शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

खेडच्या मैदानात ‘गॅस्ट्रो’चा ताप!

By admin | Updated: June 13, 2015 00:27 IST

राजकारण पेटले : निवडणुकीपूर्वी ‘उलट्या-जुलाब’ होऊ लागल्याने विरोधकांना कोलित

सातारा : खेड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या उंबरठ्यावर असतानाच गावामध्ये काही लोकांना उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागला आहे. अनेकांना सलाईन लावायला लागले तर अनेक जण अद्यापही खासगी दवाखान्यांसह सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहेत. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना आयते कोलित मिळाले असल्याने सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.सातारा शहराच्या पूर्वेला असणाऱ्या सुमारे सहा हजार लोकवस्तीच्या या गावात सध्या लोकांना उलट्या-जुलाबाचा त्रास होत आहे. अनेकांनी खासगी दवाखान्यांत उपचार घेतले. पाणी उकळून पिले जात आहे. सात ते आठ दिवसांपासून गावात हा प्रकार सुरु असताना ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ला माहिती मिळाल्यानंतर प्रतिनिधींनी गावात प्रत्यक्ष जाऊन लोकांशी चर्चा केली. अशोक फरांदे यांच्या दुकानासमोर काही ग्रामस्थ या साथीबाबत माहिती देताना म्हणाले की, गावात साथीचा आजार पसरला आहे. मात्र, आरोग्य विभागाचे लोक केवळ पाहणी करुन गेले. तसेच औषधांचे वाटपही केले नाही.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक फरांदे, सविता प्रवीण निगडे, रंजना शंकर पवार, शंकर नारायण पवार, संजय कदम, माधवी संजय कदम, नंदकुमार गुलाबराव यादव, विशाल नंदकुमार यादव, मंदाकिनी नंदकुमार यादव, जयश्री गुलाबराव निकम, दत्तात्रय निकम, मंगल मांडवे आदी १0 ते १५ जणांना उलट्या-जुलाबाचा त्रास झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. यापैकी आणखी काही जण अजूनही उपचार घेत आहेत. या उपचारांवर पैसे खर्च झाले. मात्र, ग्रामपंचायतीचे सरपंच भीमराव लोखंडे यांनी पाणी दूषित असल्याच्या आरोपाचे खंडण केले आहे. ग्रामपंचायतीच्या पाण्याची तपासणी करण्यात आली असून ते शुध्द आहे. साथ यायची असती तर ती संपूर्ण गावात यायला पाहिजे होती, ती केवळ एका आळीत आली आहे, असे ‘लोकमत’ शी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)