शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

वन्यप्राण्यांसाठी जंगलात बांधले पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:40 IST

निवी परिसरात वन्यप्राण्यांचा मोठा उपद्रव असतो. ऊन्हाळ्यात हा उपद्रव वाढतो. पाण्याच्या शोधात प्राणी जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान ...

निवी परिसरात वन्यप्राण्यांचा मोठा उपद्रव असतो. ऊन्हाळ्यात हा उपद्रव वाढतो. पाण्याच्या शोधात प्राणी जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. तसेच हल्ला होण्याची भीतीही असते. हा उपद्रव रोखण्यासाठी बंधारे व तळ्याच्या माध्यमातून ग्रामस्थांनी जंगलातच वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय केली आहे. सकाळी आठ वाजता येथील ग्रामस्थ जेवण, टिकाव, खोरे, पाट्या आदी साहित्य सोबत घेऊन श्रमदानासाठी घराबाहेर पडले. गावापासून दीड किलोमीटरवर असलेल्या जंगलातील झऱ्याजवळचे पाण्याचे बुजलेले नैसर्गिक स्त्रोत त्यांनी रिकामे केले. ओढ्याचे खोलीकरण करून त्यावर वाळू-माती भरलेली सिमेंटची पोती रचून तसेच दगड व चिखल वापरून दोन वनराई बंधारे आणि एका तळ्याचे बांधकाम केले. दुपारी अर्धा तास जेवणासाठी सुटी करून सायंकाळपर्यंत श्रमदान सुरू होते.

सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, वनक्षेत्रपाल विलासराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक जयवंत बेंद्रे, धनाजी पवार, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती ऊर्फ बाळू पाटील, अंकुश पवार, विठ्ठल पाटील, अशोक साबळे, तुकाराम साबळे, सयाजी साबळे, मारुती साबळे, बाळू साबळे, ईश्वर कदम, सुरेश कदम, बबन साबळे, सतीश साबळे, ज्ञानदेव साबळे आदींनी श्रमदानात सहभाग घेतला.

- चौकट

चार वर्षांपासून बंधाऱ्यांची निर्मिती

जंगलातील पाणवठ्याची सफाई केल्यावर वन्यप्राणी पाण्यासाठी जंगलाबाहेर पडत नाहीत. त्यांचा उपद्रव कमी होतो, असा निवीतील ग्रामस्थांचा अनुभव आहे. गत चार वर्षांपासून ते वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करत आहेत. जंगलातच पाण्याची तजवीज झाल्याने प्राण्यांची मनुष्य वस्तीतील धाव थांबण्यास मदत होणार असल्याचे वनपाल सुभाष राऊत व वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती पाटील यांनी सांगितले.

फोटो : ०८केआरडी०२

कॅप्शन : निवी, ता. पाटण येथील ग्रामस्थांनी वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी श्रमदानातून जंगलात पाणवठ्यांची निर्मिती केली आहे. (छाया : बाळासाहेब रोडे)