शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुळीकवाडी धरणात बोटीद्वारे मासेमारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी ८४ गावांत पाण्यासाठी गावेच्या गावे स्थलांतर होत त्या गावात धोम-बलकवडी पाणी आल्यामुळे पाझर तलावात ...

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी ८४ गावांत पाण्यासाठी गावेच्या गावे स्थलांतर होत त्या गावात धोम-बलकवडी पाणी आल्यामुळे पाझर तलावात पाणीसाठा शिल्लक असल्याने ऐन उन्हाळ्यात फुग्यावरून होणारी मासेमारी बोटीद्वारे होत आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

फलटण तालुक्यातील ८४ गाव सालपे, आदर्की-जावलीपर्यंतच्या गावांना उन्हाळा व प्रत्येक चार-पाच वर्षांनी पडणाऱ्या दुष्काळात जनावरांसह स्थलांतर करायचे व पावसाळ्यात गावाकडे यावे लागते. त्यामुळे तरुण शिक्षण अर्धवट मुंबईत जाऊन हमाली करून गुजराण करत होते. १९७२ च्या भयानक दुष्काळात दिवंगत माजी आमदार चिमणराव कदम यांनी तालुक्याचा पायी दौरा करून धरण, पाझर तलाव, माती बांध यांचे सर्वेक्षण करून १९७२ ते १९८२ पर्यंत रोजगार हमी योजनेतून शेकडो पाझर तलाव बांधले. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यात आले. त्यानंतर पर्जनमान कमी झाल्याने काही तलाव कोरडे राहू लागले. त्यानंतर दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न युती शासनाच्या काळात १९९६ मध्ये धोम-बलकवडी धरणास मंजुरी मिळाली, त्यावेळी सातारा लोकसभा मतदार संघाचे हिंदुराव नाईक-निंबाळकर खासदार होते, तर फलटण-खंडाळा तालुक्यांचे अपक्ष आमदार रामराजे नाईक-निंबाळकर निवडून आले होते.

धोम-बलकवडी माती धरणाचे काम झाले; पण कालव्याची कामे निधीअभावी रखडली. पण शरद पवार व रामराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रयत्नामुळे केंद्रीय जल आयोगाने कालव्याच्या कामास निधी उपलब्ध झाल्याने पाणी शेवटच्या टोकापर्यंत १४८ किलोमीटरपर्यंत पोहोचले; पण पोट कालव्याची कामे निधीअभावी रखडली आहे. धोम -बलकवडी उजव्या कालव्यातून ओढ्याला पाणी सोडून पाझर तलाव भरून घेतले जातात. त्यामुळे शेतीला पाणी मिळते तर तलावात पाणी साठून राहिल्याने मच्छीमारीचा व्यवसाय वाढीला लागल्याने समाधIन व्यक्त होत आहे.

(चौकट)

व्यवसाय टिकून..

पावसाळ्यात धरणे भरली तरी उन्हाळा व दुष्काळ यामुळे पाणीसाठा कमी होऊन मासेमारी लोक तोटा सहन करून व्यवसाय करीत होते; पण गत दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस व कालव्याचे पाणी यामुळे पाणीसाठा टिकून असल्याने बोटीद्वारे मासेमारी करावी लागत आहे.

(प्रतिक्रिया)

धरणामध्ये पाणीसाठा होत नव्हता त्यावेळी फायदा होत नव्हता. आता कालव्याच्या पाण्यामुळे फायदा होत आहे. पण कोविड १९ मुळे आठवडे बाजार बंद असल्याने माल असूनही विक्री होत नाही.

-अमित भोई, चेअरमन, मच्छिमार संस्था फलटण

१५आदर्की मासेमारी

फोटो : मुळीकवाडी (ता . फलटण) येथील धरणात बोटीद्वारे मासेमारी सुरू आहे.