शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

सॅनिटायझरचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:48 IST

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात सर्वत्रच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, त्याकडे नागरिकांचे विशेष लक्ष नाही. काेरोनाची साखळी खंडित ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात सर्वत्रच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, त्याकडे नागरिकांचे विशेष लक्ष नाही. काेरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासन विविध पातळीवर लढा देत आहे. मात्र, नागरिकांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्याचाच एक भाग म्हणजे नागरिकांकडून सॅनिटायझरचा वापर करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दुकानदारांनीही सॅनिटायझर ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ही साखळी अशीच कायम राहणार आहे.

-------------

घाटातील रस्ते ओस

खंडाळा : लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे अनावश्यक गावी जाण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. महामार्गावरील खंबाटकी घाटातील रस्ते ओस पडले आहेत. रस्त्यावर एकच वाहन तुरळक स्वरुपात आढळत असल्याने दुचाकीस्वार गाडी न्यूट्रल करुन चालवत आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

--------

लिंबांचे दर तेजीत

सातारा : एप्रिल महिना संपत आल्याने लिंबाच्या दरावर त्याचा परिणाम झाला आहे. सर्वसाधारणपणे वर्षभर दहाला पाच तर काहीवेळेला दहाला दहा लिंबे मिळत होती. त्यांचे दर आता तेजीत आहेत. साताऱ्यातील बाजारपेठेत लिंबांची आवक खूपच मंदावली आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे कांदे आहेत, ते वीस रुपयांना चार देत आहेत. उन्हाळा वाढत असल्याने लिंबांना मागणी आहे. मात्र, दर तेजीत असल्याचा फटका बसत आहे.

---०००००

पर्यटनस्थळे लॉकडाऊन

महाबळेश्वर : महाबळेश्वर, पाचगणीत उन्हाळा हंगाम मार्चपासूनच सुरू होतो. तसेच शाळांच्या परीक्षा झाल्यानंतर एप्रिलमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. यंदा मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वसामान्य जनता घरात बसली आहे. त्यामुळे पर्यटनस्थळेही लॉकडाऊन झाली आहेत. सर्वच पॉईंट सुनसान दिसत आहेत.

००००००००००००

भूजल पातळी खालावली

सातारा : सातारा शहरातील अनेक भागांमध्ये नागरिक कुपनलिकांचे पाणी वापरतात. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने भूगर्भातील पाणीपातळी खालावत चालली आहे. त्यामुळे दिवसभरात खूपच कमी वेळ पाणी उपसा होतो. त्यामुळे अनेक भागात टँकरने पाणी विकत आणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे मे महिना कसा जाणार, हा प्रश्न सतावत आहे.

०००००००००

रस्ते दुरुस्तीची मागणी

सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावर वाळूही पडली आहे तर काही ठिकाणी चर खोदलेले आहेत. या बाबी अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे सध्या वाहतूक कमी असताना महामार्ग दुरूस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

००००००००००००

गॅस वितरण सुविधेपासून वंचित

सातारा : लॉकडाऊन काळात कोणीही घरातून बाहेर पडू शकत नाही. अशा संकटप्रसंगी गॅस एजन्सीचे वितरक मात्र घरोघरी जाऊन गॅस सिलिंडर पोहोच करत आहेत. मात्र, त्यातील अनेकांना अत्यावश्यक सुविधाही मिळालेल्या नाहीत. स्वत:च्या खर्चातून सॅनिटायझर, मास्क खरेदी करुन ते सेवा बजावत आहेत.