शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Positive News पंजाबमधून ते कोकण, मुंबई, सातारा, सांगलीत रेल्वेने येणार : श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:38 IST

त्यामुळे कोकण, मुंबई, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील गलाई कामगार आपल्या घरी परतणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देचारशे गलाई कामगार परतणार मायभूमीतरेल्वे खात्याने संबंधित नागरिकांसाठी रेल्वेची मंजुरी दिली

क-हाड : अमृतसर-पंजाब येथे महाराष्ट्रातील सोन्याचे दागिने बनविणारे कारागीर आपल्या परिवारासह अडकून राहिले आहेत. त्यांना राज्यात परत आणण्यासाठी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मूळ महाराष्ट्रीयन आणि पंजाबमध्ये कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी डॉ. केतन पाटील यांच्याशी समन्वय साधत केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे पंजाबमध्ये अडकलेल्या शेकडो गलाई कामगारांना येत्या दोन दिवसांत आपल्या मायभूमीत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंजाबमधील अमृतसर आणि परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याच्या व्यवसायानिमित्ताने गेलेले महाराष्ट्रातील शेकडो नागरिक लॉकडाऊन परिस्थितीमुळे तेथेच अडकून राहिले आहेत. कोरोनामुळे व्यवसाय बंद झाल्याने या कारागिरांना आर्थिक समस्यांसह इतर अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रारंभी सुमारे चारशे कामगार आणि त्यांचा परिवार महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करीत होता. मात्र त्यांना यात यश मिळाले नाही. त्यातील काही नागरिकांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली होती. खासदार पाटील यांनी पंजाब पोलीस दलात कार्यरत असलेले केतन पाटील यांच्याशी संपर्क साधून सुरुवातीला एसटीने कामगारांच्या परतीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. तसेच सांगलीच्या कामगारांची संख्या जास्त असल्याने सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी अमृतसर व सांगलीचे आयएएस अधिकाऱ्यांशी समन्वय साधत केंद्र्राकडे पाठपुरावा करून मदतीची चक्रे वेगाने फिरविली. रेल्वे खात्याने संबंधित नागरिकांसाठी रेल्वेची मंजुरी दिली असून, अमृतसर ते सांगली आणि अमृतसर ते मुंबई अशा दोन रेल्वे टप्प्याने सुटणार आहेत. त्यामुळे कोकण, मुंबई, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील गलाई कामगार आपल्या घरी परतणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

पंजाबमध्ये अडकलेले गलाई व्यावसायिक येत्या दोन-तीन दिवसांत आपल्या मायभूमीत परततील. रेल्वेच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था केंद्र सरकारने केली आहे.- श्रीनिवास पाटील , खासदार, सातारा 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या