शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पाच धरणांनी गाठली ‘पन्नाशी’

By admin | Updated: June 26, 2015 22:56 IST

‘कोयना’ निम्म्यावर : जिल्ह्यातील सात धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

सचिन काकडे -सातारा -सातारा : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. लहान-मोठ्या एकूण १५ धरणांपैकी पाच धरणांमध्ये पन्नास टक्के पाणीसाठा झाला असून, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे ‘कोयना’ही निम्म्यावर आले आहे. धरणांमधील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी सात धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागासह अनेक ठिकाणी यंदा मान्सूनचे दमदार हजेरी लावली. पावसामुळे बंधारे, ओढे, विहिरींची पाणीपातळी वाढल्याने अनेक ठिकाणचा पाणीप्रश्न मिटला आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने वाढत आहे. जून महिना संपण्याअगोदरच जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, तारळी, वीर, मोरणा गुरेघर ही धरणे पन्नास टक्के भरली आहे. उत्तरमांड, महू, हातगेघर आणि नागेवाडी या धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.जून महिन्यात केवळ २० दिवसांमध्येच जिल्ह्यातील अर्ध्या धरणांनी पन्नाशी गाठली असून, पावसाचा जोर पाहता ही धरणे जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरतील, असे सध्याचे चित्र आहे. सात धरणांमधून विसर्ग पाण्याचा येवा पाहता धरणांमधील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सात धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. उरमोडीतून प्रतिसेकंद दोन हजार ६०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर वीर धरणातून ८००, तारळी, १४४.७०, हातगेघर १४८, महू ६३०, वांग ४१३ क्यूसेक तर मोरणा-गुरेघर धरणातून प्रतिसेकंद एक हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणेक्षमताआजचागेल्यावर्षीचापाणीसाठापाणीसाठा कण्हेर१०.१०५.९७३.२०उरमोडी९.८०७.७२५.१३तारळी५.८५३.२९४.०६वीर९.८३४.८००.७७३मोरणा-गुरेघर१.८३०.८५००.२३१ कोयनेत दहा दिवसांत एक हजार मिलिमीटर पाऊसअरुण पवार ल्ल पाटणकोयना पाणलोट क्षेत्रात १९ जूनपासून पावसाने थैमान घातले. गुरुवारी रात्रीपासून पाऊस अचानकपणे मंदावला असला तरी गेल्या दहा दिवसांत कोयना, महाबळेश्वर व नवजा या पर्जन्यमापकांवर अनुक्रमे १०३९, ११४४, १२१९ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. त्यामुळे १ जून रोजी २९ टीएमसी वर असलेला कोयना धरणातील पाणीसाठा आता ४८.७३ टीएमसी म्हणजेच अर्ध्यावर पोहोचला आहे.कोयना धरणाच्या भिंतीपासून कोयना नदीचे उगमस्थान असलेल्या महाबळेश्वरपर्यंतचा ६० किलोमीटर अंतरावर एकूण ९ पर्जन्यमापकांवर पावसाची नोंद होत असते. यामध्ये कोयना, नवजा, महाबळेश्वर, प्रतापगड, वळवळ, सोनाट, कारगाव, काठी बामणोली अतिपर्जन्य ठिकाणांचा समावेश आहे. येथून येणाऱ्या पाण्याचा साठा कोयना धरणात होतो. दरवर्षीच्या पावसाळ्यात कोयना धरण पूर्णक्षमतेने भरेपर्यंत सरासरी ४५०० हजार मिलिमीटर पाऊस होतो. यंदा मात्र जून महिन्यातच पावसाने जोरदार मारा केल्यामळे २६ जूनपर्यंत एक हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या दहा दिवसांतच कोयना धरणात विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाची पाणीपातळी २१०५ फूट ९ इंच इतकी झाली आहे. पाऊस ओढ देईल की पूरस्थिती येईल?जून महिन्यातच पावसाने कहर केल्यामुळे धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी दिवसात जरी पावसाने ओढ दिली तरी काळजीचे कारण नाही. मात्र, जर पुन्हा जुलै महिन्यात पाऊस बळावला तर मोठ्या प्रमाणात कोयना धरणातून पाणी सोडावे लागेल व पूरस्थिती निर्माण होईल.