शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

परदेशी पाहुणे म्हणे.. ‘कास इज वंडरफुल!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या व जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. दुर्मीळ अन् विविधरंगी फुले पर्यटकांना आकर्षिक करीत असून, शनिवारी भारतासह रशिया व जर्मनी येथील विदेशी पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. तसेच फुले पाहून ‘कास इज वंडरफुल’ असा अभिप्रायही ...

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या व जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. दुर्मीळ अन् विविधरंगी फुले पर्यटकांना आकर्षिक करीत असून, शनिवारी भारतासह रशिया व जर्मनी येथील विदेशी पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. तसेच फुले पाहून ‘कास इज वंडरफुल’ असा अभिप्रायही नोंदविला.सातारा शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असणाºया कास पठाराने आपल्या दुर्मीळ व विविधरंगी फुलांची ख्याती सातासमुद्रापार पोहोचविली आहे. देशभरातील पर्यटकांबरोबरच परदेशी पाहुण्यांच्या हृदयात देखील येथील फुलांनी आपले स्थान पक्के केले आहे. फुलांचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक कास पठारावर दाखल होऊ लागले आहेत. चालू हंगामात आतापर्यंत स्वीझर्लंड, रशिया या देशातील पर्यटकांनी पुष्प पठाराचा नजराणा अनुभवला असून, पठाराचे सौंदर्य आपल्या कॅमेºयात बंदिस्त केले आहे. एवढेच नव्हे परतीच्या प्रवासाला निघताना विदेशी पर्यटकांनी आपल्या भाषेत फुले खूप सुंदर असल्याचा अभिप्रायही नोंदविला आहे.सध्या पठारावर गेंद, सीतेची आसवे ही फुले मोठ्या प्रमाणावर बहरली असल्याने बहुतांशी ठिकाणी पांढºया व जांभळ्या फुलांचे गालिचे दिसू लागले आहेत. फुले उमलण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने काही दिवसांत पठारावर फुलांचे गालिचे पाहावयास मिळणार आहे. अबोलिमा, सोनकी, आभाळी, नभाळी, ड्रॉसेरा, कंदील पुष्प आदी प्रकारच्या फुलांना बहर आला असून, हजारो पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत.गतवर्षी फुले पाहण्यासाठी रशिया, जपान, अमेरिका, इग्लंड, जर्मनी आदी देशांतील पर्यटकांनी कासला भेट दिली होती.यवतेश्वर घाटात वाहनांच्या रांगासाताºयाहून कासला जाण्यासाठी यवतेश्वर घाटातूनच जावे लागते. शनिवार व रविवार सलग सुट्या असल्यामुळे राज्यभरातील हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मनस्तापही सहन करावा लागला. कासकडे जाताना व कासहून पुन्हा साताºयाकडे येताना यवतेश्वर घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तब्बल चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे मंदावली. चार किलोमीटर लांबीचा घाट उतरण्यासाठी पर्यटकांना अर्धा ते पाऊण तास इतका वेळ लागला.