शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

ग्रामीण भागातील सव्वा लाख कुटुंबे घराच्या प्रतीक्षेत : सातारा जिल्ह्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:57 IST

स्वप्नील शिंदे । सातारा : मराठी भाषेतील शेक्सपिअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तीरेखा साकारणारा ...

ठळक मुद्दे‘प्रधानमंत्री आवास’च्या अर्जावर निर्णयच नाही

स्वप्नील शिंदे ।सातारा : मराठी भाषेतील शेक्सपिअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तीरेखा साकारणारा नट जेंव्हा ‘कुणी घर देता का घर’ हे वाक्य उच्चारतो. तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहतो. नाटकामध्ये बेलवलकर यांच्यावर परिस्थितीमुळे आलेली वेळ आज सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाºया तब्बल १ लाख १७ हजार ४५० कुटुंबांवर आली आहे. कारण दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करूनही अद्याप त्यांना घर मिळाले नाही.

गावातील गट-तटामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेले लोक आजपर्यंत घरकूल योजनेपासून वंचित होते. आवास योजना जाहीर केल्यानंतर जुन्या आणि पडक्या घरात राहणाºया लोकांनी आपला या योजनेत समावेश करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये धाव घेतली. ग्रामसभेत या लोकांची घरासाठी नावेही मंजूर झाली. त्यासाठी ग्रामसेवकांनी अर्जदारांच्या घरी जाऊन आवश्यक माहिती भरून घेतली. गाव पातळीवर आवास योजनेत नाव मंजूर झाले. तसेच प्रशासनाकडून सर्व्हे झाल्यामुळे या योजनेपासून वंचित असलेल्या लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या. अनेक वर्षे जुन्या व पडक्या घरात राहणारे लोक आता आपल्या हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न पाहू लागले. त्यासाठी आवश्यक असणारी तयारीही त्यांनी केली. मात्र, दोन वर्षे उलटून ही अद्याप योजनेस मंजुरी मिळाली नाही.

शासकीय आकडेवारीनुसार सध्या सातारा जिल्ह्यातील गावागावांमधील १ लाख १७ हजार ४८३ लोकांनी नावनोंदणी केली. त्यापैकी ३३ लोकांचे अर्ज नाकारण्यात आले. त्यांची आवास योजनेच्या वेबसाईटवर माहिती भरण्यात आली आहे. त्यांचा ‘ड’ यादीत समावेश केला आहे. अर्जदारांना ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर हेलपाटे मारावे लागतआहे. त्यांना आज ‘कुणी घर देता का घर,’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.५ हजार ३८६ घरे पूर्णप्रधानमंत्री आवास योजनेतून अद्याप ‘ब’ वर्ग यादीमधील घरांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ५ हजार ३८६ घरे बांधून पूर्ण झाली आहेत. तर १ हजार २८२ घर पूर्ण झाली नाहीत. 

दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ग्रामसभेत नावनोंदणी केली. त्यासाठी ग्रामसेवक व एका अधिकाºयाने घरी येऊन सर्वेक्षण केले होते. अद्यापही घर मंजूर झाले नाही. आज जुन्या घराची पडझड झाली असून, नवीन घर बांधण्याची सध्या ऐपत नाही.-सुनीता कुºहाडे, अर्जदारशासनाने २०१२ मध्ये आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण केले होते. त्या यादीनुसार ज्या लोकांना घराची अत्यंत आवश्यकता होती. अशा लोकांना प्राधान्य देण्यात आले असून, त्यांची ‘क’ वर्ग यादी तयारी केली आहे. त्यांना घरे मंजूर झाली आहेत. आगामी काळात ‘ड’ वर्ग यादीतील लोकांना घरे मंजूर होतील.-अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgovernment schemeसरकारी योजना