शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हाॅटेल्स, ढाब्यावर रात्री १० पर्यंतच खाद्यपदार्थ मिळणार; पोलिसांचा निर्णय

By नितीन काळेल | Updated: December 22, 2023 23:57 IST

साडे आकराला आस्थापन बंद; वेळ पाळावी लागणार

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: रात्रीच्या वेळी हाॅटेल्स, ढाबे निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी सुरू राहण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. याचा विचार करुन पोलिस अधीक्षकांनी रात्री १० पर्यंत खाद्यपदार्थ पुरविण्यास तर साडे अकराला आस्थापना बंद करण्याचे फर्मान काढले आहे. यामुळे यापुढे संबंधितांना वेळ पाळावी लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रात्रीच्यावेळी काही हाॅटेल्स, ढाबे निर्धारित वेळेपेक्षा जास्त कालावधीसाठी सुरू असतात. त्यामुळे मद्यपी व्यक्तींकडून अनुचित प्रकार होऊ शकतो. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊन गुन्हेगारी प्रकार घडण्याची दाट शक्यता असते. अशा घटनांना प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने हाॅटेल्स, ढाबा विहित कालावधीत बंद होणे गरजेचे आहे. यासाठी रात्री १० वाजेपर्यंत ग्राहकांना खाद्यपदार्थ पुरविण्यास हरकत नाही. तर रात्री साडे आकराला आस्थापना बंद करावी लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व हाॅटेल्स, ढाबाचालकांना या नियमाचे पालन करावे लागणार आहे. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfoodअन्न