शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

वनखाते-पालिकेत टोलवरून जुंपली!

By admin | Updated: November 5, 2015 23:56 IST

महाबळेश्वरातील पेच : गुरेघर येथील वनविभागाच्या टोलला पालिकेचा विरोध

महाबळेश्वर : वनविभागाची संयुक्त वन व्यवस्थापन समिती व पालिका यांच्यात टोलवसुलीवरून जुंपली आहे. वन व्यवस्थापन समित्या पाच ठिकाणी वसुली करत होत्या. त्याऐवजी वनविभागाने गुरेघर येथे एकाच ठिकाणी सुरू केला. त्यामुळे पालिकेची वसुली धोक्यात आली आहे. पालिकेने नव्या टोलनाक्याला विरोध केला आहे. विरोधामुळे वनविभागाने गुरेघर येथीलटोलनाक्यावरील वसुली पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर जगभर प्रसिद्ध आहे. सुमारे पंधरा ते अठरा लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. ब्रिटिशकाळापासून महाबळेश्वर नगरपरिषद येथे सहलीसाठी आलेल्या पर्यटकांकडून प्रवासी कर वसूल करते. पर्यटनस्थळाचे सुशोभीकरण व स्वच्छतेवर पालिका खर्च करते. काही वर्षांपूर्वी वनविभागाने पालिकेकडे असलेल्या सर्व पॉइंट आपल्या ताब्यात घेतले. तेव्हापासून तेथे देखभाल व दुरुस्ती करण्यास पालिकेला बंदी घालण्यात आली. पालिकेला बंदी आणि वनविभागाकडे निधीची कमतरता, यामुळे अनेक पॉइंटची दुरवस्था होऊ लागली. पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत असली तरी वनविभागाच्या जाचक अटींमुळे पालिका काहीही करू शकत नव्हती. काही वर्षांपूर्वी वनविभागाने त्यांच्या हद्दीतील पॉइंट दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी टोल वसुली सुरू केली. प्रथम एका पॉइंटवर सुरू झालेली वसुली आता पाच पॉइंटवर सुरू झाली आहे. यामुळे पाचगणी व महाबळेश्वर येथे मिळून दहा टोल नाके झाले. वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे हे गेल्या महिन्यात महाबळेश्वरमध्ये आले होते. वनविभागाच्या ‘हिरडा’ विश्रामगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत त्यांना पालिका व संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या टोलनाक्यावर होणारी वसुली एकत्र करण्याचे आदेश दिले. व ही वसुली दि. १ नोव्हेंबरपासून सुरू करावी, असे आदेश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा बैठक बोलविली होती; मात्र त्या झाल्याच नाहीत. त्यामुळे वनविभाग व पालिकेत समन्वय झाला नाही. दुसरीकडे वनविभागाने टोल एकत्रिकरणाच्या जोरदार हालचाली सुरू केल्या. पाच वन व्यवस्थापन समित्यांची एक महासमिती स्थापन केली. या समितीने गुरुवारी पालिकेच्या निर्णयाची वाट न पाहता गुरेघर येथे वसुलीही सुरू केली. पाचगणीत टोल भरून आल्यानंतर पर्यटकांना वनविभागाच्या गुरेघर येथील टोलनाक्यावर थांबविले जाऊ लागले. त्यामुळे वादाचा प्रसंग उद्भवले. यावेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल, सहायक उप वनसंरक्षक महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी, विशाल तोष्णिवाल, प्रशांत आखाडे, विजय भिलारे, शांताराम धनावडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)पाच दिवसांसाठी वसुली बंदनगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल व मुख्याधिकारी सचिन पवार यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या ‘हिरडा’ विश्रामगृह गाठले. नगराध्यक्षा तोष्णिवाल यांनी गुरेघर येथील टोल वसुलीला आक्षेप घेत वसुली तातडीने बंद करण्याची मागणी केली. यावरून वन अधिकारी व नगराध्यक्ष यांच्यात वाद सुरू झाले. वसुली बंद न केल्यास महाबळेश्वर बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला. शेवटी वन विभागाने नरमाईचे धोरण घेत ही वसुली पाच दिवसांसाठी बंद करण्याचा घेतला. मात्र, या पाच दिवसांत पालिकेने निर्णय न घेतल्यास पुन्हा वसुली करण्याचा इशारा या बैठकीत दिला. आज होणारपुन्हा बैठकदरम्यान, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. ६ रोजी हिरडा विश्रामगृहावर पालिका व वनविभागाची तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.