शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
2
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
3
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
4
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
5
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
6
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
7
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
8
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
9
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
11
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
12
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
13
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
14
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
15
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
16
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
17
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
18
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
19
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
20
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

मायणी जिल्हा परिषद गटातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:31 IST

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी जिल्हा परिषद गटातील १८ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. यातील पाच ग्रामपंचायती ...

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी जिल्हा परिषद गटातील १८ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, अन्य दोन गावांमध्ये एका जागेसाठी मतदान होणार आहे.

खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मायणी जिल्हा परिषद गटातील अठरा ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे या जिल्हा परिषद गटांमध्ये असणारे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या राजकीय गटातच दुरंगी लढती होणार असेच चित्र नेहमी असते.

यावेळी अनेक लहान-मोठ्या गावांमध्ये गावपतळीवर स्थानिक विकास आघाड्या, परिवर्तन पॅनेल यासह महाआघाड्या स्थापन करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या कशा पद्धतीने होतील यावर भर दिला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक गावात गावभेटी, कोपरा सभा, प्रचार फेरी व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपण कशाप्रकारे या भागाचा विकास केला आहे व कोणती विकासकामे केली आहेत, याची माहिती देत आहेत. शिवाय कोणत्या विकासकामांवर भर दिला जाणार आहे, याची माहिती देत आहेत.

मायणी जिल्हा परिषद गटातील गुंडेवाडी (मराठानगर), हिवरवाडी, ढोकळवाडी, गारुडी व अनफळे या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर मुळीकवाडी व तरसवाडी या दोन ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तर उर्वरित चितळी, कलेढोण, पाचवड, कान्हरवाडी, कानकात्रे, गारळेवाडी, मोराळे व धोंडेवाडी गावांमध्ये दुरंगी लढत पहावयास मिळणार आहे.

(चौकट)

भावकीतच वाढली चुरस..!

मोठी भावकी व राजकीय वारसा असलेल्या कुटुंबांमध्येच उमेदवारी देण्यात आली आहे, तर बहुतांश ठिकाणी मोठ्या भावकीतच दोन्ही गटांकडून उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे ही ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय चुरशीची होत आहे.

(चौकट)

अनेक गावांमध्ये शांतता बैठक

मायणी जिल्हा परिषद गट राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने वडूज पोलीस पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख व पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी अनेक गावांमध्ये शांतता बैठकांचे आयोजन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.