शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

शिरवळमध्ये तीन महिन्यांपासून पेटतोय कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST

शिरवळ : शिरवळमधील कचरा तीन महिन्यांपासून धुमसत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या कचरा प्रश्नाकडे सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाणीवपूर्वक ...

शिरवळ : शिरवळमधील कचरा तीन महिन्यांपासून धुमसत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या कचरा प्रश्नाकडे सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिरवळमधील सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाशांनी केला आहे.

आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ ही महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील शहर म्हणून ओळखले जाते. शिरवळ ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराचा फटका शिरवळकरांना बसला असून कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतीतर्फे शिरवळचा कचरा सटवाई कॉलनी व फुलमळ्यालगत असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, पाटबंधारे विभागाच्या जागेत अनधिकृतपणे टाकण्यात येत आहे. कचऱ्याला अचानकपणे आग लागून परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण होत आहेत.

ग्रामपंचायतीने येथील कचरा प्रकल्प दुसरीकडे हलवावा, या मागणीचा ठराव ग्रामसभा व विविध मार्गे ग्रामपंचायत सदस्यांसह रहिवाशांनी शिरवळ ग्रामपंचायतीकडे अनेकदा करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. कचरा डेपो तीन महिन्यांपासून धुमसत असतानाही शिरवळ ग्रामपंचायतीकडून जाणीवपूूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाशांनी केला आहे.

फुलमळ्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या पाण्याच्या बंधाऱ्यामध्ये शिरवळ ग्रामपंचायतीकडून कचरा टाकला जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. येथील विहिरीसह बंधारा व स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

हा कचरा मांड ओढ्यामार्गे चक्क नीरा नदीमध्ये जात असतानाही गांधारीच्या भूमिकेत असणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही दखल न घेतली गेल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. यावेळी कचरा प्रश्न पेटलेला असताना शिरवळ ग्रामपंचायतीकडून शिरवळ परिसरातील रहिवाशांकरिता ओला कचरा -सुका कचरा वेगळे करण्याची घोषणा ध्वनीक्षेपकावरुन करण्यात आली असताना मात्र ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात न आल्याने घोषणा हवेतच राहिली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून पेटणाऱ्या समस्येकडे जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणी निवदेनाद्वारे केली आहे.

चौकट

बंधारा, स्मशानभूमीसह विहिरींचे अस्तित्व धोक्यात

शिरवळ येथील कचरा तीन महिन्यांपासून पेटलेला असल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे येथील बंधारा, स्मशानभूसह विहिरींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. येथील एका वसाहतीतील रहिवाशांसह सटवाई कॉलनी व फुलमळा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कोट

शिरवळ येथील कचऱ्याबाबत वारंवार ठराव व लेखी मागणी करूनही शिरवळ ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याकडे प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

- ज्योती चव्हाण,

ग्रामपंचायत सदस्या, शिरवळ

फोटो ०८शिरवळ

शिरवळ येथील कचरा तीन महिन्यांपासून पेटलेला असून, धुरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (छाया : मुराद पटेल, शिरवळ)