शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

CoronaVirus Positive News पंजाबमधून ते कोकण, मुंबई, सातारा, सांगलीत रेल्वेने येणार : श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:38 IST

त्यामुळे कोकण, मुंबई, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील गलाई कामगार आपल्या घरी परतणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देचारशे गलाई कामगार परतणार मायभूमीतरेल्वे खात्याने संबंधित नागरिकांसाठी रेल्वेची मंजुरी दिली

क-हाड : अमृतसर-पंजाब येथे महाराष्ट्रातील सोन्याचे दागिने बनविणारे कारागीर आपल्या परिवारासह अडकून राहिले आहेत. त्यांना राज्यात परत आणण्यासाठी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मूळ महाराष्ट्रीयन आणि पंजाबमध्ये कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी डॉ. केतन पाटील यांच्याशी समन्वय साधत केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे पंजाबमध्ये अडकलेल्या शेकडो गलाई कामगारांना येत्या दोन दिवसांत आपल्या मायभूमीत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंजाबमधील अमृतसर आणि परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याच्या व्यवसायानिमित्ताने गेलेले महाराष्ट्रातील शेकडो नागरिक लॉकडाऊन परिस्थितीमुळे तेथेच अडकून राहिले आहेत. कोरोनामुळे व्यवसाय बंद झाल्याने या कारागिरांना आर्थिक समस्यांसह इतर अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रारंभी सुमारे चारशे कामगार आणि त्यांचा परिवार महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करीत होता. मात्र त्यांना यात यश मिळाले नाही. त्यातील काही नागरिकांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली होती. खासदार पाटील यांनी पंजाब पोलीस दलात कार्यरत असलेले केतन पाटील यांच्याशी संपर्क साधून सुरुवातीला एसटीने कामगारांच्या परतीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. तसेच सांगलीच्या कामगारांची संख्या जास्त असल्याने सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी अमृतसर व सांगलीचे आयएएस अधिकाऱ्यांशी समन्वय साधत केंद्र्राकडे पाठपुरावा करून मदतीची चक्रे वेगाने फिरविली. रेल्वे खात्याने संबंधित नागरिकांसाठी रेल्वेची मंजुरी दिली असून, अमृतसर ते सांगली आणि अमृतसर ते मुंबई अशा दोन रेल्वे टप्प्याने सुटणार आहेत. त्यामुळे कोकण, मुंबई, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील गलाई कामगार आपल्या घरी परतणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

पंजाबमध्ये अडकलेले गलाई व्यावसायिक येत्या दोन-तीन दिवसांत आपल्या मायभूमीत परततील. रेल्वेच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था केंद्र सरकारने केली आहे.- श्रीनिवास पाटील , खासदार, सातारा 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या