शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

निधी उपलब्ध; तरीही काम होईना

By admin | Updated: January 12, 2016 00:30 IST

प्रशासनाची दिरंगाई : गाढवेवाडी तलावाचे काम रखडले; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

वाई : तालुक्यातील गाढवेवाडी येथील ग्रामस्थांनी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कारण येथील पाझर तलावाचे काम रखडले आहे. या अपूर्ण कामासाठी आंदोलनाचा इशारा देत प्रांताधिकारी अस्मिता मोरे व सातारा येथील लघू पाटबंधारे खात्याला निवेदनही दिले आहे. दरम्यान, येथील तलावाच्या कामासाठी निधी उपलब्ध असतानाही प्रशासनाच्या उदासीपणाचा फटका सर्वांना बसत आहे. गाढवेवाडीच्या पाझर तलावासाठी ९२ लाखांचा निधी मंजूर झाला असून, भूसंपादनासाठीचा पाच लाखांचा निधीही जमा झाला आहे. पाझर तलावासाठी लागणारी जमीनही संपादित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची संमती असतानाही लघू पाटबंधारे खात्याच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नाही. तसेच अद्याप पाझर तलावाचे काम अर्धवट स्थितीत पडून आहे़ त्यामुळे पाझर तलावाच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाझर तलावाच्या कामात एका शेतकऱ्याने अडथळा आणला आहे. एकाच्या विरोधामुळे संपूर्ण गावाला वेठीस धरण्यात आले आहे. धोम परिसरात डोंगरावर अतिशय दुर्गम भागात गाढवेवाडी येते. समोर धोम धरणाचे अथांग पाणी दिसत असतानाही वाई तालुक्यात गाढवेवाडीला सर्वात आधी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा लागतो. ही दुर्दैवी बाब आहे. एकाच्या हितासाठी गावाला वेठीस धरणे ही प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईचे समर्थन केल्यासारखेच आहे. पाटबंधारे खात्याने गांभीर्याने त्वरित पिणे व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाझर तलावाचे काम सुरू करून न्याय द्यावा; अन्यथा ग्रामस्थ २६ जानेवारीला तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याची सर्व जबाबदारी संबंधित विभागाची असेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे़ या निवेदनावर माजी सरपंच रवींद्र भिलारे, बळवंत सणस, आनंदराव सणस, बापूराव सणस, मारुती चिकणे, भरत चिकणे, आबासाहेब चिकणे, जिजाबा चिकणे, प्रभाकर जाधव, तुकाराम पवार, मारुती चिकणे, एकनाथ जाधव, मनीषा चिकणे, उषा चिकणे, शोभा सणस, मंगल सणस आदींच्या सह्या आहेत. निवेदन देण्यासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्यने उपस्थित होते. (प्रतिनिधी) प्रांत म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेला आहे. ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेवरून या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे लक्षात आले आहे. पाझर तलावामुळे या गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा संपणार असेल तसेच महसूल विभागाकडून कोणतीही दिरंगाई झाली असल्यास मी स्वत: लक्ष घालून तलावाच्या कामाचा प्रश्न मार्गी लावणार आहे. - अस्मिता मोरे, प्रांताधिकारी वाई प्रशासनाने तातडीने पावले उचण्याची गरज शेतकऱ्यांनाही पाण्याचे महत्त्व माहीत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या जमिनी गावाच्या हितासाठी प्रकल्पाला देत असतात; पण प्रशासनाच्या कासवगतीमुळे शेतकऱ्यांची कुंचबणा होत आहे. हे टाळण्यासाठी संबंधित विभागाने अशा प्रकारच्या प्रकल्पांमधील अडचण त्वरित दूर करून त्या मार्गी लावल्यास प्रकल्पांचा खर्चही वाढणार नाही व शेतकऱ्यांची कुंचबणाही होणार नाही़, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. अभियंत्यांकडून अरेरावीची भाषा... ग्रामस्थ साताऱ्याच्या लघू पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी ग्रामस्थांना उद्धट व अरेरावीची भाषा वापरण्यात आली. गावाचे प्रश्न गावपातळीवर सोडवावेत. आम्हाला नवरा-बायकोचे भांडण सोडविण्यास भाग पाडता का? असा सवाल करण्यात आला. तुमचा प्रश्न न्यायालयीन आहे. तो तिथूनच सोडवून घ्यावा. असे उद्धट उत्तर देत ग्रामस्थांना हाकलून लावले.- रवींद्र भिलारे, गाढवेवाडी माजी सरपंच