शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

निधी उपलब्ध; तरीही काम होईना

By admin | Updated: January 12, 2016 00:30 IST

प्रशासनाची दिरंगाई : गाढवेवाडी तलावाचे काम रखडले; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

वाई : तालुक्यातील गाढवेवाडी येथील ग्रामस्थांनी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कारण येथील पाझर तलावाचे काम रखडले आहे. या अपूर्ण कामासाठी आंदोलनाचा इशारा देत प्रांताधिकारी अस्मिता मोरे व सातारा येथील लघू पाटबंधारे खात्याला निवेदनही दिले आहे. दरम्यान, येथील तलावाच्या कामासाठी निधी उपलब्ध असतानाही प्रशासनाच्या उदासीपणाचा फटका सर्वांना बसत आहे. गाढवेवाडीच्या पाझर तलावासाठी ९२ लाखांचा निधी मंजूर झाला असून, भूसंपादनासाठीचा पाच लाखांचा निधीही जमा झाला आहे. पाझर तलावासाठी लागणारी जमीनही संपादित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची संमती असतानाही लघू पाटबंधारे खात्याच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नाही. तसेच अद्याप पाझर तलावाचे काम अर्धवट स्थितीत पडून आहे़ त्यामुळे पाझर तलावाच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाझर तलावाच्या कामात एका शेतकऱ्याने अडथळा आणला आहे. एकाच्या विरोधामुळे संपूर्ण गावाला वेठीस धरण्यात आले आहे. धोम परिसरात डोंगरावर अतिशय दुर्गम भागात गाढवेवाडी येते. समोर धोम धरणाचे अथांग पाणी दिसत असतानाही वाई तालुक्यात गाढवेवाडीला सर्वात आधी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा लागतो. ही दुर्दैवी बाब आहे. एकाच्या हितासाठी गावाला वेठीस धरणे ही प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईचे समर्थन केल्यासारखेच आहे. पाटबंधारे खात्याने गांभीर्याने त्वरित पिणे व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाझर तलावाचे काम सुरू करून न्याय द्यावा; अन्यथा ग्रामस्थ २६ जानेवारीला तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याची सर्व जबाबदारी संबंधित विभागाची असेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे़ या निवेदनावर माजी सरपंच रवींद्र भिलारे, बळवंत सणस, आनंदराव सणस, बापूराव सणस, मारुती चिकणे, भरत चिकणे, आबासाहेब चिकणे, जिजाबा चिकणे, प्रभाकर जाधव, तुकाराम पवार, मारुती चिकणे, एकनाथ जाधव, मनीषा चिकणे, उषा चिकणे, शोभा सणस, मंगल सणस आदींच्या सह्या आहेत. निवेदन देण्यासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्यने उपस्थित होते. (प्रतिनिधी) प्रांत म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेला आहे. ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेवरून या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे लक्षात आले आहे. पाझर तलावामुळे या गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा संपणार असेल तसेच महसूल विभागाकडून कोणतीही दिरंगाई झाली असल्यास मी स्वत: लक्ष घालून तलावाच्या कामाचा प्रश्न मार्गी लावणार आहे. - अस्मिता मोरे, प्रांताधिकारी वाई प्रशासनाने तातडीने पावले उचण्याची गरज शेतकऱ्यांनाही पाण्याचे महत्त्व माहीत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या जमिनी गावाच्या हितासाठी प्रकल्पाला देत असतात; पण प्रशासनाच्या कासवगतीमुळे शेतकऱ्यांची कुंचबणा होत आहे. हे टाळण्यासाठी संबंधित विभागाने अशा प्रकारच्या प्रकल्पांमधील अडचण त्वरित दूर करून त्या मार्गी लावल्यास प्रकल्पांचा खर्चही वाढणार नाही व शेतकऱ्यांची कुंचबणाही होणार नाही़, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. अभियंत्यांकडून अरेरावीची भाषा... ग्रामस्थ साताऱ्याच्या लघू पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी ग्रामस्थांना उद्धट व अरेरावीची भाषा वापरण्यात आली. गावाचे प्रश्न गावपातळीवर सोडवावेत. आम्हाला नवरा-बायकोचे भांडण सोडविण्यास भाग पाडता का? असा सवाल करण्यात आला. तुमचा प्रश्न न्यायालयीन आहे. तो तिथूनच सोडवून घ्यावा. असे उद्धट उत्तर देत ग्रामस्थांना हाकलून लावले.- रवींद्र भिलारे, गाढवेवाडी माजी सरपंच