शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळमध्ये तीन महिन्यांपासून पेटतोय कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST

शिरवळ : शिरवळमधील कचरा तीन महिन्यांपासून धुमसत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या कचरा प्रश्नाकडे सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाणीवपूर्वक ...

शिरवळ : शिरवळमधील कचरा तीन महिन्यांपासून धुमसत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या कचरा प्रश्नाकडे सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिरवळमधील सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाशांनी केला आहे.

आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ ही महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील शहर म्हणून ओळखले जाते. शिरवळ ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराचा फटका शिरवळकरांना बसला असून कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतीतर्फे शिरवळचा कचरा सटवाई कॉलनी व फुलमळ्यालगत असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, पाटबंधारे विभागाच्या जागेत अनधिकृतपणे टाकण्यात येत आहे. कचऱ्याला अचानकपणे आग लागून परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण होत आहेत.

ग्रामपंचायतीने येथील कचरा प्रकल्प दुसरीकडे हलवावा, या मागणीचा ठराव ग्रामसभा व विविध मार्गे ग्रामपंचायत सदस्यांसह रहिवाशांनी शिरवळ ग्रामपंचायतीकडे अनेकदा करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. कचरा डेपो तीन महिन्यांपासून धुमसत असतानाही शिरवळ ग्रामपंचायतीकडून जाणीवपूूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाशांनी केला आहे.

फुलमळ्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या पाण्याच्या बंधाऱ्यामध्ये शिरवळ ग्रामपंचायतीकडून कचरा टाकला जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. येथील विहिरीसह बंधारा व स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

हा कचरा मांड ओढ्यामार्गे चक्क नीरा नदीमध्ये जात असतानाही गांधारीच्या भूमिकेत असणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही दखल न घेतली गेल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. यावेळी कचरा प्रश्न पेटलेला असताना शिरवळ ग्रामपंचायतीकडून शिरवळ परिसरातील रहिवाशांकरिता ओला कचरा -सुका कचरा वेगळे करण्याची घोषणा ध्वनीक्षेपकावरुन करण्यात आली असताना मात्र ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात न आल्याने घोषणा हवेतच राहिली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून पेटणाऱ्या समस्येकडे जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणी निवदेनाद्वारे केली आहे.

चौकट

बंधारा, स्मशानभूमीसह विहिरींचे अस्तित्व धोक्यात

शिरवळ येथील कचरा तीन महिन्यांपासून पेटलेला असल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे येथील बंधारा, स्मशानभूसह विहिरींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. येथील एका वसाहतीतील रहिवाशांसह सटवाई कॉलनी व फुलमळा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कोट

शिरवळ येथील कचऱ्याबाबत वारंवार ठराव व लेखी मागणी करूनही शिरवळ ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याकडे प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

- ज्योती चव्हाण,

ग्रामपंचायत सदस्या, शिरवळ

फोटो ०८शिरवळ

शिरवळ येथील कचरा तीन महिन्यांपासून पेटलेला असून, धुरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (छाया : मुराद पटेल, शिरवळ)