शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सातारा जिल्ह्यातील पहिले हरभरा केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:07 IST

पिंपोडे बुद्रुक : सध्याचा बाजारभाव लक्षात घेता शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याच्या हेतूने त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा,

ठळक मुद्देशहाजी भोईटे : कोरेगावातील मुख्य बाजार आवारात खरेदीला सुरुवात

पिंपोडे बुद्रुक : सध्याचा बाजारभाव लक्षात घेता शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याच्या हेतूने त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा, या हेतूने कोरेगावातील मुख्य बाजारात सातारा जिल्ह्यातील पहिले हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी-विक्री संघाच्या वतीने चेअरमन शहाजी भोईटे यांनी केले आहे.शेतकºयाच्या मालाला केंद्र शासनाने निर्धारित केलेली किमान आधारभूत किंमत मिळावी, या हेतूने कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, शेती उत्पन्न बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगाम २०१७-१८ करिता बाजार समिती कोरेगाव येथील मुख्य बाजार आवारात जिल्ह्यातील पहिले हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, नुकतेच त्याचे उद्घाटन सहकारी संस्था सहायक निबंधक संजय सुद्रिक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजी भोईटे, बाजार समीतीचे सभापती प्रतापराव कुमुकले, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे देसाई तसेच बाजार समिती खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाचे कृषी सहकार व पणन विभागामार्फ त रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त हरभरा उत्पन्न अपेक्षित होते, त्यामुळे ज्यादा आवक ज्याल्याने बाजार भाव किमान अधारभूत किमतीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती, अशाप्रकारे शेतकºयांची गळचेपी होऊन आर्थिक नुकसान होऊ नये, या हेतूने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.या ठिकाणी केंद्र शासनाने ठरविलेल्या किमान आधारभूत किमतीने म्हणजेच प्रतिक्विंटल ४४०० रुपये दराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहेत.

यासाठी शेतकºयांनी खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणी करता हरभरा या पीक पाण्याच्या नोंदीसह सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत घेऊन येणे अनिवार्य केले आहे.दरम्यान, शेतकºयांनी खरेदी केंद्र्रावर आणलेला माल स्वच्छ असावा, मालाची आर्द्र्रता कमाल १४ टक्के असावी, तो कडीकचरा किंवा मातीमिश्रित नसावा, असे अवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे.सोयाबीन विक्रीला प्रतिसादयापूर्वी देखील खरेदी-विक्री संघाच्या वतीने खरीप हंगामात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून ६१८२ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले होते. 

एकीकडे वाढत्या भांडवली खर्चाच्या तुलनेत बाजारभावामध्ये होणारी दराची घसरण लक्षात घेता शेतकºयांना आपल्या मालाला किफायतशीर बाजारभाव मिळण्याच्या हेतूने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकºयांनी त्याचा फायदा घ्यावा.- शहाजी भोईटे, चेअरमन,कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbusinessव्यवसाय