शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

दोन दिवसांत साडेतीन लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वर, पाचगणीत शनिवार, रविवारी नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेलचालक तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी मुख्याधिकारी, गटविकास ...

महाबळेश्वर : महाबळेश्वर, पाचगणीत शनिवार, रविवारी नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेलचालक तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व पोलीस यांच्यासोबत कारवाई केली. दोन दिवसांत तब्बल ३ लाख ४८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला.

महाबळेश्वर तालुका कोरोनाच्या संसर्गामुळे पर्यटनासाठी बंद ठेवला होता. गेल्या तीन महिन्यांपासून येथील व्यवसाय संपूर्णपणे बंद होते. उन्हाळी हंगामातील महत्त्वपूर्ण हंगाम तोट्यात गेला. त्यामुळे येथील व्यावसायिकांचा आर्थिक कणा मोडला आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीने व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील हॅाटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परवानगी देताना काही अटींची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या वतीने प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी स्वतः वन विभागाच्या सभागृहामध्ये बैठक घेऊन हॅाटेल व्यवसाय सुरू करताना नियमांची पूर्तता करण्याबाबत सूचना केल्या होत्या. परंतु अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय सुरु केले, परंतु नियमांबाबत दुर्लक्ष केले.

यामुळे तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पाचगणीच्या मुख्याधिकारी व पोलिस खात्याच्या संयुक्त मदतीने पथक करून विविध हॅाटेल्सवर तपासणी केली. शनिवार, रविवार असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक हॅाटेलमधील कर्मचाऱ्यांच्या अद्याप कोरोनाच्या अनुषंगाने तपासण्या झाल्या नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी दंड ठोठावला. या वेळी विनामास्क फिरणाऱ्या ६४ जणांकडून ३९ हजार ८००, सामाजिक अंतर न पाळणाऱ्या ८४ जणांकडून ४२ हजार, ३१ जणांकडून १३ हजार ४००, १६ हॅाटेल व्यावसायिकांकडून २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये तहसीलदार पाटील यांनी मेटगुताड येथील केवळ हॅाटेलांवर कारवाई करून १ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यामुळे तालुक्यातील व्यावसायिकांनी त्वरित प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने अटींच्या पूर्ततेसाठी पळापळ सुरु केली आहे.

चौकट

कर्मचाऱ्यांच्या तपासण्या, लसीकरणाकडे दुर्लक्ष

सर्व हॅाटेल व्यावसायिकांना हॅाटेल सुरू करण्यासाठी कोरोनाच्या नियम पाळण्याच्या सूचना वारंवार करूनही दुर्लक्ष होत असल्याने ही कारवाई करणे भाग पडले. अनेक हॅाटेल व्यावसायिकांनी अद्याप कर्मचाऱ्यांच्या तपासण्या किंवा लसीकरण केलेले नाही. केवळ नियम म्हणून नाही तर सामाजिक भान व जबाबदारी म्हणून सर्वांनी पाळणे अपेक्षित आहे. परंतु याबाबत कोणीच गांभीर्य दाखवत नसल्याने नाईलाजाने कारवाई करणे भाग पडले. हॅाटेल व्यावसायिकांनी आपापल्या कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले.