शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

मुळीकवाडी धरणात बोटीद्वारे मासेमारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी ८४ गावांत पाण्यासाठी गावेच्या गावे स्थलांतर होत त्या गावात धोम-बलकवडी पाणी आल्यामुळे पाझर तलावात ...

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी ८४ गावांत पाण्यासाठी गावेच्या गावे स्थलांतर होत त्या गावात धोम-बलकवडी पाणी आल्यामुळे पाझर तलावात पाणीसाठा शिल्लक असल्याने ऐन उन्हाळ्यात फुग्यावरून होणारी मासेमारी बोटीद्वारे होत आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

फलटण तालुक्यातील ८४ गाव सालपे, आदर्की-जावलीपर्यंतच्या गावांना उन्हाळा व प्रत्येक चार-पाच वर्षांनी पडणाऱ्या दुष्काळात जनावरांसह स्थलांतर करायचे व पावसाळ्यात गावाकडे यावे लागते. त्यामुळे तरुण शिक्षण अर्धवट मुंबईत जाऊन हमाली करून गुजराण करत होते. १९७२ च्या भयानक दुष्काळात दिवंगत माजी आमदार चिमणराव कदम यांनी तालुक्याचा पायी दौरा करून धरण, पाझर तलाव, माती बांध यांचे सर्वेक्षण करून १९७२ ते १९८२ पर्यंत रोजगार हमी योजनेतून शेकडो पाझर तलाव बांधले. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यात आले. त्यानंतर पर्जनमान कमी झाल्याने काही तलाव कोरडे राहू लागले. त्यानंतर दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न युती शासनाच्या काळात १९९६ मध्ये धोम-बलकवडी धरणास मंजुरी मिळाली, त्यावेळी सातारा लोकसभा मतदार संघाचे हिंदुराव नाईक-निंबाळकर खासदार होते, तर फलटण-खंडाळा तालुक्यांचे अपक्ष आमदार रामराजे नाईक-निंबाळकर निवडून आले होते.

धोम-बलकवडी माती धरणाचे काम झाले; पण कालव्याची कामे निधीअभावी रखडली. पण शरद पवार व रामराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रयत्नामुळे केंद्रीय जल आयोगाने कालव्याच्या कामास निधी उपलब्ध झाल्याने पाणी शेवटच्या टोकापर्यंत १४८ किलोमीटरपर्यंत पोहोचले; पण पोट कालव्याची कामे निधीअभावी रखडली आहे. धोम -बलकवडी उजव्या कालव्यातून ओढ्याला पाणी सोडून पाझर तलाव भरून घेतले जातात. त्यामुळे शेतीला पाणी मिळते तर तलावात पाणी साठून राहिल्याने मच्छीमारीचा व्यवसाय वाढीला लागल्याने समाधIन व्यक्त होत आहे.

(चौकट)

व्यवसाय टिकून..

पावसाळ्यात धरणे भरली तरी उन्हाळा व दुष्काळ यामुळे पाणीसाठा कमी होऊन मासेमारी लोक तोटा सहन करून व्यवसाय करीत होते; पण गत दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस व कालव्याचे पाणी यामुळे पाणीसाठा टिकून असल्याने बोटीद्वारे मासेमारी करावी लागत आहे.

(प्रतिक्रिया)

धरणामध्ये पाणीसाठा होत नव्हता त्यावेळी फायदा होत नव्हता. आता कालव्याच्या पाण्यामुळे फायदा होत आहे. पण कोविड १९ मुळे आठवडे बाजार बंद असल्याने माल असूनही विक्री होत नाही.

-अमित भोई, चेअरमन, मच्छिमार संस्था फलटण

१५आदर्की मासेमारी

फोटो : मुळीकवाडी (ता . फलटण) येथील धरणात बोटीद्वारे मासेमारी सुरू आहे.