सत्य असले तरी आनंद हे त्याहून मोठे महासत्य आहे आणि त्याच्याच दिशेने कैकाडी समाजातील असूनही बुरड समाजाचा व्यवसाय सांभाळत मुला-मुलींच्या प्रपंचाला हातभार लावत ८० वर्षांच्या वैजयंता नामदेव माने यांच्या जीवनाचा प्रवास सुरू आहे.माण तालुक्यातील दहिवडी माहेर असणाऱ्या वैजयंता माने यांचे सासर वडूज जरी असले तरी या दोन्ही खटाव-माण तालुक्यांत कळक(बांबू), करंजाच्या फोकापासून विविध वस्तू तयार करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. पती नामदेव माने यांच्या अचानक देवज्ञाने प्रपंचाची सर्व जबाबदारी आपसुकच त्यांच्यावर पडली. पाच मुले व चार मुली यांचे संगोपन करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रारंभी हा व्यवसाय करताना करंजाच्या फोका गोळा करून मोठे हारे, डालगे तयार करीत व ते विकण्यासाठी त्यांनी तालुक्यातील प्रत्येक खेड्यात पायपीट केली. त्याकाळी पैशापेक्षा धान्याची गरज त्यांना जादा असल्यामुळे काही शेतकऱ्यांना हा तयार माल देऊन त्यांच्यापासून धान्य गोळा करीत. त्यातूनच त्यांनी या नऊ अपत्यांचा सांभाळ केला. घरालगतच जिल्हा परिषद मराठी शाळा असल्याने त्यांनी मुला-मुलींना शाळेचे प्राथमिक धडे घेण्यासाठी धाडले. कारण घराजवळच हायस्कूल व मराठी शाळेत जाणारी इतरांची मुले-मुली पाहून आपलीपण मुले शिकली पाहिजेत. असा त्यांचा आग्रह होता; परंतु हा प्रपंच चालविताना त्यांना या व्यवसायात मुला-मुलींची फार मोठी मदत होऊ लागली. त्यामुळे त्यांची शिक्षणेही अर्धवट अवस्थेत राहिली.मुले-मुली मोठे झाल्यावर त्यांचे हात पिवळे करण्यासाठी वैजयंता यांची धावपळ फारच झाली. प्राप्त परिस्थितीवर मात करीत त्यांनी मुलांची लग्ने करून दिली. आज त्यांचा सुना, नातवंडे व परतुंडे यांचा गोतावळा पाहता त्यांनी आता आराम करावा, अशी अपेक्षा कुटुंबातील प्रत्येकाची आहे. कारण, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आजीने उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने जगावे, अशी नातवांची इच्छा आहे. मात्र, आपले हात-पाय हालतायत तोपर्यंत आपण हा व्यवसाय सुरूच ठेवणार, या मताशी ठाम आहेत. करंजाच्या फोकापासून सुरू केलेला व्यवसाय आता बांबू, कळक यापासून शिडी, टोपली, दुरडी, करंडे, केरसुणी, पाटी अशा वस्तू हाताने बनवून घराजवळच दुकान थाटले आहे. तालुक्यातील शेतकरी मंडळीसह नोकरदार, व्यावसायिक हे येथूनच लागणारे साहित्य खरेदी करून वैजयंता माने यांच्या या वयातील काबाडकष्टाचे कौतुक करतात.