शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : खोबरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST

कोपर्डे हवेली : ‘देव हा श्रध्देचा आणि आस्थेचा विषय आहे. प्रत्येकवर्षी सण येत असतात. माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. गेलेला ...

कोपर्डे हवेली : ‘देव हा श्रध्देचा आणि आस्थेचा विषय आहे. प्रत्येकवर्षी सण येत असतात. माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. गेलेला जीव परत येणार नाही. त्यासाठी शासनाच्या नियमानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा,’ असे प्रतिपादन कऱ्हाड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे यांनी केले.

कोपर्डे हवेली येथील गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सरपंच नेताजी चव्हाण, सहायक फौजदार राजू महाडिक, प्रशांत ताळरेकर, लावंड, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, अमित पाटील, सुनील सरगडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव लाटे, सिध्दार्थ चव्हाण, शैलेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, भरत चव्हाण, उत्तम चव्हाण, अर्जुन चव्हाण, संदीप चव्हाण उपस्थित होते.

खोबरे म्हणाले, ‘चार फुटांच्यावर गणपती मूर्ती बसवू नये, रस्त्यावर मंडळांनी स्टेज घालू नये, पाचहून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, गावात एकच गणपती बसविण्याचा विचार करावा, जमा झालेल्या वर्गणीतून गावात सीसीटीव्ही बसवले, तर गावात गैरप्रकार बसण्यास आळा बसेल, शासनाच्या नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नेताजी चव्हाण, शिवाजी चव्हाण, अमित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव लाटे यांनी आभार मानले.

फोटो ०२कोपर्डे हवेली

कोपर्डे हवेली येथील गणपती मंडळाच्या बैठकीत ए. टी. खोबरे यांचे भाषण झाले.