शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जाधववाडी ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 14:55 IST

फलटण शहरात डेंग्यू, चिकुण गुनियासारख्या आजाराने धुमाकूळ घातला असताना शहरालगत जाधववाडी येथील ग्रामपंचायत वाहती गटारे बंदिस्त करण्याची योजना मंजूर असूनही याचे काम प्रलंबित ठेवून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजाधववाडी ग्रामस्थांमधून तीव्र संतापाची भावना गटविकास अधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा मोर्चा काढूआरोग्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, ग्रामस्थांमधून मागणी

फलटण ,दि. २५ :  शहरात डेंग्यू, चिकुण गुनियासारख्या आजाराने धुमाकूळ घातला असताना शहरालगत जाधववाडी येथील ग्रामपंचायत वाहती गटारे बंदिस्त करण्याची योजना मंजूर असूनही याचे काम प्रलंबित ठेवून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

जाधववाडी ग्रामपंचायत हद्दीतील बिरदेवनगर व अन्नपूर्णा मंदिर येथील गटाराच्या कामाच्या निविदा २०१६ मध्ये मंजूर करण्यात आल्या असूनही अद्यापपर्यंत या कामाचे कार्यादेश देण्यात आले नसल्याने प्रभाग क्रमांक १ व ४ मधील वाहती गटारे आरोग्यदृष्ट्या धोकादायक बनली आहे

 फलटण पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यानी याबाबत ग्रामसेवकांना योग्य आदेश देऊन ही कामे तातडीने सुरू करावीत आणि गटारांचे तुंबलेले पाणी व त्याभोवती वाढलेली झुडपे त्यातून ग्रामस्थांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका त्वरित दूर करावा, अशी मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांनी यापूवीर्ही गटविकास अधिकाऱ्यांकडे सुमारे तीन वर्षांपासून लेखी व तोंडी तक्रारी करून येथील रहिवाशांच्या घरातील सांडपाणी गटारे नसल्याने रस्त्यावर येत असून, ते रिकाम्या प्लॉटवर किंवा अन्य खुल्या जागेवर, घराच्या भिंतीलगत साठून राहत असल्याने त्यातून दुर्गंधी बरोबरच आरोग्याला धोका निर्माण होणारी परिस्थिती उद्भवली असून, यापूर्वी या भागातील गटारांसाठी ई टेंडरद्वारे टेंडर्स मागवून १७ लाख रुपयांची कामे करण्याचे नियोजन केले आहे.  मात्र प्रत्यक्षात या कामाचे आदेश (वर्क आॅर्डर) संबंधित ठेकेदारांना दिली गेली नसल्याने काम सुरूच झाले नाही.

दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे गटाराच्या साठलेल्या पाण्यात भर पडली असून, त्याभोवती मोठ्या प्रमाणात वनस्पती उगवली आहे. तसेच ही सर्व साठलेल्या पाण्याच्या ठिकाणे जंतूनिर्मितीची केंद्रे बनली असून, ग्रामस्थांनी आता याबाबत कोणाकडे दाद मागावी, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याने पंचायत समिती, गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा येथील ग्रामस्थांंना पंचायत समितीवर मोर्चा काढून मागणी सर्वांसमोर ठेवावी लागणार आहे.

आरोग्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा..गतवर्षी मार्च महिन्यात कर वसुलीच्यावेळी ग्रामस्थांनी गटारे झाल्याशिवाय कर भरण्यास नकार दिल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवकांनी काम मंजूर झाले असून, तातडीने गटारे बांधण्यात येणार असल्याचे सांगून करवसुली करून घेतली. मात्र त्यानंतर या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करीत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रश्नात लक्ष घालून जाधववाडी ग्रामस्थांच्या आरोग्याचा हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाHealthआरोग्य