शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

जोपर्यंत सातबारा देत नाही तोपर्यंत लढा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:13 IST

म्हसवड : सुमारे दीडशे वर्षांपूर्वीपासून कब्जे वहिवाटीत व स्वत: कसत असलेल्या कूळ शेतकऱ्यांची मालक नावे व आणेवारी नोंद केलेला ...

म्हसवड : सुमारे दीडशे वर्षांपूर्वीपासून कब्जे वहिवाटीत व स्वत: कसत असलेल्या कूळ शेतकऱ्यांची मालक नावे व आणेवारी नोंद केलेला सातबारा त्यांच्या हाती दिला जात नाही, तोपर्यंत शेतकरी प्रांत कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन थांबविणार नाहीत,’ असा इशारा डॉ. भारत पाटणकर निवेदनाद्वारे दिला आहे.

श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेले म्हसवड परिसर कूळ हक्क शेतकरी आंदोलन दि. ११ फेब्रुवारीपासून सुरू आहे. आंदोलनाबाबत वेळोवेळी निवेदनेही दिली; परंतु सरकारकडून ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे राज्यात ४४ ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलकांना दहिवडी येथील आंदोलनात सहभागी करून मोठा लढा दिला जाईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.

येथील सरंजामाची हजारो शेतकऱ्यांच्या सातबारावर जी बेकायदेशीररीत्या सरकारने नावे ठेवलेली आहेत, ती कायमस्वरूपी काढून टाकावीत व हजारोंच्या संख्येने असलेल्या कुळांचीच मालकी हक्काची १६ आणे आणेवारी नोंद केलेला संगणकीय सातबारा म्हसवड परिसरातील आंदोलक शेतकरी बांधवाच्या हाती द्यावा.

सन २०१६ डिसेंबरपासून सर्व शासकीय कामाकरिता संगणकीय सातबारा वापराचे आदेश सरकारने जारी करून पारंपरिक पुस्तकी सातबारा वापरावर बंदी लागल्यामुळे येथील संबंधित शेतकरीबांधव अडचणीत आले आहेत. वर्षानुवर्षे जमीन कसत असलेल्या शेतकरी कुटुंबांचे जमिनीच्या सातबारा सदरी निरंतर, संरक्षित व इतर हक्कातील कुळांच्या रेषेवर बेकायदेशीररीत्या सरंजामशाहांची सरकारने अस्तित्वात ठेवलेली पोकळ व बोगस नावे नोंद ठेवून तब्बल आण्याचा सरकारनेच केलेला सातबारा कुळांच्या मालकी हक्काचा नावे १६ आणे करून जोपर्यंत सरकार हाती देत नाहीत, तोपर्यंत शेतकरी बांधवांचे कुटुंबांसमवेत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे.

(चौकट)

चुका सरकारनेच दुरुस्ती कराव्यात...

‘कसेल त्याची जमीन, कूळ कायदा, कमाल जमीन धारणा आदी सरकारने कायदे वेळोवेळी केले. राज्यात त्याची ज्याच्या त्यावेळी अंमलबजावणीही झाली. म्हसवड भागात मात्र सरकारने दुर्लक्षच केले. म्हसवड भागातील हजारो गोरगरीब शेतकरी कुटुंबे दीडशे वर्षांपूर्वीपासून स्वत: कसत असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर बेकायदेशीर सरंजामाची पोकळ ठेवलेली नावे ही चूक सरकारचीच आहे. त्यापुढे वरचेवर केलेल्या चुका सरकारनेच दुरुस्त करणे गरजेचे आहे.

20दहिवडी

फोटो : दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनात म्हसवड परिसरातील शेतकरी सहभागी झाले आहेत.