शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कास परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST

पेट्री : कास पठार परिसरातील दुर्गम, डोंगर माथ्यावरील काही भागात सततच्या पावसाने व तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामुळे झालेल्या ...

पेट्री : कास पठार परिसरातील दुर्गम, डोंगर माथ्यावरील काही भागात सततच्या पावसाने व तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामुळे झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्याप्रमाणावर गवताच्या गंजी व शेणारा भिजल्याने झालेल्या नुकसानाबाबत शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाल्याचे चित्र आहे.

कासपठार परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावर शेती हा मुख्य व्यवसाय आहे. जोडव्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. या भागात मोठयाप्रमाणावर पर्जन्यवृष्टी होते. पावसाळ्यात जनावरांना चारा उपलब्ध व्हावा, यासाठी हिवाळ्यात डोंगरभागात उपलब्ध होणाऱ्या गवताची कापणी मोठ्या प्रमाणावर करून गवताच्या गंजी रचल्या जातात. इंधनासाठी उन्हाळ्यात शेण्या थापून त्या सुकवून त्याचे शेणारे रचून पावसाळ्यात उपयोगात आणले जातात.

गेल्या पंधरवडयात अचानक मुसळधार पावसाची हजेरी तसेच तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. गारपिटीसह मुसळधार पाऊस झाल्याने शेणारा व गवताच्या गंजी सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी वर्गाची चांगलीच धावपळ झाली होती. काही ठिकाणचे शेणारे व गवताच्या गंजी भिजल्याने मोठयाप्रमाणावर नुकसान होऊन पावसाळ्यात जनावरांना चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, याबाबत मोठा यक्ष प्रश्न शेतकरी वर्गासमोर निर्माण झाला आहे.

चौकट

गंजीतील गवत भिजल्याने मोठयाप्रमाणावर नुकसान होऊन गवत कुजले आहे. भिजलेले गवत पुन्हा उन्हात वाळवण्यासाठी किमान दोन दिवस तरी कडक ऊन हवे. परंतु पावसाची उघडीप काही होईना. भिजलेले गवत वाळवल्याशिवाय घरात सुरक्षित ठेवता येत नाही. भिजलेले गवत घरात ठेवायचे म्हटल्यास सुईरसारख्या उपद्रवी कीटकांच्या मोठया त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे पावसाच्या उघडिपीची प्रतीक्षा शेतकरी वर्गाला लागली आहे. तसेच पावसाळ्यात इंधनासाठी वापरलेल्या शेण्यादेखील भिजल्याने पुन्हा या शेण्या वाळवण्यासाठी कडक उन्हाची गरज असल्याचे बोलले जात आहे.

कोट

गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाने मोठयाप्रमाणावर नुकसान होऊन जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा तसेच शेणारे भिजल्याने किमान आठ दिवस तरी पावसाची चांगली उघडीप अपेक्षित आहे. दुपारी ऊन, सायंकाळी पुन्हा पावसाचे वातावरण होत आहे.

- ज्ञानेश्वर आखाडे, शेतकरी, कुसुंबीमुरा

फोटो २०पेट्री-ग्रास

कास परिसरात झालेल्या पावसामुळे गवत भिजले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. (छाया : सागर चव्हाण)

डोंगरमाथ्यावरील कुसुंबीमुरा (ता. जावळी) येथे मुसळधार पावसाने गवताच्या गंजी मोठया प्रमाणावर भिजून गवत कुजले आहे.

(छाया -सागर चव्हाण )