शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

गणेशोत्सवात नेत्यांचे फ्लेक्स सुने-सुने!

By admin | Updated: August 28, 2014 22:22 IST

सातारा : आचारसंहितेचा फटका इच्छुक उमेदवारांना

सातारा : गणेशोत्सव हा अलीकडे राजकीय व्यासपीठ बनू पाहत आहे. या-ना त्या कारणाने नेतेमंडळी झळकत असतात. विशेषत: पक्षाचे कार्य आणि शुभेच्छाचे फलक ठिकठिकाणी गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळतात. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांतच लागू होत असल्यामुळे नेत्यांना आचारसंहितेचा फटका बसणार आहे. साहजिकच यंदा गणेशोत्सव कालावधीत शहरातील फलक नेतेमुक्त दिसतील. दरवर्षी गणेशोत्सव आला की, नेतेमंडळींना हुरूप चढत असतो. गणेशोत्सवात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा खटाटोप सुरू असतो. फलकाद्वारे पक्षाची आणि स्वत:ची भूमिका मांडून एकप्रकारे नेतेमंडळी गणेशोत्सवाचा प्रचाराचे साधन म्हणून वापर करून घेत असतात. त्यामुळे खास करून नेतेमंडळींना गणेशोत्सव हवाहवासा वाटत असतो.यंदा मात्र नेत्यांच्या उत्सवावर पाणी फिरण्याची शक्यता वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांतच लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही नेत्यांना फलकावर झळकण्याची संधी मिळणार नाही. त्यातूनही काही नेतेमंडळी कायद्याची पळवाट शोधत असतात. गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बनवलेल्या फलकावर कुठेतरी कोपऱ्यात एखाद्या नेत्याचा छोटासा फोटो छापला जातो. मात्र, अशा फोटोवरही आचारसंहिता पथकाची करडी नजर असणार आहे. एवढेच नव्हे तर पक्षाची चिन्हे, निवडणूक चिन्ह वापरण्यासही बंदी असते; परंतु काहीजण बिनधास्त अशा प्रकारच्या चिन्हांचे प्रदर्शन करत असतात. पोलीस आणि आचारसंहिता पथक अशा बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवणार आहे.काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही अनेकजणांनी अचारसंहितेचा भंग केल्याची उदाहरणे आहेत. त्यावेळी काहीजणांवर गुन्हेही नोंद झाले आहेत. कोणी स्वत:च्या गाडीवर पक्षाचे चिन्ह लावतो तर कोणी डोक्यात पक्षाच्या चिन्हाची टोपी घालून आचारसंहितेचा भंग करत असतो. लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात एकूण १३ आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतून मिळालेला धडा आता विधानसभा निवडणुकीत तरी कार्यकर्ते व नेत्यांनी घ्यावा, एवढीच अपेक्षा पोलिसांची आहे. त्यादृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)अनेकदा आचारसंहितेचे पालन न केल्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता अथवा पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होत असतात. मात्र यातील एकालाही अद्याप याप्रकरणी शिक्षा झाल्याचे कोणालाही ऐकीवात नाही. अचारसंहितेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे या प्रकरणाचे काय होते, याची सर्वसामान्यांना उत्सुकता असते. केवळ निवडणुकीपुरतेच अचारसंहिता गुन्ह्यांची चर्चा होते. कालांतराने हे सर्व विसरले जाते. आचारसंहितेचा भंग केल्याचे तहसीलदार आणि पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या फलकाचा फोटो काढला जातो. शहानिशा करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो. निवडणूककाळात कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन करावे.-राजीव मुठाणे पोलीस निरीक्षक