शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

परदेशी पाहुणे म्हणे.. ‘कास इज वंडरफुल!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या व जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. दुर्मीळ अन् विविधरंगी फुले पर्यटकांना आकर्षिक करीत असून, शनिवारी भारतासह रशिया व जर्मनी येथील विदेशी पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. तसेच फुले पाहून ‘कास इज वंडरफुल’ असा अभिप्रायही ...

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या व जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. दुर्मीळ अन् विविधरंगी फुले पर्यटकांना आकर्षिक करीत असून, शनिवारी भारतासह रशिया व जर्मनी येथील विदेशी पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. तसेच फुले पाहून ‘कास इज वंडरफुल’ असा अभिप्रायही नोंदविला.सातारा शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असणाºया कास पठाराने आपल्या दुर्मीळ व विविधरंगी फुलांची ख्याती सातासमुद्रापार पोहोचविली आहे. देशभरातील पर्यटकांबरोबरच परदेशी पाहुण्यांच्या हृदयात देखील येथील फुलांनी आपले स्थान पक्के केले आहे. फुलांचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक कास पठारावर दाखल होऊ लागले आहेत. चालू हंगामात आतापर्यंत स्वीझर्लंड, रशिया या देशातील पर्यटकांनी पुष्प पठाराचा नजराणा अनुभवला असून, पठाराचे सौंदर्य आपल्या कॅमेºयात बंदिस्त केले आहे. एवढेच नव्हे परतीच्या प्रवासाला निघताना विदेशी पर्यटकांनी आपल्या भाषेत फुले खूप सुंदर असल्याचा अभिप्रायही नोंदविला आहे.सध्या पठारावर गेंद, सीतेची आसवे ही फुले मोठ्या प्रमाणावर बहरली असल्याने बहुतांशी ठिकाणी पांढºया व जांभळ्या फुलांचे गालिचे दिसू लागले आहेत. फुले उमलण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने काही दिवसांत पठारावर फुलांचे गालिचे पाहावयास मिळणार आहे. अबोलिमा, सोनकी, आभाळी, नभाळी, ड्रॉसेरा, कंदील पुष्प आदी प्रकारच्या फुलांना बहर आला असून, हजारो पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत.गतवर्षी फुले पाहण्यासाठी रशिया, जपान, अमेरिका, इग्लंड, जर्मनी आदी देशांतील पर्यटकांनी कासला भेट दिली होती.यवतेश्वर घाटात वाहनांच्या रांगासाताºयाहून कासला जाण्यासाठी यवतेश्वर घाटातूनच जावे लागते. शनिवार व रविवार सलग सुट्या असल्यामुळे राज्यभरातील हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मनस्तापही सहन करावा लागला. कासकडे जाताना व कासहून पुन्हा साताºयाकडे येताना यवतेश्वर घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तब्बल चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे मंदावली. चार किलोमीटर लांबीचा घाट उतरण्यासाठी पर्यटकांना अर्धा ते पाऊण तास इतका वेळ लागला.