शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
8
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
9
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
10
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
11
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
12
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
13
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
14
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
15
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
16
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
17
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
18
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
19
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
20
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

पाच धरणांनी गाठली ‘पन्नाशी’

By admin | Updated: June 26, 2015 22:56 IST

‘कोयना’ निम्म्यावर : जिल्ह्यातील सात धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

सचिन काकडे -सातारा -सातारा : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. लहान-मोठ्या एकूण १५ धरणांपैकी पाच धरणांमध्ये पन्नास टक्के पाणीसाठा झाला असून, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे ‘कोयना’ही निम्म्यावर आले आहे. धरणांमधील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी सात धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागासह अनेक ठिकाणी यंदा मान्सूनचे दमदार हजेरी लावली. पावसामुळे बंधारे, ओढे, विहिरींची पाणीपातळी वाढल्याने अनेक ठिकाणचा पाणीप्रश्न मिटला आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने वाढत आहे. जून महिना संपण्याअगोदरच जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, तारळी, वीर, मोरणा गुरेघर ही धरणे पन्नास टक्के भरली आहे. उत्तरमांड, महू, हातगेघर आणि नागेवाडी या धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.जून महिन्यात केवळ २० दिवसांमध्येच जिल्ह्यातील अर्ध्या धरणांनी पन्नाशी गाठली असून, पावसाचा जोर पाहता ही धरणे जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरतील, असे सध्याचे चित्र आहे. सात धरणांमधून विसर्ग पाण्याचा येवा पाहता धरणांमधील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सात धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. उरमोडीतून प्रतिसेकंद दोन हजार ६०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर वीर धरणातून ८००, तारळी, १४४.७०, हातगेघर १४८, महू ६३०, वांग ४१३ क्यूसेक तर मोरणा-गुरेघर धरणातून प्रतिसेकंद एक हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणेक्षमताआजचागेल्यावर्षीचापाणीसाठापाणीसाठा कण्हेर१०.१०५.९७३.२०उरमोडी९.८०७.७२५.१३तारळी५.८५३.२९४.०६वीर९.८३४.८००.७७३मोरणा-गुरेघर१.८३०.८५००.२३१ कोयनेत दहा दिवसांत एक हजार मिलिमीटर पाऊसअरुण पवार ल्ल पाटणकोयना पाणलोट क्षेत्रात १९ जूनपासून पावसाने थैमान घातले. गुरुवारी रात्रीपासून पाऊस अचानकपणे मंदावला असला तरी गेल्या दहा दिवसांत कोयना, महाबळेश्वर व नवजा या पर्जन्यमापकांवर अनुक्रमे १०३९, ११४४, १२१९ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. त्यामुळे १ जून रोजी २९ टीएमसी वर असलेला कोयना धरणातील पाणीसाठा आता ४८.७३ टीएमसी म्हणजेच अर्ध्यावर पोहोचला आहे.कोयना धरणाच्या भिंतीपासून कोयना नदीचे उगमस्थान असलेल्या महाबळेश्वरपर्यंतचा ६० किलोमीटर अंतरावर एकूण ९ पर्जन्यमापकांवर पावसाची नोंद होत असते. यामध्ये कोयना, नवजा, महाबळेश्वर, प्रतापगड, वळवळ, सोनाट, कारगाव, काठी बामणोली अतिपर्जन्य ठिकाणांचा समावेश आहे. येथून येणाऱ्या पाण्याचा साठा कोयना धरणात होतो. दरवर्षीच्या पावसाळ्यात कोयना धरण पूर्णक्षमतेने भरेपर्यंत सरासरी ४५०० हजार मिलिमीटर पाऊस होतो. यंदा मात्र जून महिन्यातच पावसाने जोरदार मारा केल्यामळे २६ जूनपर्यंत एक हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या दहा दिवसांतच कोयना धरणात विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाची पाणीपातळी २१०५ फूट ९ इंच इतकी झाली आहे. पाऊस ओढ देईल की पूरस्थिती येईल?जून महिन्यातच पावसाने कहर केल्यामुळे धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी दिवसात जरी पावसाने ओढ दिली तरी काळजीचे कारण नाही. मात्र, जर पुन्हा जुलै महिन्यात पाऊस बळावला तर मोठ्या प्रमाणात कोयना धरणातून पाणी सोडावे लागेल व पूरस्थिती निर्माण होईल.