शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

ओसाड डोंगररांगांवर वनराईला बहर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST

बामणोली : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कास, बामणोलीसह तापोळा विभागातील स्थानिक ग्रामस्थांची पर्यावरण समृद्ध करण्याची मोहीम मागील काही वर्षांपासून सुरू ...

बामणोली : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कास, बामणोलीसह तापोळा विभागातील स्थानिक ग्रामस्थांची पर्यावरण समृद्ध करण्याची मोहीम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. मागील १०-१२ वर्षांपासून या परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या मोकळ्या ओसाड डोंगररांगांत तसेच घराशेजारी असणाऱ्या शेताच्या बांधावर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धनही केले आहे. ग्रामस्थांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाने कधीकाळी मोकळे असणारे डोंगर आज मोठमोठे वृक्ष व जंगलांनी व्यापून गेले आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न चालू असताना पश्चिमेकडे असणारा हा परिसर पूर्णपणे जंगलांनी व्यापून गेला आहे. जंगलतोड या घातक समस्येने निसर्गचक्र बदलून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा विपरित परिणाम अन्नसाखळीवर होत असताना याच्या नेमके उलट चित्र कास बामणोली या परिसरात दिसत आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्गदर्शनाने मोकळ्या पडीक डोंगरात हजारो वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना केली आहे. येथील ग्रामस्थांच्या या प्रयत्नांमुळे हा परिसर गर्द झाडीने हिरवागार बनला आहे. हे सर्व वृक्ष अनेक गावांच्या शेजारील स्वमालकीच्या जमिनीतच बहरले आहेत. मुनावळे, शेंबडी, बामणोली, अंधारी, म्हावशी, सावरी, तेटली, कास, सह्याद्रीनगर, गोगवे, वेगळे, भांबवली, धावली, फुरुस, वाकी या प्रमुख गावांसह इतर अनेक गावांनी वृक्षलागवड मोहिमेत महत्त्वाचा सहभाग नोंदविला आहे.

(चौकट)

वृक्षवाढीची मुख्य कारणे...

अनेक गावच्या शेतकऱ्यांनी सामाजिक वनविभागाकडून आपल्या पडीक जमिनीत मोफत वृक्षारोप न करून घेतले. घरगुती गॅसचा व गोबरगॅसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वृक्षतोड थांबली. फक्त वाळलेल्या व सुकलेल्या झाडांच्या फांद्यांचा वापर जळणासाठी होऊ लागला. पाळीव जनावरे कमी झाली. त्यामुळे डोंगरातील मोकळ्या जागेत गवताऐवजी झाडेझुडपे वाढली. नाचणीची शेती करण्यासाठी पूर्वी डोंगरातील झाडेझुडपे तोडून त्यांचे तर वे बनविले जायचे. पुरेसा पाऊस व अनुकूल वातावरण यामुळे नैसर्गिकपणे वृक्षांची वाढ झपाट्याने झाली.

(कोट )

कास व बामणोली विभागांत अनेक गावांमध्ये झाडांची वाढ खूप जास्त प्रमाणात होत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. गावात खूप कमी लोक राहू लागले. जनावरांचेही प्रमाण खूप कमी झाले. वृक्षतोड थांबली. तसेच अनेक ग्रामस्थांनी वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन केले. पर्यावरण संवर्धनासाठी हे खूपच महत्त्वाचे ठरत आहे.

-श्रीरंग शिंदे, वनपाल, बामणोली

२०बामणोली

कास, बामणोलीसह तापोळा विभागातील ग्रामस्थांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाने कधीकाळी मोकळे असणारे डोंगर आज मोठमोठे वृक्ष व जंगलांनी व्यापून गेले आहे.