शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

सिध्दनाथवाडीकरांना निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST

वाई : ‘सिद्धनाथवाडीतील धनगर समाजाचे कुलदैवत असणारे बिरोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले होते. गतवर्षीच्या वाई ...

वाई : ‘सिद्धनाथवाडीतील धनगर समाजाचे कुलदैवत असणारे बिरोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले होते. गतवर्षीच्या वाई नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत या समाजाला या मंदिराच्या सभागृहाचे काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण झाला असून, त्याची आज वचनपूर्ती, कर्तव्यपूर्तीचा आनंद झाला आहे,’ असे उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.

वाई येथील बिरोबा मंदिराचा जीर्णोद्धार नगरोत्थानमधून ३३ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार, नगराध्यक्ष अनिल सावंत, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप बाबर, नगरसेवक भारत खामकर, राजेश गुरव, चरण गायकवाड, कांताराम जाधव, कार्यक्रमाच्या संयोजक रेश्मा प्रदीप जायगुडे, नगरपालिकेचे बांधकाम अभियंता, सचिन धेंडे, मोहन काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘वाई नगरपालिका कारभार करीत असताना गेले पाच राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एका मताने पडल्याची खंत असून, शहराचा विकास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले; परंतु थोड्या दिवसांसाठी आपल्याकडे नगराध्यक्षपद आल्याने विकासकामाला वेग आला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने वाई शहरासाठी लागणारा करोडो रुपयांचा विकास निधी आणण्यात यश आले आहे. शहरातील प्रवेशव्दारावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. वाई शहरातील विकास कामात कोरोनाची महाभयंकर लाट असताना खंड पडलेला नाही.’

प्रास्ताविकात नगरसेविका रेश्मा जायगुडे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. यावेळी नानासाहेब दोरकाटे, संजय चव्हाण, प्रदीप जायगुडे, विष्णू बरकडे, विलास देशमुख, ॲड. रवींद्र भोसले, लक्ष्मणराव खरात, नारायण बरकडे, बापूराव खरात, जयवंत कचरे, सुधीर खरात, अशोकराव सूर्यवंशी, युगल घाडगे, शंकर वाघ, सुनील चौधरी या ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संदीप प्रभाळे यांनी सूत्रसंचालन केले. अशोकराव खरात यांनी आभार मानले.