शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

गमेवाडीचा यंत्रमाग कारखाना डबघाईला

By admin | Updated: September 4, 2014 00:08 IST

कच्च्या मालाचा अभाव : महामंडळाचे अधिकारी तुपाशी तर कामगार मरतोय उपाशी

चाफळ : राज्य यंत्रमाग महामंडळाने दतक घेतलेल्या पाटण तालुक्यातील गमेवाडी (चाफळ) ता.पाटण येथील यंत्रमाग प्रकल्प स्थानिक प्रशासन व यंत्रमाग महामंडळ यांच्या गलथान कारभारामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे येथील स्थानिक कामगार बेरोजगार बनुन त्यांच्यावर उपासमारच्ीीाी वेळ येऊ न ठेपली आहे. एकंदरीत महामंडळाचे अधिकारी तुपाशी व कामगार उपाशी अशी चर्चा परिसरात सुरु आहे. तीथक्षेत्र चाफळ परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळून सर्वांना रोजगार मिळावा, या हेतूने १९७२ मध्ये मुंबईचे उद्योगपती अरविंंद शेठ मफतलाल यांनी गमेवाडीच्या ओसाड माळरानावर ४८० यंत्रमागांचा प्रकल्प सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केली असतानाच तत्कालीन राजकर्त्यांनी या प्रकल्पाचे तुकडे करुन चाफळ, कुठरे, कोळेवाडी, नांदगाव व कुंडल याठिकाणी प्रत्येकी ९६ यंत्रमाग असे स्वतंत्र पाच प्रकल्प सुरु केले. गमेवाडी (चाफळ), ता. पाटण येथील प्रकल्पामध्ये प्रत्येकी ४८ मागांच्या दोन स्थानिक सहकारी सोसायट्या स्थापन करुन त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य नेमून या प्रकल्पाचा सर्व कारभार सोसायट्यांच्या माध्यमातून व राज्ययंत्रमाग महामंडळ यांच्या आर्थिक सहकार्यातून सुरु होता. पण सध्या या सोसायट्यांचे अस्तित्व कोठेही दिसत नाही. किंवा या यंत्रमाग प्रकल्पासाठी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यामुळेच भरपूर निधी मिळूनही या प्रकल्पांचे आंधळं दळतंय अन् कुत्रं पीट खातंय अशी अवस्था झाली आहे. अविकसित भागाचा विकास हा केंद्रबिंंदू मानून उघोगधंद्याचे विकेंद्रिकरण करण्याकडे शासन भर देत असताना मात्र महामंडळाला कापड पुरवठा करण्याकरिता आरक्षण दिले आहे.त्यानुसार महाराष्ट्र राज्य प्रत्येक वर्षी उघोग संचालनालय यांच्यामार्फत शासकीय कार्यालयांना लागणाऱ्या वेगवेगळ्या कापडांची दर निश्चिती करते. गेल्या सात-आठ वर्षापासून या प्रकल्पातील कामगारांना पुरेशा प्रमाणात काम मिळत नसल्याने प्रकल्प चालू-बंद अवस्थेत सुरु आहे. यंत्रमाग महामंडळाने या व्यवसायातील तज्ज्ञ अनुभवी अधिकारी यांची नियुक्ती केली असताना प्रकल्पाची कामे सुरळीत चालण्याऐवजी डबघाईला कसे काय आले, असा सवाल करत येथील कामगार या परिस्थिला जबाबदार कोण? असा जाब विचारु लागले आहेत. याबाबत योग्य ती चौकशी करुन पाणी नेमकं कुठं मुरतंय हे शोधून आम्हा कामगारांना न्याय देण्याची माफक अपेक्षा कामगार व्यक्त करु लागले आहेत. (वार्ताहर)‘मलिदा’ लाटत असल्याचा आरोपसर्व शासकिय व निमशासकिय कार्यालयांना लागणाऱ्या कापडाचे उत्पादन या प्रकल्पाकडुनच करुन घेत असे पण सध्या या प्रकल्पातुन पुरेशा प्रमाणात कापड निर्र्मीती कच्च्यामाला अभावी होताना दिसत नाही.त्यामुळे या प्रकल्पाकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून बाहेरील नामधारी संस्थाकडून कापड खरेदी विक्री व्यवहार दाखवून मलिदा लाटण्याचा आरोप कामगार करु लागले आहेत. दोन्ही सोसायट्या तोट्यातया यंत्रमाग प्रकल्पाला सुरुवातीपासूनच महामंडळाकडून कापड निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कधीही पुरेशा प्रमाणात व वेळेवर न दिल्यामुळे याचा परिणाम कापड निर्मितीवर होऊन या दोन्ही सोसायट्या तोट्यात गेल्या आहेत. वर्षानुवर्षे संचित तोटा वाढत गेल्यामुळे हा प्रकल्प सध्या अखेरच्या घटका मोजत आहे.