शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्के मतदान वाढले

By admin | Updated: October 16, 2014 00:07 IST

रविवारी मतमोजणी : कऱ्हाड दक्षिण, पाटणकडे सर्वांच्या नजरा

सातारा : गतविधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत सरासरी मतदान वाढले आहे. यावर्षी मतदानाची टक्केवारी पाच टक्क्याने वाढली असून, एकूण टक्केवारी ६७.२४ टक्के इतकी आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी निश्चित नाही. यामध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले होते. संपर्कहीन असणाऱ्या मतदान केंद्राची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाली नसल्यामुळे अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नव्हती. दरम्यान, कऱ्हाड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे येथील निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील संपूर्ण मतदानप्रक्रिया संपल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नियोजन भवनात पत्रकार परिषद घेतली आणि जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुनंदा गायकवाड आदी उपस्थित होते.जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी मतदान झाले. आठही मतदारसंघांत ८७ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये फलटण १४, वाई १०, कोरेगाव ८, माण १२, कऱ्हाड उत्तर ७, कऱ्हाड दक्षिण १२, पाटण १५, सातारा विधानसभा मतदारसंघातील ९ उमेदवारांचा समावेश होता. एकूण मतदान केंद्रांची संख्या २,९५0 इतकी होती. यापैकी तेरा मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग तर पाच मतदान केंद्रे आदर्श मॉडेल म्हणून घोषित करण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी साता सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पहिल्या टप्प्यात मतदानाचा वेग वाढला होता. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत १८.६५ टक्के मतदान झाले. पाटण विधानसभा मतदारसंघात मात्र मतदानाचा वेग सर्वाधिक होता. यानंतर मात्र जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातही मतदान वाढतच गेले. बारानंतर मात्र कमी झाले. पुन्हा दुपारी तीननंतर मतदानाचा वेग वाढला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ५९.६0 टक्के मतदान झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात मतदानादरम्यान कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस दलही ठिकठिकाणी सतर्क होते. सर्व कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर वेळेत पोहोचले होते. (प्रतिनिधी)बेवकास्टिंगमध्ये अडथळेजिल्ह्यात यावेळी पहिल्यांदाच वाई विधानसभा मतदारसंघातील तेरा मतदान केंद्रांवर बेवकास्टिंग झाले. परिणामी ही मतदान केंदे्र ‘लाईव्ह’ होती. वेबकास्टिंगमुळे ‘जी-मेल’ आणि ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून जगभरात कोठेही एका क्लिकवर संपूर्ण मतदानप्रक्रिया दिसणार होती. मात्र, यामध्ये काहीदा अडथळे आले. तरीही राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने हे अडथळे दूर करत मतदान केंद्रावरील प्रक्रिया ‘लाईव्ह’ करण्यात यश आले.अठरा ठिकाणीईव्हीएम बदललीजिल्ह्यात अठरा मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे तेथे नवीन मतदान यंत्रे दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. २००९ मध्ये जी मतदान यंत्रे वापरण्यात आली, त्याचाच वापर यावेळी करण्यात आला. काही मतदान यंत्रांच्या बॅटरी खराब झाल्या असल्याची भीती जिल्हा प्रशासनाला होती. मात्र, त्यावर उपाययोजना म्हणून मुंबई आणि पुणे येथून ८०० अतिरिक्त बॅटरी मागवून घेतल्या होत्या.