शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

ओसाड डोंगररांगांवर वनराईला बहर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST

बामणोली : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कास, बामणोलीसह तापोळा विभागातील स्थानिक ग्रामस्थांची पर्यावरण समृद्ध करण्याची मोहीम मागील काही वर्षांपासून सुरू ...

बामणोली : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कास, बामणोलीसह तापोळा विभागातील स्थानिक ग्रामस्थांची पर्यावरण समृद्ध करण्याची मोहीम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. मागील १०-१२ वर्षांपासून या परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या मोकळ्या ओसाड डोंगररांगांत तसेच घराशेजारी असणाऱ्या शेताच्या बांधावर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धनही केले आहे. ग्रामस्थांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाने कधीकाळी मोकळे असणारे डोंगर आज मोठमोठे वृक्ष व जंगलांनी व्यापून गेले आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न चालू असताना पश्चिमेकडे असणारा हा परिसर पूर्णपणे जंगलांनी व्यापून गेला आहे. जंगलतोड या घातक समस्येने निसर्गचक्र बदलून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा विपरित परिणाम अन्नसाखळीवर होत असताना याच्या नेमके उलट चित्र कास बामणोली या परिसरात दिसत आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्गदर्शनाने मोकळ्या पडीक डोंगरात हजारो वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना केली आहे. येथील ग्रामस्थांच्या या प्रयत्नांमुळे हा परिसर गर्द झाडीने हिरवागार बनला आहे. हे सर्व वृक्ष अनेक गावांच्या शेजारील स्वमालकीच्या जमिनीतच बहरले आहेत. मुनावळे, शेंबडी, बामणोली, अंधारी, म्हावशी, सावरी, तेटली, कास, सह्याद्रीनगर, गोगवे, वेगळे, भांबवली, धावली, फुरुस, वाकी या प्रमुख गावांसह इतर अनेक गावांनी वृक्षलागवड मोहिमेत महत्त्वाचा सहभाग नोंदविला आहे.

(चौकट)

वृक्षवाढीची मुख्य कारणे...

अनेक गावच्या शेतकऱ्यांनी सामाजिक वनविभागाकडून आपल्या पडीक जमिनीत मोफत वृक्षारोप न करून घेतले. घरगुती गॅसचा व गोबरगॅसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वृक्षतोड थांबली. फक्त वाळलेल्या व सुकलेल्या झाडांच्या फांद्यांचा वापर जळणासाठी होऊ लागला. पाळीव जनावरे कमी झाली. त्यामुळे डोंगरातील मोकळ्या जागेत गवताऐवजी झाडेझुडपे वाढली. नाचणीची शेती करण्यासाठी पूर्वी डोंगरातील झाडेझुडपे तोडून त्यांचे तर वे बनविले जायचे. पुरेसा पाऊस व अनुकूल वातावरण यामुळे नैसर्गिकपणे वृक्षांची वाढ झपाट्याने झाली.

(कोट )

कास व बामणोली विभागांत अनेक गावांमध्ये झाडांची वाढ खूप जास्त प्रमाणात होत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. गावात खूप कमी लोक राहू लागले. जनावरांचेही प्रमाण खूप कमी झाले. वृक्षतोड थांबली. तसेच अनेक ग्रामस्थांनी वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन केले. पर्यावरण संवर्धनासाठी हे खूपच महत्त्वाचे ठरत आहे.

-श्रीरंग शिंदे, वनपाल, बामणोली

२०बामणोली

कास, बामणोलीसह तापोळा विभागातील ग्रामस्थांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाने कधीकाळी मोकळे असणारे डोंगर आज मोठमोठे वृक्ष व जंगलांनी व्यापून गेले आहे.