शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धान्य गोळा करून नऊ अपत्यांचा आजी करतेय सांभाळ

By admin | Updated: October 1, 2015 00:34 IST

करंजाच्या फोकापासून साकारतेय जगण्याचा आनंद

शेखर जाधव -वडूज --आयुष्य हे सुख आणि दु:ख यांच्या धाग्यांनी विणलेले. तसंच आहे, असे म्हणतात; पण ते तेवढंच खरं नाही. त्यात आशा आणि निराशा, यश आणि अपयश, मान आणि अपमान, पडझड आणि उठाव आदी जगण्याच्या नानाविध कळांचेही धागे गुंफले आहेत. आपण ते सारे अनुभवतही असतो. एक मात्र खरे, आतील अपयशाचे क्षण माणसांना काही काळच थोपवू शकतात, ते जीवनाला कायमचे अडवून धरू शकत नाहीत. दु:ख हे जीवनातील सत्य असले तरी आनंद हे त्याहून मोठे महासत्य आहे आणि त्याच्याच दिशेने कैकाडी समाजातील असूनही बुरड समाजाचा व्यवसाय सांभाळत मुला-मुलींच्या प्रपंचाला हातभार लावत ८० वर्षांच्या वैजयंता नामदेव माने यांच्या जीवनाचा प्रवास सुरू आहे.माण तालुक्यातील दहिवडी माहेर असणाऱ्या वैजयंता माने यांचे सासर वडूज जरी असले तरी या दोन्ही खटाव-माण तालुक्यांत कळक(बांबू), करंजाच्या फोकापासून विविध वस्तू तयार करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. पती नामदेव माने यांच्या अचानक देवज्ञाने प्रपंचाची सर्व जबाबदारी आपसुकच त्यांच्यावर पडली. पाच मुले व चार मुली यांचे संगोपन करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रारंभी हा व्यवसाय करताना करंजाच्या फोका गोळा करून मोठे हारे, डालगे तयार करीत व ते विकण्यासाठी त्यांनी तालुक्यातील प्रत्येक खेड्यात पायपीट केली. त्याकाळी पैशापेक्षा धान्याची गरज त्यांना जादा असल्यामुळे काही शेतकऱ्यांना हा तयार माल देऊन त्यांच्यापासून धान्य गोळा करीत. त्यातूनच त्यांनी या नऊ अपत्यांचा सांभाळ केला. घरालगतच जिल्हा परिषद मराठी शाळा असल्याने त्यांनी मुला-मुलींना शाळेचे प्राथमिक धडे घेण्यासाठी धाडले. कारण घराजवळच हायस्कूल व मराठी शाळेत जाणारी इतरांची मुले-मुली पाहून आपलीपण मुले शिकली पाहिजेत. असा त्यांचा आग्रह होता; परंतु हा प्रपंच चालविताना त्यांना या व्यवसायात मुला-मुलींची फार मोठी मदत होऊ लागली. त्यामुळे त्यांची शिक्षणेही अर्धवट अवस्थेत राहिली.मुले-मुली मोठे झाल्यावर त्यांचे हात पिवळे करण्यासाठी वैजयंता यांची धावपळ फारच झाली. प्राप्त परिस्थितीवर मात करीत त्यांनी मुलांची लग्ने करून दिली. आज त्यांचा सुना, नातवंडे व परतुंडे यांचा गोतावळा पाहता त्यांनी आता आराम करावा, अशी अपेक्षा कुटुंबातील प्रत्येकाची आहे. कारण, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आजीने उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने जगावे, अशी नातवांची इच्छा आहे. मात्र, आपले हात-पाय हालतायत तोपर्यंत आपण हा व्यवसाय सुरूच ठेवणार, या मताशी ठाम आहेत. करंजाच्या फोकापासून सुरू केलेला व्यवसाय आता बांबू, कळक यापासून शिडी, टोपली, दुरडी, करंडे, केरसुणी, पाटी अशा वस्तू हाताने बनवून घराजवळच दुकान थाटले आहे. तालुक्यातील शेतकरी मंडळीसह नोकरदार, व्यावसायिक हे येथूनच लागणारे साहित्य खरेदी करून वैजयंता माने यांच्या या वयातील काबाडकष्टाचे कौतुक करतात.