शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

Fuel price hike : ऊस वाहतुकीलाही फटका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 13:58 IST

संजय कदम  वाठार स्टेशन : दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाई व इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिमाण शेतीशी निगडीत असलेल्या उद्योगांवर झाला ...

संजय कदम वाठार स्टेशन : दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाई व इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिमाण शेतीशी निगडीत असलेल्या उद्योगांवर झाला आहे. राज्यात सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर चालणारा साखर उद्योग ही वाढत्या इंधन दरामुळे अडचणीत सापडला आहे. मुळात साखर कारखान्यांना तोडणी व  ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाल्याने वाहतूक दर वाढविण्याची मागणी ऊस वाहतूकदार करत आहेत.

साखर कारखाना आणि वाहतूकदार दर तीन वर्षांतून एकदा तोडणी आणि वाहतूक दरात वाढ करतात. त्याप्रमाणे दोन वर्षांपूर्वी तोडणी करणाऱ्या लोकांनी संप केल्यानंतर त्यांना ३५ टक्के तोडणी दर वाढ मिळाली. मात्र गेल्या दोन वर्षांत वाहतूकदारांना मात्र वाहतूक वाढ मिळाली नाही. राज्यात तोडणी दर हा सर्वत्र एकच असला तरी वाहतूक दर मात्र सर्व कारखाने वेगवेगळे देतात. एकूणच तोडणी, वाहतुकीसाठी दिला जाणारा दर हा शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एफआरपीमधून दिला जात असल्याने याचा फटका राज्यातील २० लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतो.

दोन वर्षांपूर्वी डिझेल ६५ रुपये लिटर होते. त्यानुसार वाहतूकदारांना वाहतूक दिली जात होती. आज डिझेल दर ९४ रुपये असतानाही जिल्ह्यातील अनेक कारखाने ६५ ते ७५ रुपये दराने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना दर देत आहेत. तो कोणत्याही प्रकारे या वाहनधारकांना परवडत नाही.  वाहतुकदारांची देखील आर्थिक घडी महागाईमुळे विस्कटली आहे. त्यामुळे दरवाढीची मागणी होऊ लागली आहे.

ऊस वाहतुकीचे मोडले कंबरडे

दरवर्षी सर्वच कारखाने ऊसतोडणी वाहतुकीचा संयुक्त करार करतात. त्यानुसार ऊस वाहतूकदारांना करार बद्ध केले जाते. हे करार कारखाना बंद झाल्यावर केले जात असल्याने त्यावेळी असलेल्या इंधन दरानुसार वाहतूक दर निश्चित होतात. मात्र सध्या डिझेल दरातील झालेली दर वाढ ऊस वाहतुकीचे कंबरडे मोडणारी आहे. यातून वाहनधारकांना कारखान्याकडून  दिलासा मिळणे गरजेचे आहे.

दर तीन वाहतुकीनंतर ऊसतोडणी वाहतूक दरात वाढ केली जाते. दोन वर्षांपूर्वी तोडणी दरात वाढ करण्यात आली. मात्र वाहतूकदर जुनेच असल्याने सध्या ऊस वाहतूक करणं कठीण आहे. यासाठी वाहतूक दरात वाढ करावी. - अमर कणसे, ऊस वाहतूकदार

टॅग्स :Satara areaसातारा परिसर