शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

मधमाश्यांसाठी पाच दशके झटणाºया मधपाळांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी मधुमक्षिकापालन करीत आहे. त्यांच्यामुळेच सह्याद्रीच्या कुशीतील मधमाश्यांचा अधिवास आजही जिवंत आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ मधुमक्षिका पालन करणाºया दहा मधपाळांचा मधसंचलनालय विभागाच्या वतीने गौरव केला.जागतिक मधुमक्षिका पालन दिनानिमित्त मध संचालनालयाच्या वतीने येथील पालिका सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी मधुमक्षिकापालन करीत आहे. त्यांच्यामुळेच सह्याद्रीच्या कुशीतील मधमाश्यांचा अधिवास आजही जिवंत आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ मधुमक्षिका पालन करणाºया दहा मधपाळांचा मधसंचलनालय विभागाच्या वतीने गौरव केला.जागतिक मधुमक्षिका पालन दिनानिमित्त मध संचालनालयाच्या वतीने येथील पालिका सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत खादी व ग्रामोद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांच्या हस्ते मधपाळांचा गौरव झाला.कार्यक्रमास बाळासाहेब भिलारे, तालुका वनाधिकारी रणजीत गायकवाड, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बनसोडे, संचालक माधव दराडे, रसायनशास्त्रज्ञ डी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.मधमाश्या पालन करणारे मधपाळ हे खºया अर्थाने मध, मेण याचे उत्पादन घेत निसर्गाचे सवंर्धन व संरक्षण करीत आहेत. महाबळेश्वर या एकाच तालुक्यात हजारो लोक या व्यवसायात आहेत. आठ ते दहा हजार मधमाश्यांच्या पेट्या येथील मधपाळांकडे आहेत. वसाहती निर्माण करून मधमाश्यांची संख्या वाढविण्यासाठी हे मधपाळ पन्नास वर्षांपासून कार्यरत आहेत. डोंगर दºयात राहणाºया या शेतकºयांनी मधमाश्यांचा अधिवास जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत.यावेळी बाळासाहेब भिलारे, महादेव जाधव, रणजित गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित शेतकºयांना मधमाशी संवर्धन, संगोपन व संरक्षणाची शपथ देण्यात आली. माधव दराडे यांनी प्रास्तविक केले तर डी. आर. पाटील यांनी आभार मानले.अनुदानाची योजना मंजुरीच्याअंतिम टप्प्यात : बिपीन जगताप‘मधपाळांना मार्गदर्शन करताना खादी व ग्रामोद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप म्हणाले, ‘महाबळेश्वर तालुक्यातील सर्व मधपाळांनी मधमाश्यांना जगविले आहे. त्यांचा प्रचार-प्रसार केला आहे. या सर्व मधपाळांनी केलेले काम सामाजिक कार्य आहे. राज्य शासन मधमाश्यापालन योजनेबाबत सकारात्मक आहे. मधमाश्यांसाठी पन्नास टक्के अनुदानाची योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. राज्यात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यातील सर्व भागात ही योजना राबविली जाणार आहे,’ असेही ते म्हणाले.