शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

सदाचारी माणसाचा शोध घ्या.. देव भेटेल : मुनिश्री पुलकसागरजी

By admin | Updated: June 19, 2017 16:49 IST

फलटण येथे ज्ञानगंगा महोत्सव मंगल प्रवचन

आॅनलाईन लोकमतफलटण , दि. १९ : देवाला कोठेही शोधू नका, सदाचारी चांगल्या माणसाचा शोध घ्या, त्यातच तुम्हाला देव भेटेल. फलटण तीर्थ क्षेत्रावर माणसाला माणूस बनविण्याचा कारखाना ज्ञानगंगा महोत्सवाच्या माध्यमातून सुरू होत असून, त्या ठिकाण फक्त माणुसकीवर भाष्य केले जाणार आहे. सर्व धर्मांतील लोकांनी २४ तासातला एक तास मला द्यावा, मी उरलेले २३ तास बदलवून दाखवेल, असा ठाम विश्वास भारत गौरव, राष्ट्रसंत मुनिश्री पुलकसागरजी गुरुदेव यांनी व्यक्त केला.दरम्यान, दि. २२ जूनपर्र्यत रोज सकाळी साडे वाजता सकल जैन समाज गोशाला एवं अहिंसा वन (सातारा पूलजवळ, फलटण) ज्ञानगंगा महोत्सव मंगल प्रवचन आयोजित केले आहे. यानिमित्त ते बोलत होते. यावेळी फलटण नगरपालिकेचे नगरसेवक अनुप शहा, श्रीपाल जैन उपस्थित होते.ज्ञानगंगा महोत्सव मंगल प्रवचनात राष्ट्रहित, सामाजिक, पारिवारिक, समस्यांवर भाष्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ही संताची भूमी असून, इथे मोठमोठ्या संतांचे जन्म झाले. धार्मिक भूमीत प्रवचन करण्याचा योग आल्याचे समाधान व्यक्त करीत आज मनुष्याकडे संपत्ती, भौतिकसाधन सुविधा मोठ्या प्रमाणात आहे. पण मानसिक समाधान नाही. यासाठी मानवाच्या मनावर चांगल्या विचारांचे परिणाम होण्यासाठी प्रबोधन आणि प्रवचनाची आवश्यकता आहे. सोशल मीडियावर एखाद्याला लाखो मित्र बनविता येतात; मात्र त्याला शेजारी कोण राहतो हे माहीत नसते. समाजा-समाजात धर्मांधता वाढत आहे. माणुसकीची हत्या होत आहे. संस्कृती लोप पावत चालली आहे. हे सर्व दुरुस्त करण्यासाठी मानवाला मानव बनविण्याची आवश्यकता आहे. ज्ञानगंगा महोत्सव प्रवचनात मानवतेविषयी चर्चा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.धर्म आणि राजनीती या दोन भिन्न बाबी असून, दोन्ही महत्त्वाच्या आहेत. धमार्ने राजनीतीला मार्गदर्शन करावे; परंतु धमार्ने राजनीतीत विलिन होऊ नये राजनीतीमध्ये धर्म नसावा देशाला धोका बेईमानापासून आहे. कोणत्याही धमापार्सून नाही. धर्मांध व्यक्तीमुळेच धर्मच गोंधळात पडला जात आहे.माणूस उच्चशिक्षित झाला प्रचंड ज्ञान मिळविले. ज्ञानाच्या माध्यमातून संपत्ती मिळवली आणि भौतिक गोष्टी मिळविल्या तरीही त्याचे समाधान झाले नाही. कारण मानवाचे मन एका संकुचित चौकटीत अडकून पडले आहे. ज्ञान आणि संपत्ती प्रंचड झाली; परंतु मन मात्र छोटेसे राहिले, असल्याचे खंत पुलकसागरजी महाराज यांनी व्यक्त केले.सकल जैन समाज गोशाळेच्या आवारात उभारलेल्या सूशोभित मंडपात पाच दिवस चालणारा ज्ञानगंगा महोत्सव हा सर्व धर्मियांसाठी खुला आहे. या प्रबोधनात्मक कार्यक्रमास शहर परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल जैन समाज गोशाळेचे प्रमुख अनुप शहा यांनी केले आहे.