शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

ढेबेवाडी विभागातील डोंगरांवर वणव्याची धग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST

ढेबेवाडी विभागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. साग, सिल्वर ओक, हेळा, आकोकार्पस, शिवन, बांबू, शिकेकाई, आवळा, शिसम, बाभुळ, जांभुळ, काजु, ...

ढेबेवाडी विभागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. साग, सिल्वर ओक, हेळा, आकोकार्पस, शिवन, बांबू, शिकेकाई, आवळा, शिसम, बाभुळ, जांभुळ, काजु, आकेशिया, नरक्या, अडळुसा, शतावरी आदी कितीतरी प्रकारच्या वनसंपदेने हा परिसर समृद्ध आहे. बिबट्यासह गवे, रानडुक्कर, अस्वल, ससे, अजगर, साळिंदर, भेकर आदी प्राण्यांचा आणि असंख्य प्रकारच्या पक्ष्यांचा येथील जंगलात मुक्त संचार असतो. विविध अंगाने समृद्ध असलेली येथील वनसंपदा वणव्याच्या धगीने अनेक वर्षांपासून अस्वस्थ आहे. वर्षागणिक वाढणारे वणव्याचे प्रमाण वनसंपत्तीच्या मुळावर उठल्याचे चित्र येथे आहे. वन विभाग व विविध सेवाभावी संस्था, संघटनांनी वने वाचवण्यासाठी हाती घेतलेली वणवा निर्मूलनाची मोहीम येथे फारशी यशस्वी झालेली दिसत नाही. अशा प्रयत्नांपेक्षा लोकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे असताना ती बदलण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. कापणीनंतर गवत पेटवून दिल्याने पुन्हा जोमाने फुटवे येतात, गवताच्या बिया शेतात पसरत नाहीत. डुकरे घाबरुन पळुन जातात. शेत भाजून पिकांसाठी तयार होते, असे कितीतरी गैरसमज डोंगर भागात असल्याने शेतकऱ्यांनी डोंगर पेटवून देण्याचा लावलेला सपाटा आजतागायत कायम आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याही उन्हाळ्यात परिसरात वणव्याची समस्या कायम असून, आठवड्यापासून प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता डोंगर पेटताना दिसत आहे. येथील वन विभागाचे कार्यालय पाटणला हलवल्याने मोठी अडचण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. परिसरात जाळरेषा काढल्या जात असल्या तरी शेजारी असणाऱ्या मालकी क्षेत्रातून आग वन विभागाच्या हद्दीत पसरत आहे. त्यामुळे वणवा विझवताना वन कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे. गत महिन्यापासून विभागात वणवा भडकत असल्याने वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल सुभाष राऊत, डी. डी. बोडके, अमृत पन्हाळे, जयवंत बेंद्रे यांच्यासह अन्य कर्मचारी दिवसरात्र डोळ्यात तेल घालून काम करत आहेत; मात्र मुद्दाम पेटती काडी किंवा सिगारेटचे थोटूक गवतात फेकून पेटणारे जंगल मजा म्हणून बघणारे समाजकंटकही या परिसरात कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.

- चौकट

‘फायर ब्लोअर’चे नियंत्रण

आग विझवण्यासाठी वन विभागाने फायर ब्लोअर यंत्राचा वापर केला जात आहे. वणवा विझवण्यासाठी हे यंत्र फारच उपयोगी असले तरी यंत्रासाठी लागणारे पेट्रोल आणि त्यासाठी येणारा खर्च न परवडणारा असल्याने शासनाकडून त्यासाठी खर्च मिळत नसल्याने वन विभागासाठी हा विषय डोकेदुखी ठरत आहे.

- कोट

विभागात रोज कुठे ना कुठे वणवा भडकताना दिसत आहे. या वणव्यात दुर्मीळ वनौषधी वनस्पती जळून खाक होत आहे, तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे, हे गंभीर आहे. वन विभाग आपले काम चोख बजावत आहे; पण निसर्गाने जे वैभव आपल्याला दिले आहे ते आपण जपले पाहिजे.

- हिंदूराव पाटील, प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.

फोटो : ०७केआरडी०४

कॅप्शन : ढेबेवाडी विभागात डोंगरांना वणवा लावला जात असल्याने वनसंपत्ती जळून खाक होत आहे. (छाया : बाळासाहेब रोडे)