शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

स्वच्छतेसाठी चार लाख विद्यार्थ्यांनी केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 15:03 IST

सातारा जिल्ह्यात सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता मतदान २०१७’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ९५ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. विद्यार्थ्यांनी चक्क रांगा लावून मतदान केले.

ठळक मुद्देरांगा लागल्या : २ हजार ७७३ प्राथमिक शाळा व ७४४ हायस्कूल-महाविद्यालयांमध्ये अनोखा उपक्रम

सातारा : जिल्ह्यात सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता मतदान २०१७’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ९५ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. विद्यार्थ्यांनी चक्क रांगा लावून मतदान केले. शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत मतदान घेण्यात आले. स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील २ हजार ७७३ प्राथमिक शाळांमधील १ लाख ४७ हजार ७५७ व ७४४, महाविद्यालयांमध्ये २ लाख ४७ हजार ८३८ विद्यार्थी असून, एकूण ३ लाख ९५ हजार ५९५ विद्यार्थी सहभागी झाले. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देऊन मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मतपत्रिका, मतपेटी बॉक्स, काळ्या शाईचा परमनंट मार्कर, विद्यार्थी मतदार यादी आदी शिक्षक उपलब्ध केले. सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सर्व विद्यार्थ्यांचे मतदान झाल्यानंतर मतदान पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली. या अनोख्या उपक्रमामुळे स्वच्छतेविषयी नेमकी जागृती करणे सोपे झाले. मतदानानंतर शिक्षकांनी मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केल्याची निशाणी लावलेल्या बोटांसह फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर टाकले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण सभापती राजेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास कुलाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला.हा झाला फायदाविद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव जागृती झाली. अनेकदा पालक घरात सांगत असतात, पण मुले त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र मतदानाच्या निमित्ताने मुलांना हो किंवा नाही अशी उत्तरे द्यावी लागली असल्याने त्यांच्या मनाची तयारी झाली. या प्रश्नांची उत्तरे मिळाली-घरामध्ये वैयक्तिक शौचालय आहे का- जेवणापूर्वी हात धुता का?-शौचास जाऊन आल्यावर हात धुता का?- पिण्याचे पाणी कसे घेता?