शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

यवतेश्वर घाटातील झरा पाईपात गुंडाळला, पर्यटक गायब ; वानरांना मिळणारा खाऊही थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 12:34 IST

सातारा-कास मार्गावरील पर्यटकांना नेहमीच मोहित करणारा, पावसाळयात खळाळून वाहणारा धबधबा पाईपात गुंडाळला गेला आहे. पाईपच्या माध्यमातून ते पाणी टाकीत साठवून पूल बांधण्यासाठी वापरले जात आहे. परंतु, छोटा धबधबा बंद झाल्याने पर्यटकांना सेल्फी, फोटोसेशनला मुकावे लागत आहे.

ठळक मुद्देछोटा धबधबा बंद झाल्याने पर्यटकांचे तेथे थांबणे झाले कमी पर्यटक मुकले सेल्फी, फोटोसेशनला बांधकामासाठी पाणी वापरणे सोईचे, परंतु धबधबाच गुंडाळला पाईपात

पेट्री : सातारा-कास मार्गावरील पर्यटकांना नेहमीच मोहित करणारा, पावसाळयात खळाळून वाहणारा धबधबा पाईपात गुंडाळला गेला आहे. पाईपच्या माध्यमातून ते पाणी टाकीत साठवून पूल बांधण्यासाठी वापरले जात आहे. परंतु, छोटा धबधबा बंद झाल्याने पर्यटकांना सेल्फी, फोटोसेशनला मुकावे लागत आहे. पर्यटकांचे तेथे थांबणेही कमी झाल्याने खाऊ कमी झाल्याने वानरसेना गायब झाली आहे.जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास, बामणोलीला जाण्यासाठी पर्यटकांना यवतेश्वर घाटातून प्रवास करावा लागतो.

कास, बामणोली पर्यटनस्थळी जिल्हा, परजिल्ह्यातुन पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी वाढते. वाहनचालक, नोकरदार, शाळा-महाविद्यालयीन तरूणाई, शाळकरी मुलांची सतत वर्दळ असते.यवतेश्वर घाटात ठिकठिकाणी लहान मोठे धबधबे तयार झाले आहेत. पाणी वाहण्याचे प्रमाण कमी कमी होत जात उन्हाळ्यात अत्यल्प म्हणजेच थेंबथेंब पाणी पडताना दिसते. तेथे प्रवासी हमखास थांबून काही वेळ आराम करतात.सांबरवाडी हद्दीत धबधब्यापासून काही अंतरावर झरा आहे. या झऱ्याचे पाणी हौदात आले आहे.

हौदातील पाणी ओव्हरफ्लो झाले की तुटलेल्या पाईपलाईन मधून पाणी यवतेश्वर घाटातील या कडेकपारीतून वाहू लागते. हिवाळ्यानंतर पाणी कमी-कमी होत जाते. सद्या झऱ्यातून बऱ्यापैकी पाणी वाहत असते. तेथे पर्यटक थांबत असल्याने समोरच दगडावर, संरक्षक कठड्यावर वानरे ओळीत बसलेली असतात. पर्यटकही त्यांना खाऊ देतात.

या मार्गावर दीड महिन्यापूर्वी खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. झऱ्यातून वाया जाणारे पाणी बांधकामासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

थेट तुटलेल्या लोखंडी पाईपलाईनला पाईप लावून टँकरद्वारे बांधकामासाठी पाणी वापरणे सोईचे झाले आहे. परंतु झरा अथवा धबधबा पाईपातच गुंडाळला गेल्याने पर्यटकांचे फोटोसेशनसाठी थांबण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वानरसेनेला खाद्य पदार्थ मिळणेही कमी झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater transportजलवाहतूक