शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

CoronaVirus Positive News पंजाबमधून ते कोकण, मुंबई, सातारा, सांगलीत रेल्वेने येणार : श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:38 IST

त्यामुळे कोकण, मुंबई, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील गलाई कामगार आपल्या घरी परतणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देचारशे गलाई कामगार परतणार मायभूमीतरेल्वे खात्याने संबंधित नागरिकांसाठी रेल्वेची मंजुरी दिली

क-हाड : अमृतसर-पंजाब येथे महाराष्ट्रातील सोन्याचे दागिने बनविणारे कारागीर आपल्या परिवारासह अडकून राहिले आहेत. त्यांना राज्यात परत आणण्यासाठी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मूळ महाराष्ट्रीयन आणि पंजाबमध्ये कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी डॉ. केतन पाटील यांच्याशी समन्वय साधत केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे पंजाबमध्ये अडकलेल्या शेकडो गलाई कामगारांना येत्या दोन दिवसांत आपल्या मायभूमीत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंजाबमधील अमृतसर आणि परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याच्या व्यवसायानिमित्ताने गेलेले महाराष्ट्रातील शेकडो नागरिक लॉकडाऊन परिस्थितीमुळे तेथेच अडकून राहिले आहेत. कोरोनामुळे व्यवसाय बंद झाल्याने या कारागिरांना आर्थिक समस्यांसह इतर अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रारंभी सुमारे चारशे कामगार आणि त्यांचा परिवार महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करीत होता. मात्र त्यांना यात यश मिळाले नाही. त्यातील काही नागरिकांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली होती. खासदार पाटील यांनी पंजाब पोलीस दलात कार्यरत असलेले केतन पाटील यांच्याशी संपर्क साधून सुरुवातीला एसटीने कामगारांच्या परतीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. तसेच सांगलीच्या कामगारांची संख्या जास्त असल्याने सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी अमृतसर व सांगलीचे आयएएस अधिकाऱ्यांशी समन्वय साधत केंद्र्राकडे पाठपुरावा करून मदतीची चक्रे वेगाने फिरविली. रेल्वे खात्याने संबंधित नागरिकांसाठी रेल्वेची मंजुरी दिली असून, अमृतसर ते सांगली आणि अमृतसर ते मुंबई अशा दोन रेल्वे टप्प्याने सुटणार आहेत. त्यामुळे कोकण, मुंबई, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील गलाई कामगार आपल्या घरी परतणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

पंजाबमध्ये अडकलेले गलाई व्यावसायिक येत्या दोन-तीन दिवसांत आपल्या मायभूमीत परततील. रेल्वेच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था केंद्र सरकारने केली आहे.- श्रीनिवास पाटील , खासदार, सातारा 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या