शहरं
Join us  
Trending Stories
1
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
4
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
5
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
6
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
7
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
10
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
11
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
12
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
13
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
14
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
15
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
16
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू

...अखेर दहा महिन्यांनी भेटले शिक्षक विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST

▪️ सर्व खबरदारी घेत शासनाच्या अमलबजावणीचे शाळेकडून काटेकोर पालन लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्यातील पाचवी ...

▪️ सर्व खबरदारी घेत शासनाच्या अमलबजावणीचे शाळेकडून काटेकोर पालन

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : खटाव तालुक्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग शासनाच्या आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार तब्बल दहा महिन्यानंतर सुरू झाले. गेले नऊ, दहा महिने घरी राहून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळा सुरू झाल्याने उत्साह जाणवत होता. शाळेत जाऊन मित्र - मैत्रिणीची भेट तर शिक्षकांशी झालेला संवाद यामुळे या विद्यार्थ्याचे चेहरे प्रथमदर्शनी कावरेबावरे झाले होते. मित्र - मैत्रिणींनी एकमेकांचे चेहरे पाहून समाधान मानले. अखेर दहा महिन्यांनी शिक्षक विद्यार्थी यांची भेट झाल्याने शाळेतील वातावरण एक वेगळ्याच विश्वात घेऊन गेले.

शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्व ती खबरदारी घेत आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करीत अखेर शाळेची घंटा वाजली. ज्या -त्या शाळेतील स्थानिक प्रशासनाने आपआपल्या पातळीवर योग्य ती खबरदारी घेत अध्ययन व अध्यापन सुरू केले. इयत्ता पाचवी ते आठवीची खटाव तालुक्यातील शाळा, शिक्षक व विद्यार्थीसंख्या पुढीलप्रमाणे - जिल्हा परिषद ८९ शाळा, ३४२ शिक्षक तर २ हजार ३८५ विद्यार्थी. शिक्षण विभाग एक शाळा ३ शिक्षक तर २१ विद्यार्थी. खासगी अंशत: अनुदानित एक शाळा २४ शिक्षक तर १६२ विद्यार्थी. खासगी अनुदानित ५७ शाळा, ६८३ शिक्षक तर १० हजार ९१४ विद्यार्थी. खासगी विनाअनुदानित ५ शाळा, १३ शिक्षक तर ७१ विद्यार्थी. स्वयंअर्थसहाय्यित १५ शाळा, १३६ शिक्षक तर ७५१ विद्यार्थी. समाजकल्याण अनुदानित ४ शाळा , २९ शिक्षक तर २१० विद्यार्थी. समाजकल्याण विनाअनुदानित २ शाळा, १२ शिक्षक तर ५८ विद्यार्थी आहेत. असे एकूण मिळून १७४ शाळा, १२४२ शिक्षक तर १४ हजार ५७२ विद्यार्थी आहेत. यापैकी ३ हजार ४२१ विद्यार्थी पहिल्या दिवशी हजर होते.

सलग नऊ ते दहा महिने घरी राहून अनेक विद्यार्थी कंटाळलेले होते. प्रार्थना नाही, खेळही नाही, छोटी व मोठी सुट्टीसुध्दा नाही. यामुळे वेगळ्याच पध्दतीने सुरू असलेले अध्ययन व अध्यापन यांची सवय होईपर्यंत किती काळ जाणार हे कोणीच स्पष्ट करू शकत नाही. कोरोनाच्या भीतीमुळे खेळण्यासह अनेक बाबींवर निर्बंध आलेले आहेत. विद्यार्थी शाळेत जाणार असले तरी त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर मात्र कोरोनामुळे काहीशी चिंता जाणवत आहे. शाळेत गेल्यावर आपल्या मित्र - मैत्रिणींना भेटता येईल याची ओढ अनेकांना लागली होती. नियमावलीचे पालन करीत एकमेकांचे चेहरे पाहूनच शाळेचा पहिला दिवस कधी संपला, हे विद्यार्थ्यांना समजलेच नाही.

________