शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

चौदा किलोमीटरच्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST

दहीवडी : माण-खटावला वरदान ठरणाऱ्या जिहे-कटापूरचे पाणी २०२१ मध्ये माणच्या शिवारात खेळणार आहे. वर्धनगडपासून अपवाद वगळता नवलेवाडीपर्यंत जवळपास १४ ...

दहीवडी : माण-खटावला वरदान ठरणाऱ्या जिहे-कटापूरचे पाणी २०२१ मध्ये माणच्या शिवारात खेळणार आहे. वर्धनगडपासून अपवाद वगळता नवलेवाडीपर्यंत जवळपास १४ किलोमीटर असणाऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या वर्षभरात जिहे-कटापूरचे पाणी नेर व आंधळी धरणात पडून ते संपूर्ण शिवारात खेळणार आहे.

माण तालुक्याला जिहे-कटापूर टेंभू उरमोडी या योजनेचे पाणी येते. उरमोडीचे पाणी माण तालुक्यात आले आहे. टेंभूच्या पाण्यातून माणच्या १६ गावांना पाणी मिळणार आहे. मात्र सर्वात वरदान ठरणारी जिहे-कटापूर योजना पूर्ण झाल्याशिवाय माण तालुका सुजलाम सुफलाम होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.

येथील शेतकरी पाणी आता येईल, मग येईल, हे ऐकत आला आहे; पण बोगदाच पूर्ण नसल्याने हे शक्य होणार नव्हते. १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पश्चिम महाराष्ट्रासाठी कृष्णा खोऱ्याची स्थापना केली. या योजनेमध्ये जिहे-कटापूरचा समावेश केला. सुरुवातीला २५० कोटींची योजना कालांतराने १५०० कोटींवर गेली. त्यामुळे योजना अर्धवट आहते की काय, अशी शंका होती. मात्र गेल्यावर्षी या योजनेला केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली व भरीव निधीची तरतूद झाली. त्यानंतर रात्रंदिवस काम सुरू आहे. वर्धनगड वेटणे रणसिंगवाडी, शिरवली, नवलेवाडी या ठिकाणांहून काम सुरू होते. जावळपास १४ किलोमीटर असणारा हा बोगदा शिरवलीपर्यंत पूर्णत्वाकडे गेला आहे. शिरवलीपासून साधारण चार किलोमीटर अंतरावर नवलेवाडीकडे जाणारा शेवटचा टप्पा ४ किलोमीटरचा आहे. तब्बल ३३० फूट जमिनीखालून आहे. या बोगद्याचे काम तीन किलोमीटरपेक्षा जास्त झाले आहे. हा बोगदा अवघा ७५० मीटर राहिला असून, या ठिकाणचे काम रात्रंदिवस सुरू आहे. हा टप्पा येणाऱ्या सहा महिन्यांत पूर्ण होऊन नेर आंधळी धराणात जिहे-कटापूरचे पाणी येण्यास कोणतीही अडचण भासणार नाही. माण तालुक्याच्या उंच ठिकाणाहून पाणी सुटणार असल्याने तालुक्यातील अनेक गावांत पाणी पोहोचवता येणार आहे.

दुष्काळी १३ तालुक्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी परिषदांच्या माध्यमातून १९९२ पासून संघर्ष केला आहे. जिहे-कटापूरचे पाणी तालुक्याला मिळाल्यास परिषदेच्या कार्यकर्त्यांना सर्वाधिक आनंद होईल

- विश्वंबर बाबर, अध्यक्ष माण तालुका पाणी परिषद

तेरा गावांना कायमचे पाणी

जिहे-कटापूर योजनेला २०१९ मध्ये केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली. त्यावेळी ८०० कोटी या योजनेला मंजूर झाले. नाबार्ड व केंद्र सरकार पैसे भरणार असल्याने याचा राज्यावर ताण येणार नाही. या योजनेतून २७.५० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. माण उत्तरमधील ३२ गावांना कायमस्वरुपी पिण्याचे पाणी मिळणार आहे.

फोटो

०५दहिवडी-वॉटर

माण तालुक्याला वरदान ठरणाऱ्या जिहे-कटापूर बोगद्याचे शिरवली येथे उभारलेले जॅकवेलचे काम रात्रंदिवस सुरू आहे.