शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पाच धरणांनी गाठली ‘पन्नाशी’

By admin | Updated: June 26, 2015 22:56 IST

‘कोयना’ निम्म्यावर : जिल्ह्यातील सात धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

सचिन काकडे -सातारा -सातारा : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. लहान-मोठ्या एकूण १५ धरणांपैकी पाच धरणांमध्ये पन्नास टक्के पाणीसाठा झाला असून, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे ‘कोयना’ही निम्म्यावर आले आहे. धरणांमधील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी सात धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागासह अनेक ठिकाणी यंदा मान्सूनचे दमदार हजेरी लावली. पावसामुळे बंधारे, ओढे, विहिरींची पाणीपातळी वाढल्याने अनेक ठिकाणचा पाणीप्रश्न मिटला आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने वाढत आहे. जून महिना संपण्याअगोदरच जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, तारळी, वीर, मोरणा गुरेघर ही धरणे पन्नास टक्के भरली आहे. उत्तरमांड, महू, हातगेघर आणि नागेवाडी या धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.जून महिन्यात केवळ २० दिवसांमध्येच जिल्ह्यातील अर्ध्या धरणांनी पन्नाशी गाठली असून, पावसाचा जोर पाहता ही धरणे जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरतील, असे सध्याचे चित्र आहे. सात धरणांमधून विसर्ग पाण्याचा येवा पाहता धरणांमधील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सात धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. उरमोडीतून प्रतिसेकंद दोन हजार ६०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर वीर धरणातून ८००, तारळी, १४४.७०, हातगेघर १४८, महू ६३०, वांग ४१३ क्यूसेक तर मोरणा-गुरेघर धरणातून प्रतिसेकंद एक हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणेक्षमताआजचागेल्यावर्षीचापाणीसाठापाणीसाठा कण्हेर१०.१०५.९७३.२०उरमोडी९.८०७.७२५.१३तारळी५.८५३.२९४.०६वीर९.८३४.८००.७७३मोरणा-गुरेघर१.८३०.८५००.२३१ कोयनेत दहा दिवसांत एक हजार मिलिमीटर पाऊसअरुण पवार ल्ल पाटणकोयना पाणलोट क्षेत्रात १९ जूनपासून पावसाने थैमान घातले. गुरुवारी रात्रीपासून पाऊस अचानकपणे मंदावला असला तरी गेल्या दहा दिवसांत कोयना, महाबळेश्वर व नवजा या पर्जन्यमापकांवर अनुक्रमे १०३९, ११४४, १२१९ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. त्यामुळे १ जून रोजी २९ टीएमसी वर असलेला कोयना धरणातील पाणीसाठा आता ४८.७३ टीएमसी म्हणजेच अर्ध्यावर पोहोचला आहे.कोयना धरणाच्या भिंतीपासून कोयना नदीचे उगमस्थान असलेल्या महाबळेश्वरपर्यंतचा ६० किलोमीटर अंतरावर एकूण ९ पर्जन्यमापकांवर पावसाची नोंद होत असते. यामध्ये कोयना, नवजा, महाबळेश्वर, प्रतापगड, वळवळ, सोनाट, कारगाव, काठी बामणोली अतिपर्जन्य ठिकाणांचा समावेश आहे. येथून येणाऱ्या पाण्याचा साठा कोयना धरणात होतो. दरवर्षीच्या पावसाळ्यात कोयना धरण पूर्णक्षमतेने भरेपर्यंत सरासरी ४५०० हजार मिलिमीटर पाऊस होतो. यंदा मात्र जून महिन्यातच पावसाने जोरदार मारा केल्यामळे २६ जूनपर्यंत एक हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या दहा दिवसांतच कोयना धरणात विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाची पाणीपातळी २१०५ फूट ९ इंच इतकी झाली आहे. पाऊस ओढ देईल की पूरस्थिती येईल?जून महिन्यातच पावसाने कहर केल्यामुळे धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी दिवसात जरी पावसाने ओढ दिली तरी काळजीचे कारण नाही. मात्र, जर पुन्हा जुलै महिन्यात पाऊस बळावला तर मोठ्या प्रमाणात कोयना धरणातून पाणी सोडावे लागेल व पूरस्थिती निर्माण होईल.