शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विनाकारण फिरणाऱ्या पन्नासजणांची चाचणी; तिघे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:37 IST

सातारा : सातारा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनेक वाहनधारक संचारबंदीचे नियम पायदळी तुडवून बाजारपेठेत विनाकारण फिरत आहेत. अशा ...

सातारा : सातारा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनेक वाहनधारक संचारबंदीचे नियम पायदळी तुडवून बाजारपेठेत विनाकारण फिरत आहेत. अशा वाहनधारकांची शुक्रवारी प्रशासनाच्या फिरत्या पथकाने रॅपिड अँटिजेन टेस्ट केली. दिवसभरात ५० जणांची तापसणी केल्यानंतर त्यामध्ये एका महिलेसह तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. संक्रमण रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. परंतु, नागरिक व वाहनधारकांकडून शासन नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. बहुतांश नागरिक दवाखान्याचे कारण पुढे करीत बाजारपेठेत फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे तहसीलदार आशा होळकर यांनी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले असून, याची जबाबदारी पंचायत समिती व सातारा पालिकेवर सोपविण्यात आली आहे.

मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी या कामी एक वाहन, एक डॉक्टर, एक तंत्रज्ञ व एक परिचारिका असे पथक तयार केले आहे. शुक्रवारी सकाळी या पथकाने पोलीस बंदोबस्तात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांची रॅपिड अ‍ॅँटिजेन टेस्ट केली. एकूण ५० जणांची या पथकाचे चाचणी केली. यामध्ये एक महिला व दोन पुुरुष अशा तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. संबंधितांचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, प्रशासनाच्या या अनोख्या मोहिमेमुळे बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात तर येईल शिवाय विनाकारण फिरणाऱ्यांवरही अंकुश बसेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.

फोटो : ३० जावेद खान ०१

सातारा पालिका व पंचायत समितीच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सकाळी पोवई नाका येथे विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांची कोरोना चाचणी केली. (छाया : जावेद खान)