शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

वन्यप्राण्यांसाठी जंगलात बांधले पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:40 IST

निवी परिसरात वन्यप्राण्यांचा मोठा उपद्रव असतो. ऊन्हाळ्यात हा उपद्रव वाढतो. पाण्याच्या शोधात प्राणी जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान ...

निवी परिसरात वन्यप्राण्यांचा मोठा उपद्रव असतो. ऊन्हाळ्यात हा उपद्रव वाढतो. पाण्याच्या शोधात प्राणी जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. तसेच हल्ला होण्याची भीतीही असते. हा उपद्रव रोखण्यासाठी बंधारे व तळ्याच्या माध्यमातून ग्रामस्थांनी जंगलातच वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय केली आहे. सकाळी आठ वाजता येथील ग्रामस्थ जेवण, टिकाव, खोरे, पाट्या आदी साहित्य सोबत घेऊन श्रमदानासाठी घराबाहेर पडले. गावापासून दीड किलोमीटरवर असलेल्या जंगलातील झऱ्याजवळचे पाण्याचे बुजलेले नैसर्गिक स्त्रोत त्यांनी रिकामे केले. ओढ्याचे खोलीकरण करून त्यावर वाळू-माती भरलेली सिमेंटची पोती रचून तसेच दगड व चिखल वापरून दोन वनराई बंधारे आणि एका तळ्याचे बांधकाम केले. दुपारी अर्धा तास जेवणासाठी सुटी करून सायंकाळपर्यंत श्रमदान सुरू होते.

सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, वनक्षेत्रपाल विलासराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक जयवंत बेंद्रे, धनाजी पवार, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती ऊर्फ बाळू पाटील, अंकुश पवार, विठ्ठल पाटील, अशोक साबळे, तुकाराम साबळे, सयाजी साबळे, मारुती साबळे, बाळू साबळे, ईश्वर कदम, सुरेश कदम, बबन साबळे, सतीश साबळे, ज्ञानदेव साबळे आदींनी श्रमदानात सहभाग घेतला.

- चौकट

चार वर्षांपासून बंधाऱ्यांची निर्मिती

जंगलातील पाणवठ्याची सफाई केल्यावर वन्यप्राणी पाण्यासाठी जंगलाबाहेर पडत नाहीत. त्यांचा उपद्रव कमी होतो, असा निवीतील ग्रामस्थांचा अनुभव आहे. गत चार वर्षांपासून ते वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करत आहेत. जंगलातच पाण्याची तजवीज झाल्याने प्राण्यांची मनुष्य वस्तीतील धाव थांबण्यास मदत होणार असल्याचे वनपाल सुभाष राऊत व वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती पाटील यांनी सांगितले.

फोटो : ०८केआरडी०२

कॅप्शन : निवी, ता. पाटण येथील ग्रामस्थांनी वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी श्रमदानातून जंगलात पाणवठ्यांची निर्मिती केली आहे. (छाया : बाळासाहेब रोडे)