शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

युवकांचा पॉकेटमनी देणार दुष्काळाशी लढा

By admin | Updated: February 13, 2015 00:49 IST

इंजबाव : तरूणाईनं पहिल्या टप्प्यात जमा केला दहा हजारांचा निधी--लोकमत विशेष...

फिरोज तांबोळी - गोंदवले -आधुनिक काळात स्वच्छंदाबरोबरच खर्चिक बनलेली तरुणाई पाहायला मिळते; पण हीच तरुणाई विकासकामांसाठी एकवटली तर काहीही अशक्य नाही, हे इंजबाव, ता. माण येथील तरुणांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी युवकांनी दरमहा शंभर रुपये काढण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्याच टप्प्यात सुमारे दहा हजारांचा निधीही जमा झाला आहे.माणच्या खडकाळ, डोंगराळ भागात इंजबाव गाव बसले असून, अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिले आहे. पाण्यासाठी आसुसलेल्या या गावाला दुष्काळाची पहिली झळ सोसावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. मागासलेला भाग, लोकसहभागाचा अभाव या प्रमुख कारणाने गावाचा पाणीप्रश्न कधी सुटणार हाच गावकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे. परंतु गावातील सुशिक्षित तरुणांनी ही वस्तुस्थिती बदलण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी इंजबाव विकास संस्था उभारण्यासाठी संतोष कापसे यांच्या पुढाकाराने स्थानिकांसह पुणे, मुंबईत याठिकाणी स्थायिक झालेले गावचे तरुण देखील पुढे सरसावले आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वीच या तरुणांनी गावाच्या विकासाबाबत आराखडा आखून कामाला प्रत्यक्षात सुरुवातही केली आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘विकासासाठी एकवटली तरुणाई’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताने तरुणांना प्रोत्साहन मिळालेच; परंतु गावासाठी दरमहा शंभर रुपये या उपक्रमाची माहितीही मिळाली. या उपक्रमात इतरांना सहभागी करून घेण्यासाठी आता तरुणांनी पुढाकार घेतला आहे. मूळचे इंजबाव गावचे रहिवासी असलेले विठ्ठल कापसे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या उपक्रमात मुंबईस्थित सुमारे ७० तरुणांनी सहभाग होण्याची तयारी दाखविली आहे. शिवाय गावातील स्थानिक ३० तरुणदेखील यासाठी सरसावले आहेत. दरमहा केवळ शंभर रुपये दिल्यास कायमचा दुष्काळ हटविण्यासाठी आपले योगदान मोलाचे ठरू शकणार आहे. पहिल्याच टप्प्यात सुमारे दहा हजारांचा निधी जमा झाला आहे.गावाचा विकास महत्त्वाचामहिनाभरात अकारण पैसे वाया जातच असतात. पंरतु गावाच्या विकासासाठी असे वाया जाणारे पैसे सत्कारणी लागत असतील, तर शंभरच नव्हे तर त्याहून अधिक रुपये देण्यासही अनेक तरुण पुढे येत आहेत.-संतोष कापसे,इंजबाव विकास संस्था, अध्यक्ष इंजबावच्या विकासासाठी आम्ही मित्र एकत्र येऊन प्रयत्न सुरू केले. यातूनच दरमहा शंभर रुपये गावासाठी ही संकल्पना सुचली. ही संकल्पना ज्ञात-अज्ञात लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत’ची मोलाची साथ मिळाल्यानेच पहिल्या टप्प्यात सुमारे शंभर तरुणांनी या संकल्पनेत सहभाग दिला. त्यामुळे ‘लोकमत’चे आभारी आहोत.-विठ्ठल कापसे,मुंबई स्थित तरुण