शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

युवकांचा पॉकेटमनी देणार दुष्काळाशी लढा

By admin | Updated: February 13, 2015 00:49 IST

इंजबाव : तरूणाईनं पहिल्या टप्प्यात जमा केला दहा हजारांचा निधी--लोकमत विशेष...

फिरोज तांबोळी - गोंदवले -आधुनिक काळात स्वच्छंदाबरोबरच खर्चिक बनलेली तरुणाई पाहायला मिळते; पण हीच तरुणाई विकासकामांसाठी एकवटली तर काहीही अशक्य नाही, हे इंजबाव, ता. माण येथील तरुणांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी युवकांनी दरमहा शंभर रुपये काढण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्याच टप्प्यात सुमारे दहा हजारांचा निधीही जमा झाला आहे.माणच्या खडकाळ, डोंगराळ भागात इंजबाव गाव बसले असून, अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिले आहे. पाण्यासाठी आसुसलेल्या या गावाला दुष्काळाची पहिली झळ सोसावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. मागासलेला भाग, लोकसहभागाचा अभाव या प्रमुख कारणाने गावाचा पाणीप्रश्न कधी सुटणार हाच गावकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे. परंतु गावातील सुशिक्षित तरुणांनी ही वस्तुस्थिती बदलण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी इंजबाव विकास संस्था उभारण्यासाठी संतोष कापसे यांच्या पुढाकाराने स्थानिकांसह पुणे, मुंबईत याठिकाणी स्थायिक झालेले गावचे तरुण देखील पुढे सरसावले आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वीच या तरुणांनी गावाच्या विकासाबाबत आराखडा आखून कामाला प्रत्यक्षात सुरुवातही केली आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘विकासासाठी एकवटली तरुणाई’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताने तरुणांना प्रोत्साहन मिळालेच; परंतु गावासाठी दरमहा शंभर रुपये या उपक्रमाची माहितीही मिळाली. या उपक्रमात इतरांना सहभागी करून घेण्यासाठी आता तरुणांनी पुढाकार घेतला आहे. मूळचे इंजबाव गावचे रहिवासी असलेले विठ्ठल कापसे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या उपक्रमात मुंबईस्थित सुमारे ७० तरुणांनी सहभाग होण्याची तयारी दाखविली आहे. शिवाय गावातील स्थानिक ३० तरुणदेखील यासाठी सरसावले आहेत. दरमहा केवळ शंभर रुपये दिल्यास कायमचा दुष्काळ हटविण्यासाठी आपले योगदान मोलाचे ठरू शकणार आहे. पहिल्याच टप्प्यात सुमारे दहा हजारांचा निधी जमा झाला आहे.गावाचा विकास महत्त्वाचामहिनाभरात अकारण पैसे वाया जातच असतात. पंरतु गावाच्या विकासासाठी असे वाया जाणारे पैसे सत्कारणी लागत असतील, तर शंभरच नव्हे तर त्याहून अधिक रुपये देण्यासही अनेक तरुण पुढे येत आहेत.-संतोष कापसे,इंजबाव विकास संस्था, अध्यक्ष इंजबावच्या विकासासाठी आम्ही मित्र एकत्र येऊन प्रयत्न सुरू केले. यातूनच दरमहा शंभर रुपये गावासाठी ही संकल्पना सुचली. ही संकल्पना ज्ञात-अज्ञात लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत’ची मोलाची साथ मिळाल्यानेच पहिल्या टप्प्यात सुमारे शंभर तरुणांनी या संकल्पनेत सहभाग दिला. त्यामुळे ‘लोकमत’चे आभारी आहोत.-विठ्ठल कापसे,मुंबई स्थित तरुण