शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:39 IST

सातारा : जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हाळा असतो; पण यंदा उन्हाचे प्रमाण कमीच राहिले आहे. त्यातच ...

सातारा : जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हाळा असतो; पण यंदा उन्हाचे प्रमाण कमीच राहिले आहे. त्यातच कोरोना लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच थांबत आहेत. परिणामी यंदा अजून तरी उष्माघात बळीची एकही नोंद जिल्ह्यात झालेली नाही.

सातारा जिल्ह्याचे दोन विभाग ओळखले जातात. पूर्वेकडील दुष्काळी भाग आणि पश्चिमेकडील बऱ्यापैकी समृद्ध असा पट्टा. जिल्ह्यात दरवर्षी मार्च महिन्यापासून ऊन जाणवायला सुरुवात होते. एप्रिलपासून तर कडक उन्हाळा असतो. पूर्व दुष्काळी भागात तर उन्हाची तीव्रता अधिक असते. सकाळी ९ पासून कडक उन्हाला सुरुवात होते. पश्चिम भागाचा विचार करता दरवर्षी कमाल तापमान सरासरी ४२ अंशांपर्यंत पोहोचते, तर पूर्व दुष्काळी तालुक्यात ४३ अंशांवरही तापमान गेल्याची नोंद झालेली आहे. यामुळे उष्माघाताने बळी जाण्याचाही प्रकार घडतो; पण गेल्या दोन वर्षांत उष्माघाताचा बळी गेलेला नाही.

यावर्षी तर जिल्ह्यात उन्हाळाच कमी आहे. त्यातच वळवाचा पाऊस सतत होत आहे. यामुळे कमाल तापमान कमी होत आहे. सध्या तर २६ अंशांपर्यंत खाली तापमान आलेले आहे. परिणामी यंदा कडक उन्हाळा जाणवलाच नाही, अशी स्थिती आहे.

चौकट :

तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी

२०१९ ००

२०२० ००

२०२१ ००

..........................

ऊन वाढले तरी...

यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता खूपच कमी आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कमाल तापमान ४० अंशांवर अनेक वेळा जाते; पण यंदा ४० अंशांवर अद्याप गेलेले नाही. एप्रिल महिन्यात एकदाच ३९ अंशांवर तापमान होते, तर मे महिन्यात ३५ ते ३८ अंशांदरम्यान पारा राहिलेला आहे. सध्या तर वळवाचा पाऊस होत असल्याने कमाल तापमान आणखी कमी होऊन ३० अंशांच्या खाली आलेले आहे.

............................................

उन्हाळा घरातच...

कोरोन विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत. परिणामी बहुतांशी नागरिक हे घरातच थांबत आहेत. त्यामुळे बाहेर जाण्याचा प्रश्नच नाही. त्याचबरोबर ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असली तरी उन्हाळा कमी असल्याने त्याची तीव्रता जाणवत नाही. शेतकरीही दुपारच्या वेळी घरी थांबतात आणि ऊन कमी झाले की शेतीची कामे करीत असतात. त्याचबरोबर ग्रामीण भागात उन्हाळी मजुरीची कामेही कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.

कोट :

सातारा जिल्ह्यात यावर्षी उन्हाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल आणि मे महिन्यातही कमाल तापमान कमी राहिले. त्यातच वारंवार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवली नाही. यावर्षी आतापर्यंत तरी उष्माघाताने जिल्ह्यात एकही बळी गेलेला नाही.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

.............................................................