शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाच धरणांनी गाठली ‘पन्नाशी’

By admin | Updated: June 26, 2015 22:56 IST

‘कोयना’ निम्म्यावर : जिल्ह्यातील सात धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

सचिन काकडे -सातारा -सातारा : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. लहान-मोठ्या एकूण १५ धरणांपैकी पाच धरणांमध्ये पन्नास टक्के पाणीसाठा झाला असून, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे ‘कोयना’ही निम्म्यावर आले आहे. धरणांमधील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी सात धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागासह अनेक ठिकाणी यंदा मान्सूनचे दमदार हजेरी लावली. पावसामुळे बंधारे, ओढे, विहिरींची पाणीपातळी वाढल्याने अनेक ठिकाणचा पाणीप्रश्न मिटला आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने वाढत आहे. जून महिना संपण्याअगोदरच जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, तारळी, वीर, मोरणा गुरेघर ही धरणे पन्नास टक्के भरली आहे. उत्तरमांड, महू, हातगेघर आणि नागेवाडी या धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.जून महिन्यात केवळ २० दिवसांमध्येच जिल्ह्यातील अर्ध्या धरणांनी पन्नाशी गाठली असून, पावसाचा जोर पाहता ही धरणे जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरतील, असे सध्याचे चित्र आहे. सात धरणांमधून विसर्ग पाण्याचा येवा पाहता धरणांमधील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सात धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. उरमोडीतून प्रतिसेकंद दोन हजार ६०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर वीर धरणातून ८००, तारळी, १४४.७०, हातगेघर १४८, महू ६३०, वांग ४१३ क्यूसेक तर मोरणा-गुरेघर धरणातून प्रतिसेकंद एक हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणेक्षमताआजचागेल्यावर्षीचापाणीसाठापाणीसाठा कण्हेर१०.१०५.९७३.२०उरमोडी९.८०७.७२५.१३तारळी५.८५३.२९४.०६वीर९.८३४.८००.७७३मोरणा-गुरेघर१.८३०.८५००.२३१ कोयनेत दहा दिवसांत एक हजार मिलिमीटर पाऊसअरुण पवार ल्ल पाटणकोयना पाणलोट क्षेत्रात १९ जूनपासून पावसाने थैमान घातले. गुरुवारी रात्रीपासून पाऊस अचानकपणे मंदावला असला तरी गेल्या दहा दिवसांत कोयना, महाबळेश्वर व नवजा या पर्जन्यमापकांवर अनुक्रमे १०३९, ११४४, १२१९ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. त्यामुळे १ जून रोजी २९ टीएमसी वर असलेला कोयना धरणातील पाणीसाठा आता ४८.७३ टीएमसी म्हणजेच अर्ध्यावर पोहोचला आहे.कोयना धरणाच्या भिंतीपासून कोयना नदीचे उगमस्थान असलेल्या महाबळेश्वरपर्यंतचा ६० किलोमीटर अंतरावर एकूण ९ पर्जन्यमापकांवर पावसाची नोंद होत असते. यामध्ये कोयना, नवजा, महाबळेश्वर, प्रतापगड, वळवळ, सोनाट, कारगाव, काठी बामणोली अतिपर्जन्य ठिकाणांचा समावेश आहे. येथून येणाऱ्या पाण्याचा साठा कोयना धरणात होतो. दरवर्षीच्या पावसाळ्यात कोयना धरण पूर्णक्षमतेने भरेपर्यंत सरासरी ४५०० हजार मिलिमीटर पाऊस होतो. यंदा मात्र जून महिन्यातच पावसाने जोरदार मारा केल्यामळे २६ जूनपर्यंत एक हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या दहा दिवसांतच कोयना धरणात विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाची पाणीपातळी २१०५ फूट ९ इंच इतकी झाली आहे. पाऊस ओढ देईल की पूरस्थिती येईल?जून महिन्यातच पावसाने कहर केल्यामुळे धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी दिवसात जरी पावसाने ओढ दिली तरी काळजीचे कारण नाही. मात्र, जर पुन्हा जुलै महिन्यात पाऊस बळावला तर मोठ्या प्रमाणात कोयना धरणातून पाणी सोडावे लागेल व पूरस्थिती निर्माण होईल.