शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर दहा महिन्यांनी भेटले शिक्षक विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST

▪️ सर्व खबरदारी घेत शासनाच्या अमलबजावणीचे शाळेकडून काटेकोर पालन लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्यातील पाचवी ...

▪️ सर्व खबरदारी घेत शासनाच्या अमलबजावणीचे शाळेकडून काटेकोर पालन

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : खटाव तालुक्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग शासनाच्या आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार तब्बल दहा महिन्यानंतर सुरू झाले. गेले नऊ, दहा महिने घरी राहून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळा सुरू झाल्याने उत्साह जाणवत होता. शाळेत जाऊन मित्र - मैत्रिणीची भेट तर शिक्षकांशी झालेला संवाद यामुळे या विद्यार्थ्याचे चेहरे प्रथमदर्शनी कावरेबावरे झाले होते. मित्र - मैत्रिणींनी एकमेकांचे चेहरे पाहून समाधान मानले. अखेर दहा महिन्यांनी शिक्षक विद्यार्थी यांची भेट झाल्याने शाळेतील वातावरण एक वेगळ्याच विश्वात घेऊन गेले.

शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्व ती खबरदारी घेत आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करीत अखेर शाळेची घंटा वाजली. ज्या -त्या शाळेतील स्थानिक प्रशासनाने आपआपल्या पातळीवर योग्य ती खबरदारी घेत अध्ययन व अध्यापन सुरू केले. इयत्ता पाचवी ते आठवीची खटाव तालुक्यातील शाळा, शिक्षक व विद्यार्थीसंख्या पुढीलप्रमाणे - जिल्हा परिषद ८९ शाळा, ३४२ शिक्षक तर २ हजार ३८५ विद्यार्थी. शिक्षण विभाग एक शाळा ३ शिक्षक तर २१ विद्यार्थी. खासगी अंशत: अनुदानित एक शाळा २४ शिक्षक तर १६२ विद्यार्थी. खासगी अनुदानित ५७ शाळा, ६८३ शिक्षक तर १० हजार ९१४ विद्यार्थी. खासगी विनाअनुदानित ५ शाळा, १३ शिक्षक तर ७१ विद्यार्थी. स्वयंअर्थसहाय्यित १५ शाळा, १३६ शिक्षक तर ७५१ विद्यार्थी. समाजकल्याण अनुदानित ४ शाळा , २९ शिक्षक तर २१० विद्यार्थी. समाजकल्याण विनाअनुदानित २ शाळा, १२ शिक्षक तर ५८ विद्यार्थी आहेत. असे एकूण मिळून १७४ शाळा, १२४२ शिक्षक तर १४ हजार ५७२ विद्यार्थी आहेत. यापैकी ३ हजार ४२१ विद्यार्थी पहिल्या दिवशी हजर होते.

सलग नऊ ते दहा महिने घरी राहून अनेक विद्यार्थी कंटाळलेले होते. प्रार्थना नाही, खेळही नाही, छोटी व मोठी सुट्टीसुध्दा नाही. यामुळे वेगळ्याच पध्दतीने सुरू असलेले अध्ययन व अध्यापन यांची सवय होईपर्यंत किती काळ जाणार हे कोणीच स्पष्ट करू शकत नाही. कोरोनाच्या भीतीमुळे खेळण्यासह अनेक बाबींवर निर्बंध आलेले आहेत. विद्यार्थी शाळेत जाणार असले तरी त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर मात्र कोरोनामुळे काहीशी चिंता जाणवत आहे. शाळेत गेल्यावर आपल्या मित्र - मैत्रिणींना भेटता येईल याची ओढ अनेकांना लागली होती. नियमावलीचे पालन करीत एकमेकांचे चेहरे पाहूनच शाळेचा पहिला दिवस कधी संपला, हे विद्यार्थ्यांना समजलेच नाही.

________