शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Satara: कोयना अभयारण्यग्रस्त वेळे, मळेचा ३५ वर्षांचा प्रश्न सुटला; पुनर्वसनास केंद्राची अंतिम मान्यता 

By नितीन काळेल | Updated: January 31, 2024 19:21 IST

गावांना मिळणार आता सर्व नागरी सुविधा 

सातारा : कोयना अभयारण्यग्रस्त वेळे आणि मळे गाव प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनास केंद्र शासनाची अंतिम मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे या गावांचा ३५ वर्षांपासून रखडलेला प्रश्न सुटला आहे. तसेच या गावांना आता सर्व नागरी सुविधाही मिळणार आहेत.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अधिसुचनेद्वारे कोयना अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यात सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील कोअर झोनमध्ये एकूण ५२ गावांचे क्षेत्र समाविष्ठ आहे. त्यापैकी १९ गावे ही कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे पूर्वीच पुनर्वसित झालेली आहेत. तसेच १८ गावांचे अभयारण्यातील हक्क कायम केलेले आहेत. उर्वरित १५ गावांचे पुनर्वसन अभयारण्याबाहेर करायचे आहे. त्यामधील १० गावांची पुनर्वसन झाले आहे. तर ५ गावांची पुनर्वसन प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये जावळी तालुक्यातील वेळे गावाचा समावेश आहे. या गावामध्ये एकूण १३५ प्रकल्पग्रस्त असून त्यापैकी ६१ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खंडाळ्यातील वनक्षेत्रावर करण्यात येत आहे. या खातेदारांचे पुनर्वसन करण्यासाठी ११२.२५ हेक्टर आर वनक्षेत्र निर्वणीकरणाचा प्रस्ताव जुलै २०२१ मध्ये सातारा वनविभागाने केंद्र शासनास सादर केला होता.पाटण तालुक्यातील मळे या गावाचाही यामध्ये समावेश आहे. गावामध्ये एकूण १४० प्रकल्पग्रस्त आहेत. त्यातील २० प्रकल्पग्रस्तांनी पर्याय एकचा तर १२० खातेदारांनी पर्याय दोनचा स्वीकार केला आहे. मळे गावातील १२० प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातील पाटण व कऱ्हाड तालुक्यामध्ये करण्यात येत आहे. यासाठी कऱ्हाड आणि पाटण तालुक्यातील २२७.९ हेक्टर आर वनक्षेत्र निर्वणीकरणाचा प्रस्ताव जून २०२१ मध्ये वनविभागाने केंद्र शासनास सादर केला होता. आता या गावांच्या पुनर्वसनासही केंद्र शासनाची अंतिम मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे या दोन्ही गावांना सर्व नागरी सुविधा मिळणार आहेत.

जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षकांकडून दखल..अभयारण्यग्रस्तांचा पुनर्वसनाचा ३५ वर्षांपासूनच्या प्रलंबीत प्रश्नाची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज यांनी गांभिर्याने दखल घेतली. त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे तसेच जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक कार्यालयाच्या योग्य समन्वयामुळे दोन्ही प्रस्तावास २९ जानेवारीला केंद्र शासनाकडून अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे. वेळे व मळे गावच्या पुनर्वसनसाठी निर्वणीकरण केलेल्या क्षेत्रावर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर केले जाणार आहे. यासाठी अभिन्यास आराखडा तयार करुन संबंधित गावास महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियमाने १८ नागरी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर