शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

वनवा लावल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह शिक्षिकेला १० हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

सातारा : वणवा लावण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी रेनावळे (ता. वाई) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षिकेला १० हजार रुपये ...

सातारा : वणवा लावण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी रेनावळे (ता. वाई) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षिकेला १० हजार रुपये दंडाची शिक्षा वाई न्यायालयाने शनिवारी सुनावली.

शिवाजी लक्ष्मण पार्टे (रा. वेलंग, ता. वाई) व नलिनी गणेश खरात (रा. शिरगाव, ता. वाई), अशी आरोपींची नावे आहेत. पार्टे हे मुख्याध्यापक, तर खरात शिक्षिका म्हणून काम करतात.

वनाधिकाऱ्य़ांनी दिलेल्या माहितीनुसार, रेनावळे येथील राखीव वनक्षेत्रास २६ फेब्रुवारी २०२१ रोजी वणवा लागला होता. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक हा वनवा विझविला होता. शिवाजी पार्टे व नीलिमा खरात यांनी रेनावळे गावातील शाळेजवळ कचरा व कागद पेटवून दिले होते. या कचऱ्यातील कागद व पालापाचोळा वाऱ्याने उडून शेजारच्या मालकी क्षेत्रात पडल्याने तेथील गवताने पेट घेतला. ही आग जवळच्या वनक्षेत्रात पसरली. या आगीत वनक्षेत्रातील २२ हेक्टर वनक्षेत्र जळून शासनाचे ११ हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी भारतीय वनअधिनियम, १९२७ चे कलम २६ (१), (ब), (फ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वनपाल भाऊसाहेब कदम व प्रभारी वनपाल रत्नकांत सीताराम शिंदे यांनी केला. आरोपींविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

वन गुन्ह्यातील दोन्ही संशयितांनी वाईचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.आर. माळी यांच्यासमोर गुन्हा कबूल केला. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २० दिवसांची साधी कैद ही शिक्षा सुनावली. आरोपींनी एकूण १० हजार रुपये दंड न्यायालयात भरला. सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले.