शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

चौदा किलोमीटरच्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST

दहीवडी : माण-खटावला वरदान ठरणाऱ्या जिहे-कटापूरचे पाणी २०२१ मध्ये माणच्या शिवारात खेळणार आहे. वर्धनगडपासून अपवाद वगळता नवलेवाडीपर्यंत जवळपास १४ ...

दहीवडी : माण-खटावला वरदान ठरणाऱ्या जिहे-कटापूरचे पाणी २०२१ मध्ये माणच्या शिवारात खेळणार आहे. वर्धनगडपासून अपवाद वगळता नवलेवाडीपर्यंत जवळपास १४ किलोमीटर असणाऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या वर्षभरात जिहे-कटापूरचे पाणी नेर व आंधळी धरणात पडून ते संपूर्ण शिवारात खेळणार आहे.

माण तालुक्याला जिहे-कटापूर टेंभू उरमोडी या योजनेचे पाणी येते. उरमोडीचे पाणी माण तालुक्यात आले आहे. टेंभूच्या पाण्यातून माणच्या १६ गावांना पाणी मिळणार आहे. मात्र सर्वात वरदान ठरणारी जिहे-कटापूर योजना पूर्ण झाल्याशिवाय माण तालुका सुजलाम सुफलाम होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.

येथील शेतकरी पाणी आता येईल, मग येईल, हे ऐकत आला आहे; पण बोगदाच पूर्ण नसल्याने हे शक्य होणार नव्हते. १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पश्चिम महाराष्ट्रासाठी कृष्णा खोऱ्याची स्थापना केली. या योजनेमध्ये जिहे-कटापूरचा समावेश केला. सुरुवातीला २५० कोटींची योजना कालांतराने १५०० कोटींवर गेली. त्यामुळे योजना अर्धवट आहते की काय, अशी शंका होती. मात्र गेल्यावर्षी या योजनेला केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली व भरीव निधीची तरतूद झाली. त्यानंतर रात्रंदिवस काम सुरू आहे. वर्धनगड वेटणे रणसिंगवाडी, शिरवली, नवलेवाडी या ठिकाणांहून काम सुरू होते. जावळपास १४ किलोमीटर असणारा हा बोगदा शिरवलीपर्यंत पूर्णत्वाकडे गेला आहे. शिरवलीपासून साधारण चार किलोमीटर अंतरावर नवलेवाडीकडे जाणारा शेवटचा टप्पा ४ किलोमीटरचा आहे. तब्बल ३३० फूट जमिनीखालून आहे. या बोगद्याचे काम तीन किलोमीटरपेक्षा जास्त झाले आहे. हा बोगदा अवघा ७५० मीटर राहिला असून, या ठिकाणचे काम रात्रंदिवस सुरू आहे. हा टप्पा येणाऱ्या सहा महिन्यांत पूर्ण होऊन नेर आंधळी धराणात जिहे-कटापूरचे पाणी येण्यास कोणतीही अडचण भासणार नाही. माण तालुक्याच्या उंच ठिकाणाहून पाणी सुटणार असल्याने तालुक्यातील अनेक गावांत पाणी पोहोचवता येणार आहे.

दुष्काळी १३ तालुक्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी परिषदांच्या माध्यमातून १९९२ पासून संघर्ष केला आहे. जिहे-कटापूरचे पाणी तालुक्याला मिळाल्यास परिषदेच्या कार्यकर्त्यांना सर्वाधिक आनंद होईल

- विश्वंबर बाबर, अध्यक्ष माण तालुका पाणी परिषद

तेरा गावांना कायमचे पाणी

जिहे-कटापूर योजनेला २०१९ मध्ये केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली. त्यावेळी ८०० कोटी या योजनेला मंजूर झाले. नाबार्ड व केंद्र सरकार पैसे भरणार असल्याने याचा राज्यावर ताण येणार नाही. या योजनेतून २७.५० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. माण उत्तरमधील ३२ गावांना कायमस्वरुपी पिण्याचे पाणी मिळणार आहे.

फोटो

०५दहिवडी-वॉटर

माण तालुक्याला वरदान ठरणाऱ्या जिहे-कटापूर बोगद्याचे शिरवली येथे उभारलेले जॅकवेलचे काम रात्रंदिवस सुरू आहे.