शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

माउलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात चार मुक्काम

By admin | Updated: April 26, 2017 13:23 IST

पालखी तळ व मार्गाची समितीकडून पाहणी

आॅनलाईन लोकमतलोणंद (जि. सातारा), दि. २६ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा यावर्षी १७ जूनला आळंदीतून परंढरपूरकडे प्रस्थान करणार असून, सातारा जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चार मुक्काम आहे. अशी माहिती ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली.शनिवार, दि. २४ रोजी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे नीरा नदीमध्ये श्रीस्नान होऊन लोणंदला संध्याकाळी मुक्काम होणार आहे. दि. २५ जून रोजी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल व पालखी सोहळा तरडगाव येथे मुक्कामी जाईल. दि. २६ रोजी पालखी फलटण मुक्कामी जाणार आहे. तसेच दि. २७ जून रोजी बरड मुक्काम होऊन पालखी सोहळा २८ जून रोजी सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे.दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद पालखी तळ व मार्गाची पालखी सोहळा प्रमुख अभय टिळेकर, विश्वस्त योगेश देसाई, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, तहसीलदार शिवाजीराव तळपे, माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील, मुख्य अधिकारी अभिषेक परदेशी, नगरसेवक योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके, सचिन शेळके, राजेंद्र डोईफोडे, नगरसेविका हेमलता कर्नवर, कुसुम शिरतोडे, शैलजा खरात, स्वाती मंडलकर यांनी पाहणी केली. (वार्ताहर)माउलींचा मुक्काम असणाऱ्या लोणंद पालखी तळाची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पालखी तळाचा विस्तार करण्याचा प्रयत्न प्रशासन व नगरपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकायार्ने करणे गरजेचे आहे.- डॉ. अजित कुलकर्णी, देवस्थान संस्थानचे प्रमुख विश्वस्त