शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वनखाते-पालिकेत टोलवरून जुंपली!

By admin | Updated: November 5, 2015 23:56 IST

महाबळेश्वरातील पेच : गुरेघर येथील वनविभागाच्या टोलला पालिकेचा विरोध

महाबळेश्वर : वनविभागाची संयुक्त वन व्यवस्थापन समिती व पालिका यांच्यात टोलवसुलीवरून जुंपली आहे. वन व्यवस्थापन समित्या पाच ठिकाणी वसुली करत होत्या. त्याऐवजी वनविभागाने गुरेघर येथे एकाच ठिकाणी सुरू केला. त्यामुळे पालिकेची वसुली धोक्यात आली आहे. पालिकेने नव्या टोलनाक्याला विरोध केला आहे. विरोधामुळे वनविभागाने गुरेघर येथीलटोलनाक्यावरील वसुली पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर जगभर प्रसिद्ध आहे. सुमारे पंधरा ते अठरा लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. ब्रिटिशकाळापासून महाबळेश्वर नगरपरिषद येथे सहलीसाठी आलेल्या पर्यटकांकडून प्रवासी कर वसूल करते. पर्यटनस्थळाचे सुशोभीकरण व स्वच्छतेवर पालिका खर्च करते. काही वर्षांपूर्वी वनविभागाने पालिकेकडे असलेल्या सर्व पॉइंट आपल्या ताब्यात घेतले. तेव्हापासून तेथे देखभाल व दुरुस्ती करण्यास पालिकेला बंदी घालण्यात आली. पालिकेला बंदी आणि वनविभागाकडे निधीची कमतरता, यामुळे अनेक पॉइंटची दुरवस्था होऊ लागली. पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत असली तरी वनविभागाच्या जाचक अटींमुळे पालिका काहीही करू शकत नव्हती. काही वर्षांपूर्वी वनविभागाने त्यांच्या हद्दीतील पॉइंट दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी टोल वसुली सुरू केली. प्रथम एका पॉइंटवर सुरू झालेली वसुली आता पाच पॉइंटवर सुरू झाली आहे. यामुळे पाचगणी व महाबळेश्वर येथे मिळून दहा टोल नाके झाले. वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे हे गेल्या महिन्यात महाबळेश्वरमध्ये आले होते. वनविभागाच्या ‘हिरडा’ विश्रामगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत त्यांना पालिका व संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या टोलनाक्यावर होणारी वसुली एकत्र करण्याचे आदेश दिले. व ही वसुली दि. १ नोव्हेंबरपासून सुरू करावी, असे आदेश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा बैठक बोलविली होती; मात्र त्या झाल्याच नाहीत. त्यामुळे वनविभाग व पालिकेत समन्वय झाला नाही. दुसरीकडे वनविभागाने टोल एकत्रिकरणाच्या जोरदार हालचाली सुरू केल्या. पाच वन व्यवस्थापन समित्यांची एक महासमिती स्थापन केली. या समितीने गुरुवारी पालिकेच्या निर्णयाची वाट न पाहता गुरेघर येथे वसुलीही सुरू केली. पाचगणीत टोल भरून आल्यानंतर पर्यटकांना वनविभागाच्या गुरेघर येथील टोलनाक्यावर थांबविले जाऊ लागले. त्यामुळे वादाचा प्रसंग उद्भवले. यावेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल, सहायक उप वनसंरक्षक महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी, विशाल तोष्णिवाल, प्रशांत आखाडे, विजय भिलारे, शांताराम धनावडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)पाच दिवसांसाठी वसुली बंदनगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल व मुख्याधिकारी सचिन पवार यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या ‘हिरडा’ विश्रामगृह गाठले. नगराध्यक्षा तोष्णिवाल यांनी गुरेघर येथील टोल वसुलीला आक्षेप घेत वसुली तातडीने बंद करण्याची मागणी केली. यावरून वन अधिकारी व नगराध्यक्ष यांच्यात वाद सुरू झाले. वसुली बंद न केल्यास महाबळेश्वर बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला. शेवटी वन विभागाने नरमाईचे धोरण घेत ही वसुली पाच दिवसांसाठी बंद करण्याचा घेतला. मात्र, या पाच दिवसांत पालिकेने निर्णय न घेतल्यास पुन्हा वसुली करण्याचा इशारा या बैठकीत दिला. आज होणारपुन्हा बैठकदरम्यान, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. ६ रोजी हिरडा विश्रामगृहावर पालिका व वनविभागाची तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.