शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

रक्कम दामदुप्पट करून देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:05 IST

लोणंद : येथील रयल वेज मार्केटिंग बिजनेस या कंपनीत पैशाला ज्यादा व्याज व दामदुप्पट मिळावे म्हणून सातारा येथील सूर्यवंशी ...

लोणंद : येथील रयल वेज मार्केटिंग बिजनेस या कंपनीत पैशाला ज्यादा व्याज व दामदुप्पट मिळावे म्हणून सातारा येथील सूर्यवंशी कॉलनी करंजे तर्फ सातारा येथे राहणाऱ्या सीमा सुनील धनावडे यांनी टप्प्याटप्प्याने २ लाख ७० हजार रुपये भरले. त्यापैकी केवळ २६ हजार रुपये त्यांना परत केले आहेत. २ लाख ४४ हजार रुपये देण्यास कंपनीकडून टाळाटाळ होत आहे, याबाबत धनावडे यांनी फिर्याद दिली. फसवणूकप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये कंपनीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सीमा धनावडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पाच वर्षांपासून माउली बचत गट आहे. त्यामध्ये उज्ज्वला महादेव निकम (रा. एमआयडीसी अमरलक्ष्मी बसस्टॉप कोडोली सातारा) या सभासद होत्या. जानेवारी २०२० मध्ये त्यांनी बोलावून सांगितले की ‘मी लोणंदच्या रयल वेज मार्केटिंग बिजनेस या कंपनीत २ लाख १७ हजार रुपये भरले. त्याचे दररोज १ टक्के व्याजदराने मला ४० हजार रुपये मिळाले. कंपनीत पैसे बुडत नाहीत. तुम्हीही गुंतवणूक करा.’ त्यानंतर चौघेजण घरी आले. त्यांनी ‘पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. मी पैसे भरले नाहीत. सप्टेबरमध्ये त्यांनी मला वारंवार विनवण्या केल्याने उज्ज्वला निकम, विशाल वाघ हे माझ्या घरी आल्याने सुरुवातीस ५० हजार रुपये रोख दिले. त्यानंतर ८ आक्टोबर रोजी १ लाख ६० हजार रुपये रक्कम उज्ज्वला निकम, विशाल वाघ यांच्याकडेच दिली. त्यानंतर परत ६० हजार रोख रक्कम उज्ज्वला निकम, विशाल वाघ यांचेकडेच दिली. त्यानंतर माझे पती सुनील धनावडे यांचे जनसेवा बँक सातारा येथील बचत खात्यावर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये १० हजार ८०० रुपये, माझ्या जिल्हा बँकेच्या खात्यावर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये १४ हजार ८५० रुपये, वडील रघुनाथ जगन्नाथ डिगे याच्या बॅक खात्यावर ६ हजार २०० रुपये जमा झाले.

त्यानंतर कंपनीने पैसे दिले नाहीत. कंपनीमध्ये अडचण सुरू आहे. असे सांगण्यात येत होते. त्यानंतर लोणंदमध्ये रयल वेज मार्केटिंग बिजनेसचे अध्यक्ष विठ्ठल अंकुश कोळपे, अनिल अंकुश कोळपे (रा. कुसूर, ता. फलटण) व संदीप सोपान येळे (रा पारोडी, ता. शिरुर, जि.पुणे) यांना भेटून ‘तुमच्याकडून २ लाख ४४ हजार रुपये येणे बाकी आहेत,’ असे सांगितले. यावर त्यांनी ‘तुम्हाला पूर्ण रकमेचा धनादेश देतो,’ असे म्हणाले. त्यांना रोख रक्कम द्या, असे म्हणाले परंतु, त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या लोणंद शाखेचा धनादेश दिला. मात्र दिलेला धनादेश वटला नाही. यावरून त्यांनी लोकांची फसवणूक केल्याची खात्री झाली. कंपनीचे चेअरमन विठ्ठल कोळपे, अनिल कोळपे, व उपाध्यक्ष संदीप येळे यांनी फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी तपास करत आहेत.