शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

फुले उमलण्यापूर्वीच कास पर्यटकांनी फुलले

By admin | Updated: August 15, 2016 00:47 IST

सलग सुट्यांमुळे गर्दी : राज्यभरातील पर्यटकांची हजेरी

सातारा : स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग लागून आलेल्या सुट्यांमुळे जैवविविधतेने नटलेल्या कास पठाराला राज्यभरातील हजारो पर्यटकांनी रविवारी भेट दिली. फुलांना मुख्य हंगाम अजून सुरू झाला नसला तरी पुष्प पठार पर्यटकांनी बहरून गेले आहे. एकाच दिवसात तब्बल एक हजार ते बाराशे वाहने पठारावर दाखल झाल्याने जागोजागी वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच वाहनांच्याही दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. कास पठार हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. येथील फुले देशभरातील पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. फुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर याठिकाणी पर्यटकांची मांदियाळी सुरू होते. मात्र, सध्या सलग सुट्यांमुळे कास पठार व तलावाला यात्रेचे स्वरूप आले आहे. रविवारी एकाच दिवशी राज्यासह परराज्यातील हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. कास पठारावरील फुले उमलण्यासाठी मुबलक सूर्यप्रकाशाची गरज आहे. मात्र, धुके व पावसामुळे फुलांचा हंगाम लांबणीवर पडला आहे. सध्या चार ते पाच प्रकारची फुले उमलली असून, पर्यटक या फुलांसोबत सेल्फीसह फोटोसेशन करताना दिसून आले. सोमवारीही सुटी असल्याने पर्यटकांची संख्या आणखीन वाढणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)