शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

गमेवाडीचा यंत्रमाग कारखाना डबघाईला

By admin | Updated: September 4, 2014 00:08 IST

कच्च्या मालाचा अभाव : महामंडळाचे अधिकारी तुपाशी तर कामगार मरतोय उपाशी

चाफळ : राज्य यंत्रमाग महामंडळाने दतक घेतलेल्या पाटण तालुक्यातील गमेवाडी (चाफळ) ता.पाटण येथील यंत्रमाग प्रकल्प स्थानिक प्रशासन व यंत्रमाग महामंडळ यांच्या गलथान कारभारामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे येथील स्थानिक कामगार बेरोजगार बनुन त्यांच्यावर उपासमारच्ीीाी वेळ येऊ न ठेपली आहे. एकंदरीत महामंडळाचे अधिकारी तुपाशी व कामगार उपाशी अशी चर्चा परिसरात सुरु आहे. तीथक्षेत्र चाफळ परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळून सर्वांना रोजगार मिळावा, या हेतूने १९७२ मध्ये मुंबईचे उद्योगपती अरविंंद शेठ मफतलाल यांनी गमेवाडीच्या ओसाड माळरानावर ४८० यंत्रमागांचा प्रकल्प सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केली असतानाच तत्कालीन राजकर्त्यांनी या प्रकल्पाचे तुकडे करुन चाफळ, कुठरे, कोळेवाडी, नांदगाव व कुंडल याठिकाणी प्रत्येकी ९६ यंत्रमाग असे स्वतंत्र पाच प्रकल्प सुरु केले. गमेवाडी (चाफळ), ता. पाटण येथील प्रकल्पामध्ये प्रत्येकी ४८ मागांच्या दोन स्थानिक सहकारी सोसायट्या स्थापन करुन त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य नेमून या प्रकल्पाचा सर्व कारभार सोसायट्यांच्या माध्यमातून व राज्ययंत्रमाग महामंडळ यांच्या आर्थिक सहकार्यातून सुरु होता. पण सध्या या सोसायट्यांचे अस्तित्व कोठेही दिसत नाही. किंवा या यंत्रमाग प्रकल्पासाठी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यामुळेच भरपूर निधी मिळूनही या प्रकल्पांचे आंधळं दळतंय अन् कुत्रं पीट खातंय अशी अवस्था झाली आहे. अविकसित भागाचा विकास हा केंद्रबिंंदू मानून उघोगधंद्याचे विकेंद्रिकरण करण्याकडे शासन भर देत असताना मात्र महामंडळाला कापड पुरवठा करण्याकरिता आरक्षण दिले आहे.त्यानुसार महाराष्ट्र राज्य प्रत्येक वर्षी उघोग संचालनालय यांच्यामार्फत शासकीय कार्यालयांना लागणाऱ्या वेगवेगळ्या कापडांची दर निश्चिती करते. गेल्या सात-आठ वर्षापासून या प्रकल्पातील कामगारांना पुरेशा प्रमाणात काम मिळत नसल्याने प्रकल्प चालू-बंद अवस्थेत सुरु आहे. यंत्रमाग महामंडळाने या व्यवसायातील तज्ज्ञ अनुभवी अधिकारी यांची नियुक्ती केली असताना प्रकल्पाची कामे सुरळीत चालण्याऐवजी डबघाईला कसे काय आले, असा सवाल करत येथील कामगार या परिस्थिला जबाबदार कोण? असा जाब विचारु लागले आहेत. याबाबत योग्य ती चौकशी करुन पाणी नेमकं कुठं मुरतंय हे शोधून आम्हा कामगारांना न्याय देण्याची माफक अपेक्षा कामगार व्यक्त करु लागले आहेत. (वार्ताहर)‘मलिदा’ लाटत असल्याचा आरोपसर्व शासकिय व निमशासकिय कार्यालयांना लागणाऱ्या कापडाचे उत्पादन या प्रकल्पाकडुनच करुन घेत असे पण सध्या या प्रकल्पातुन पुरेशा प्रमाणात कापड निर्र्मीती कच्च्यामाला अभावी होताना दिसत नाही.त्यामुळे या प्रकल्पाकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून बाहेरील नामधारी संस्थाकडून कापड खरेदी विक्री व्यवहार दाखवून मलिदा लाटण्याचा आरोप कामगार करु लागले आहेत. दोन्ही सोसायट्या तोट्यातया यंत्रमाग प्रकल्पाला सुरुवातीपासूनच महामंडळाकडून कापड निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कधीही पुरेशा प्रमाणात व वेळेवर न दिल्यामुळे याचा परिणाम कापड निर्मितीवर होऊन या दोन्ही सोसायट्या तोट्यात गेल्या आहेत. वर्षानुवर्षे संचित तोटा वाढत गेल्यामुळे हा प्रकल्प सध्या अखेरच्या घटका मोजत आहे.