शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

ढेबेवाडी विभागातील डोंगरांवर वणव्याची धग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST

ढेबेवाडी विभागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. साग, सिल्वर ओक, हेळा, आकोकार्पस, शिवन, बांबू, शिकेकाई, आवळा, शिसम, बाभुळ, जांभुळ, काजु, ...

ढेबेवाडी विभागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. साग, सिल्वर ओक, हेळा, आकोकार्पस, शिवन, बांबू, शिकेकाई, आवळा, शिसम, बाभुळ, जांभुळ, काजु, आकेशिया, नरक्या, अडळुसा, शतावरी आदी कितीतरी प्रकारच्या वनसंपदेने हा परिसर समृद्ध आहे. बिबट्यासह गवे, रानडुक्कर, अस्वल, ससे, अजगर, साळिंदर, भेकर आदी प्राण्यांचा आणि असंख्य प्रकारच्या पक्ष्यांचा येथील जंगलात मुक्त संचार असतो. विविध अंगाने समृद्ध असलेली येथील वनसंपदा वणव्याच्या धगीने अनेक वर्षांपासून अस्वस्थ आहे. वर्षागणिक वाढणारे वणव्याचे प्रमाण वनसंपत्तीच्या मुळावर उठल्याचे चित्र येथे आहे. वन विभाग व विविध सेवाभावी संस्था, संघटनांनी वने वाचवण्यासाठी हाती घेतलेली वणवा निर्मूलनाची मोहीम येथे फारशी यशस्वी झालेली दिसत नाही. अशा प्रयत्नांपेक्षा लोकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे असताना ती बदलण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. कापणीनंतर गवत पेटवून दिल्याने पुन्हा जोमाने फुटवे येतात, गवताच्या बिया शेतात पसरत नाहीत. डुकरे घाबरुन पळुन जातात. शेत भाजून पिकांसाठी तयार होते, असे कितीतरी गैरसमज डोंगर भागात असल्याने शेतकऱ्यांनी डोंगर पेटवून देण्याचा लावलेला सपाटा आजतागायत कायम आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याही उन्हाळ्यात परिसरात वणव्याची समस्या कायम असून, आठवड्यापासून प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता डोंगर पेटताना दिसत आहे. येथील वन विभागाचे कार्यालय पाटणला हलवल्याने मोठी अडचण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. परिसरात जाळरेषा काढल्या जात असल्या तरी शेजारी असणाऱ्या मालकी क्षेत्रातून आग वन विभागाच्या हद्दीत पसरत आहे. त्यामुळे वणवा विझवताना वन कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे. गत महिन्यापासून विभागात वणवा भडकत असल्याने वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल सुभाष राऊत, डी. डी. बोडके, अमृत पन्हाळे, जयवंत बेंद्रे यांच्यासह अन्य कर्मचारी दिवसरात्र डोळ्यात तेल घालून काम करत आहेत; मात्र मुद्दाम पेटती काडी किंवा सिगारेटचे थोटूक गवतात फेकून पेटणारे जंगल मजा म्हणून बघणारे समाजकंटकही या परिसरात कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.

- चौकट

‘फायर ब्लोअर’चे नियंत्रण

आग विझवण्यासाठी वन विभागाने फायर ब्लोअर यंत्राचा वापर केला जात आहे. वणवा विझवण्यासाठी हे यंत्र फारच उपयोगी असले तरी यंत्रासाठी लागणारे पेट्रोल आणि त्यासाठी येणारा खर्च न परवडणारा असल्याने शासनाकडून त्यासाठी खर्च मिळत नसल्याने वन विभागासाठी हा विषय डोकेदुखी ठरत आहे.

- कोट

विभागात रोज कुठे ना कुठे वणवा भडकताना दिसत आहे. या वणव्यात दुर्मीळ वनौषधी वनस्पती जळून खाक होत आहे, तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे, हे गंभीर आहे. वन विभाग आपले काम चोख बजावत आहे; पण निसर्गाने जे वैभव आपल्याला दिले आहे ते आपण जपले पाहिजे.

- हिंदूराव पाटील, प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.

फोटो : ०७केआरडी०४

कॅप्शन : ढेबेवाडी विभागात डोंगरांना वणवा लावला जात असल्याने वनसंपत्ती जळून खाक होत आहे. (छाया : बाळासाहेब रोडे)