शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

मायणी जिल्हा परिषद गटातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:31 IST

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी जिल्हा परिषद गटातील १८ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. यातील पाच ग्रामपंचायती ...

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी जिल्हा परिषद गटातील १८ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, अन्य दोन गावांमध्ये एका जागेसाठी मतदान होणार आहे.

खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मायणी जिल्हा परिषद गटातील अठरा ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे या जिल्हा परिषद गटांमध्ये असणारे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या राजकीय गटातच दुरंगी लढती होणार असेच चित्र नेहमी असते.

यावेळी अनेक लहान-मोठ्या गावांमध्ये गावपतळीवर स्थानिक विकास आघाड्या, परिवर्तन पॅनेल यासह महाआघाड्या स्थापन करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या कशा पद्धतीने होतील यावर भर दिला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक गावात गावभेटी, कोपरा सभा, प्रचार फेरी व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपण कशाप्रकारे या भागाचा विकास केला आहे व कोणती विकासकामे केली आहेत, याची माहिती देत आहेत. शिवाय कोणत्या विकासकामांवर भर दिला जाणार आहे, याची माहिती देत आहेत.

मायणी जिल्हा परिषद गटातील गुंडेवाडी (मराठानगर), हिवरवाडी, ढोकळवाडी, गारुडी व अनफळे या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर मुळीकवाडी व तरसवाडी या दोन ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तर उर्वरित चितळी, कलेढोण, पाचवड, कान्हरवाडी, कानकात्रे, गारळेवाडी, मोराळे व धोंडेवाडी गावांमध्ये दुरंगी लढत पहावयास मिळणार आहे.

(चौकट)

भावकीतच वाढली चुरस..!

मोठी भावकी व राजकीय वारसा असलेल्या कुटुंबांमध्येच उमेदवारी देण्यात आली आहे, तर बहुतांश ठिकाणी मोठ्या भावकीतच दोन्ही गटांकडून उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे ही ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय चुरशीची होत आहे.

(चौकट)

अनेक गावांमध्ये शांतता बैठक

मायणी जिल्हा परिषद गट राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने वडूज पोलीस पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख व पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी अनेक गावांमध्ये शांतता बैठकांचे आयोजन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.