शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

वारीत मोफत केस अन् दाढी; वारकऱ्यांची अनोखी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:02 IST

तरडगाव : दिवसेंदिवस माउलींच्या पालखी सोहळ्याला जस मोठं स्वरूप प्राप्त होत आहे, तसा त्याची सेवा करणारा वर्गदेखील वाढत आहे. या काळात वारकºयांना ‘साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ या मनोभावे वेगवेगळ्या मार्गाने दानधर्म करणारी मंडळी दिसतात. अशीच सेवा फलटण तालुक्यातील एक सलून कारागीर गेल्या वीस वर्षांपासून करीत आहे. पालखी ...

तरडगाव : दिवसेंदिवस माउलींच्या पालखी सोहळ्याला जस मोठं स्वरूप प्राप्त होत आहे, तसा त्याची सेवा करणारा वर्गदेखील वाढत आहे. या काळात वारकºयांना ‘साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ या मनोभावे वेगवेगळ्या मार्गाने दानधर्म करणारी मंडळी दिसतात. अशीच सेवा फलटण तालुक्यातील एक सलून कारागीर गेल्या वीस वर्षांपासून करीत आहे. पालखी सोहळ्यासाठी येणाºया वारकºयांनी या कारागिराकडून केस, दाढी मोफत करण्याची परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे.संदीप सुभाष पवार ऊर्फ संजू असं या फलटण तालुक्यातील कारागिराचं नाव आहे. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ४३ वर्षीय संजू यांनी सुरुवातीला वडिलांकडेच ही कला शिकली. त्यानंतर काही दिवस फलटणला काकांकडे सराव केला. त्यानंतर आपल्या गावात १९९५ रोजी कर्ज काढून त्यांनी दुकान सुरू केले.दरवर्षी गावातून जाणाºया पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकºयांची सेवा लोक करतात मग आपणसुद्धा आपल्या व्यवसायातून का होईना थोडासा हातभार लावू या, असा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर १९९७ मध्ये दरवर्षी पालखी काळात वारीतील सहभागी वारकºयांची केस अन् दाढी मोफत करण्याचा संकल्प करून प्रत्यक्षात तो कृतीत उतरविला.पालखी ज्यावेळी लोणंद व तरडगाव या ठिकाणी असते ते दोन दिवस संजू वारकºयांच्या सेवेत व्यस्त असतात. दरम्यानच्या काळात तो गावातील रोखीच गिºहाईकसुद्धा घेत नाही.शनिवारी गावात पालखी दाखल होण्यापूर्वी आदल्या दिवसापासून या कारागिराने आपल्या संकल्पानुसार कामास सुरुवात केली होती. गेली वीस वर्षे पालखी काळातील दोन दिवस केस-दाढीचे पैसे घेत नसल्याने दरवर्षी त्यांच्याकडेच जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद आदी ठिकाणांहून येणाºया भाविकांची चांगली ओळख झाली आहे. ते लोकदेखील त्यांच्याकडे आवर्जून येतात.संदीप पवार यांनी अनेक वर्षांपासून जपलेल्या वारकºयांच्या अनोख्या सेवेचे ग्रामस्थांमधून कौतुक करण्यात आले आहे.खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्नआळंदीहून विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या दिशेने निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही, अशी मंडळी वारीतील वारकºयांची आपापल्या परीने सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे मोफत दाढी व केस कापण्यात येत आहे.साबण अन् तेलाचेही वाटपवारकरी घर सोडून कित्येक दिवस झाले आहेत. या प्रवासात ते जास्त ओझे घेऊन जाऊ शकत नाहीत. ज्यांच्याकडे ट्रकसारखे वाहने आहेत. ते ट्रकमध्ये साहित्य ठेवतात. परंतु ज्येष्ठ नागरिक, महिलांना साहित्य घेऊन चालत जाणे शक्य होत नाही. ही समस्या ओळखून काहीजण वारकºयांना तेल, साबण यासारखे साहित्यही मोफत देत आहेत.